शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

"दिल्लीला तुमच्यासोबत..."; समन्स बजावल्यानंतर बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांना सुनावून गेले भारतीय उच्चायुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 14:15 IST

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने भारतीय उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावले होते.

Bangladesh Voilence :बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरु आहेत. अशातच बांगलादेश अतिशय बालिश अशी पावले उचलत आहे. बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी मंगळवारी आगरतळा येथील बांगलादेश उप उच्चायुक्तालयाबाहेर झालेल्या तोडफोडीनंतर देशाच्या अंतरिम सरकारचे कार्यवाहक परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेतली. वर्मा यांना ढाका येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. यावेळी प्रणय वर्मा यांनी बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांना सुनावल्याचे म्हटलं जात आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने मंगळवारी भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावले होते. परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहीद हुसैन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांना समन्स बजावण्यात आले होतं. आगरतळा येथील बांगलादेश सहाय्यक उच्चायुक्तालयात काही आंदोलकांनी सुरक्षा बॅरिकेड्स तोडल्यानंतर आणि मालमत्तेची तोडफोड केल्याच्या बांगलादेशने प्रणय वर्मा यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावले.

"दिल्लीला बांगलादेशसोबत स्थिर, रचनात्मक संबंध निर्माण करायचे आहेत. कोणताही मुद्दा द्विपक्षीय संबंधात अडथळा बनू नये. आम्ही बांगलादेशच्या अंतरिम सरकारशी चर्चा करण्यास तयार आहोत," असं भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी म्हटलं. भारतीय उच्चायुक्त दुपारी ४ वाजता परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले होते.

दुसरीकडे, आगरतळा येथील बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तांनी सुरक्षेच्या परिस्थितीचा हवाला देत पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांच्या सर्व व्हिसा आणि कॉन्सुलर सेवा निलंबित केल्या आहेत. तर घटनेत सहभागी असलेल्या सात जणांना अटक करण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेविरोधात निदर्शने सुरू असताना ही घटना घडली.

दरम्यान, बांगलादेशात चिन्मय कृष्ण दास यांना अटक आणि हिंदू समुदायावर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ सोमवारी त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे हजारो लोकांनी प्रचंड आंदोलन केल होते. आंदोलक बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयात घुसले आणि त्यांनी तोडफोड केली. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही घटना अत्यंत खेदजनक असल्याचे म्हटलं. याला हिंदू संघर्ष समिती नावाची संघटना जबाबदार असल्याचा आरोप नजरुल यांनी केला. या घटनेत बांगलादेशचा राष्ट्रध्वज जाळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत