शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्येवर कब्जा करण्याचा 'नापाक' इरादा, काश्मिरात पाकची मदत...; चीनच्या कारस्थानाबाबत तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 20:18 IST

China : अलीकडच्या काळात शी जिनपिंग हे चीनमध्ये अत्यंत शक्तिशाली झाले आहेत. सत्तेवर त्यांचे पूर्ण नियंत्रण आहे. चीनच्या इतिहासात माओत्से तुंग आणि डेंग यांच्या प्रमाणे अमर होण्याची त्यांची इच्छा आहे.

नवी दिल्ली -शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीन इंडो-पॅसिफिक क्षेत्रात झपाट्याने विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताचा विचार करता त्यांचा दृष्टिकोन अनेक दशकांपासून आक्रमक आहे. LAC वर बऱ्याच दिवसांपासून तणाव आहे. जिनपिंग यांनी अनेकवेळा चिनी सैन्याला युद्धासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.

जागतिक पातळीवर जवळपास प्रत्येक क्षेत्रातच अमेरिकेच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असलेला चीन, LAC वर भारतासोबत तणाव का वाढवत आहे? तर, कॅबिनेट सचिवालयात अतिरिक्त सचिव राहिलेले आणि सध्या सेंटर फॉर चायना अॅनालिसिस अँड स्ट्रॅटेजीचे अध्यक्ष असलेले जयदेव रानडे यांनी, यामागे चीनची मोठी चाल असल्याचे म्हटले आहे. चीनची आक्रमकता, ही दुसरे तिसरे काही नसून भारताकडून वाटत असलेल्या भीतीचा परिणाम आहे!

रानडे यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रातून चीनच्या अशा भीतीसंदर्भात भाष्य केले आहे. ज्यावर मात करण्यासाठी, ते LAC वर आक्रमक आहेत. त्यांनी लिहिले आहे की, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात चीनचे लोकप्रिय पोर्टल झिहूवर 72 पानांचा लेखात प्रसिद्ध करण्यात आला होता. हे पोर्टल बिजिंग म्युनिसिपल कम्युनिस्ट पक्षाच्या देखरेखीखाली चालवले जाते.

संबंधित आर्टिकलमध्ये, भारत भविष्यात चीनसाठी 'मोठी समस्या' बनू शकते, असे म्हणण्यात आले आहे. सध्या भारत चीनच्या बराच मागे असला तरी, लोकसंख्या आणि इतर काही गोष्टींमुळे तो काही वर्षांतच चीनला मागे टाकण्यात सक्षम होईल आणि मग चीनवर सूड उगवेल. याच बरोबर, चीनने अक्साई चीन, तसेच संपूर्ण पीओके, बाल्टिस्तान आणि गिलगिटवर कब्जा करायला हवा.

एवढेच नाही, तर लडाखवरही नियंत्रण ठेवायला हवे आणि काश्मीर ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानला मदत करायला हवी. याशिवाय, भारत कधीही चीनसाठी आव्हान बनू नये, म्हणून चीनने ईशान्य भारतातील राज्ये इतर देशांपासून वेगळी करायला हवीत, असा सल्लाही या लेखातून देण्यात आला आहे.

रानडे यांच्या मते, पुढील काही वर्षे खूप महत्त्वाची असणार आहेत. अलीकडच्या काळात शी जिनपिंग हे चीनमध्ये अत्यंत शक्तिशाली झाले आहेत. सत्तेवर त्यांचे पूर्ण नियंत्रण आहे. चीनच्या इतिहासात माओत्से तुंग आणि डेंग यांच्या प्रमाणे अमर होण्याची त्यांची इच्छा आहे. यासाठी ते आक्रमक विस्तारवादी धोरणानेच पुढे जातील.

चीनच्या कुटिल चालींसंदर्भ रानडे म्हणतात, भारतही चीनचा प्रतिकार करण्यासाठी वेगाने प्रयत्न करत आहे. कट्टर राष्ट्रवादी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दादागिरीपुढे झुकणार नाहीत. ते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आक्रमक चीनचा सामना करत आहेत. त्यासाठी एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर मजबूत आघाड्यांद्वारे चीनची घेराबंदी सुरू आहे. तर दुसरीकडे चीनचे वर्चस्व असलेल्या सप्लाई चेनवरील अवलंबित्व कमी केले जात आहे.

टॅग्स :chinaचीनXi Jinpingशी जिनपिंग