शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाने भारतीयांच्या अडचणी वाढल्या; नेमका कोणता निर्णय घेतला?, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 13:13 IST

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना इंग्रजी परीक्षेत उच्च रेटिंग प्राप्त करणे आवश्यक आहे.

ऑस्ट्रेलिया आपला व्हिसा आणि स्थलांतर नियम कठोर करत आहे, ज्यामुळे भारतातील चिंता वाढली आहे. ऑस्ट्रेलियाने सोमवारी सांगितले की, ते आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि कमी-कुशल कामगारांसाठी व्हिसा नियम कठोर करत आहेत. येत्या दोन वर्षांत ऑस्ट्रेलियात स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या निम्मी करणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, नवीन धोरणांनुसार, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना इंग्रजी परीक्षेत उच्च रेटिंग प्राप्त करणे आवश्यक आहे. यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात दीर्घकाळ राहायचे आहे, त्यांनी दुसऱ्यांदा व्हिसासाठी अर्ज केल्यावर त्यांची कसून तपासणी केली जाईल.

ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री क्ले ओ'नील यांनी सांगितले की, 'आमची रणनीती वाढत्या स्थलांतरितांची संख्या पुन्हा सामान्य करेल. परंतु हे केवळ स्थलांतरितांच्या संख्येबद्दल नाही तर हे ऑस्ट्रेलियाच्या भविष्याबद्दल आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की ऑस्ट्रेलियातील स्थलांतरितांची संख्या पुन्हा शाश्वत पातळीवर आणणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, स्थलांतराबाबत एक यंत्रणा निर्माण केली होती जी मोडकळीस आली आहे. ओ'नील म्हणाले की सरकारने परदेशी लोकांची संख्या कमी करण्यासाठी आधीच काही सुधारणा केल्या आहेत, ज्या प्रभावी आहेत आणि स्थलांतरितांच्या संख्येत घट होईल.

ऑस्ट्रेलियात स्थलांतरितांचा महापूर

2022-23 मध्ये निव्वळ इमिग्रेशन विक्रमी 510,000 वर पोहोचल्यानंतर ऑस्ट्रेलियाने व्हिसा नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. ओ'नील म्हणाले की 2022-23 मध्ये स्थलांतरामध्ये ही वाढ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमुळे झाली आहे.

मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियात जातात

दरवर्षी भारतातून मोठ्या संख्येने विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकण्यासाठी जातात. ग्लोबल डेटा आणि बिझनेस इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार, जुलै 2023 पर्यंत 118,869 भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकत होते. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीयांच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियन गृह मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, जून 2021 अखेर, 710,380 भारतीय वंशाचे लोक ऑस्ट्रेलियात राहत होते. 30 जून 2011 रोजी ही संख्या निम्म्याहून कमी होती (337,120). ब्रिटननंतर ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाच्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाVisaव्हिसाIndiaभारत