शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

"दिल्लीला तुमच्यासोबत..."; समन्स बजावल्यानंतर बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांना सुनावून गेले भारतीय उच्चायुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 14:15 IST

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने भारतीय उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावले होते.

Bangladesh Voilence :बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरु आहेत. अशातच बांगलादेश अतिशय बालिश अशी पावले उचलत आहे. बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी मंगळवारी आगरतळा येथील बांगलादेश उप उच्चायुक्तालयाबाहेर झालेल्या तोडफोडीनंतर देशाच्या अंतरिम सरकारचे कार्यवाहक परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेतली. वर्मा यांना ढाका येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. यावेळी प्रणय वर्मा यांनी बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांना सुनावल्याचे म्हटलं जात आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने मंगळवारी भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावले होते. परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहीद हुसैन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांना समन्स बजावण्यात आले होतं. आगरतळा येथील बांगलादेश सहाय्यक उच्चायुक्तालयात काही आंदोलकांनी सुरक्षा बॅरिकेड्स तोडल्यानंतर आणि मालमत्तेची तोडफोड केल्याच्या बांगलादेशने प्रणय वर्मा यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावले.

"दिल्लीला बांगलादेशसोबत स्थिर, रचनात्मक संबंध निर्माण करायचे आहेत. कोणताही मुद्दा द्विपक्षीय संबंधात अडथळा बनू नये. आम्ही बांगलादेशच्या अंतरिम सरकारशी चर्चा करण्यास तयार आहोत," असं भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी म्हटलं. भारतीय उच्चायुक्त दुपारी ४ वाजता परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले होते.

दुसरीकडे, आगरतळा येथील बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तांनी सुरक्षेच्या परिस्थितीचा हवाला देत पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांच्या सर्व व्हिसा आणि कॉन्सुलर सेवा निलंबित केल्या आहेत. तर घटनेत सहभागी असलेल्या सात जणांना अटक करण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेविरोधात निदर्शने सुरू असताना ही घटना घडली.

दरम्यान, बांगलादेशात चिन्मय कृष्ण दास यांना अटक आणि हिंदू समुदायावर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ सोमवारी त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे हजारो लोकांनी प्रचंड आंदोलन केल होते. आंदोलक बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयात घुसले आणि त्यांनी तोडफोड केली. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही घटना अत्यंत खेदजनक असल्याचे म्हटलं. याला हिंदू संघर्ष समिती नावाची संघटना जबाबदार असल्याचा आरोप नजरुल यांनी केला. या घटनेत बांगलादेशचा राष्ट्रध्वज जाळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत