शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावर भारताची प्रतिक्रिया नाही, आता बांगलादेशचे पुढचे पाऊल काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 17:37 IST

बांगलादेशने भारताकडे शेख हसीनाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे, मात्र भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही

Sheikh Hasina Extradition, India Bangladesh Relations : बांगलादेशनेभारताकडे शेख हसीना यांना परत पाठवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीला भारताने फारसे महत्त्व दिलेले नाही. त्यांना अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. अशा स्थितीत या मुद्द्यावर बांगलादेशचे पुढचे पाऊल काय असेल, हा मोठा प्रश्न आहे. ते भारताला स्मरणपत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, ढाका नवी दिल्लीला स्मरणपत्र पाठवणार आहे.

बांगलादेशचे म्हणणे काय?

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आम्हाला अद्याप नवी दिल्लीकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही. आम्ही उत्तराची वाट पाहू. जर आम्हाला ते निर्धारित वेळेत मिळाले नाही तर आम्ही स्मरणपत्र पाठवू. एका प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ढाक्याचे पुढील पाऊल दिल्लीच्या प्रतिसादावर अवलंबून असेल. आम्ही यावेळी परिस्थितीवर भाष्य करू इच्छित नाही किंवा अंदाज बांधू इच्छित नाही.

बांगलादेशने नवी दिल्लीत एक राजकीय नोट पाठवून भारत सरकारने बांगलादेशातील न्यायालयीन कार्यवाहीसाठी हसीनाचे प्रत्यार्पण करण्याची विनंती केली होती. बांगलादेशच्या मागणीवर परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जुलैमध्ये झालेल्या बंडखोरीदरम्यान हसीना यांच्यावर १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बांगलादेशस्थित इंटरनॅशनल क्रिमिनल ट्रिब्युनल (ICT) ने हसीना यांच्याविरुद्ध मानवता आणि नरसंहाराच्या गुन्ह्यांसाठी अटक वॉरंट जारी केले आहे. त्यांचे सरकार ५ ऑगस्टला पडले. त्यानंतर शेख हसीना सत्ता सोडल्यानंतर भारतात आल्या.

भारत आणि बांगलादेश यांनी २०१३ मध्ये प्रत्यार्पण करारावर स्वाक्षरी केली, परंतु हा करार अस्तित्वात आहे याचा अर्थ असा नाही की नवी दिल्लीला शेख हसीना यांना ढाका येथे सोपवावे लागेल. करारानुसार, गुन्हा राजकीय स्वरूपाचा असल्यास प्रत्यार्पणाला नकार दिला जाऊ शकतो. मात्र, राजकीय मानता येणार नाही अशा गुन्ह्यांची यादी बरीच मोठी आहे. हसीना यांच्यावर ज्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी काही गुन्ह्यांना या करारातील राजकीय गुन्ह्यांच्या व्याख्येतून वगळण्यात आले आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतprime ministerपंतप्रधानCrime Newsगुन्हेगारी