जग सध्या मध्य-पूर्वेतील युद्धाच्या ज्वाळांमध्ये होरपळत असतानाच पाकिस्ताननेभारतावर गंभीर आरोप करून नवीन वाद छेडला आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी दावा केला आहे की, भारत आणखी एका युद्धाची तयारी करत आहे. झरदारी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत भारतासोबत चर्चेचे आवाहनही केले आहे.
झरदारी यांच्या मते, सीमावर्ती भागात भारताच्या हालचाली वाढल्या असून भारत युद्धाच्या मानसिकतेत आहे. तथापि, भारताने नेहमीच हे आरोप फेटाळून लावले असून आपली भूमिका केवळ संरक्षणात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे. एकीकडे युद्धाचा आरोप करतानाच, झरदारी यांनी दोन्ही देशांमधील प्रश्न सोडवण्यासाठी चर्चेचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असे म्हटले आहे.
प्रादेशिक तणावइराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आधीच आखाती देशात अस्थिरता आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु आहे. अशा वेळी पाकिस्तानला भारत आपल्यावर हल्ला करेल अशी भीती सतावत आहे. यामुळे त्यांच्याकडून आलेले हे विधान दक्षिण आशियातील तणाव वाढवणारे ठरू शकते.
अंतर्गत परिस्थितीवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न? राजकीय विश्लेषकांच्या मते, पाकिस्तानातील आर्थिक डबघाई आणि अंतर्गत राजकीय अस्थिरतेवरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी झरदारी यांनी 'भारत कार्ड' वापरले असण्याची शक्यता आहे.