शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

"दिल्लीला तुमच्यासोबत..."; समन्स बजावल्यानंतर बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांना सुनावून गेले भारतीय उच्चायुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 14:15 IST

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने भारतीय उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावले होते.

Bangladesh Voilence :बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरु आहेत. अशातच बांगलादेश अतिशय बालिश अशी पावले उचलत आहे. बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी मंगळवारी आगरतळा येथील बांगलादेश उप उच्चायुक्तालयाबाहेर झालेल्या तोडफोडीनंतर देशाच्या अंतरिम सरकारचे कार्यवाहक परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेतली. वर्मा यांना ढाका येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. यावेळी प्रणय वर्मा यांनी बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांना सुनावल्याचे म्हटलं जात आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने मंगळवारी भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावले होते. परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहीद हुसैन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांना समन्स बजावण्यात आले होतं. आगरतळा येथील बांगलादेश सहाय्यक उच्चायुक्तालयात काही आंदोलकांनी सुरक्षा बॅरिकेड्स तोडल्यानंतर आणि मालमत्तेची तोडफोड केल्याच्या बांगलादेशने प्रणय वर्मा यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावले.

"दिल्लीला बांगलादेशसोबत स्थिर, रचनात्मक संबंध निर्माण करायचे आहेत. कोणताही मुद्दा द्विपक्षीय संबंधात अडथळा बनू नये. आम्ही बांगलादेशच्या अंतरिम सरकारशी चर्चा करण्यास तयार आहोत," असं भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी म्हटलं. भारतीय उच्चायुक्त दुपारी ४ वाजता परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले होते.

दुसरीकडे, आगरतळा येथील बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तांनी सुरक्षेच्या परिस्थितीचा हवाला देत पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांच्या सर्व व्हिसा आणि कॉन्सुलर सेवा निलंबित केल्या आहेत. तर घटनेत सहभागी असलेल्या सात जणांना अटक करण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेविरोधात निदर्शने सुरू असताना ही घटना घडली.

दरम्यान, बांगलादेशात चिन्मय कृष्ण दास यांना अटक आणि हिंदू समुदायावर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ सोमवारी त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे हजारो लोकांनी प्रचंड आंदोलन केल होते. आंदोलक बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयात घुसले आणि त्यांनी तोडफोड केली. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही घटना अत्यंत खेदजनक असल्याचे म्हटलं. याला हिंदू संघर्ष समिती नावाची संघटना जबाबदार असल्याचा आरोप नजरुल यांनी केला. या घटनेत बांगलादेशचा राष्ट्रध्वज जाळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत