शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्हाला स्वीकारार्ह नाही- चीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 17:23 IST

भारताचं अभिन्न अंग असलेल्या अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्ही कधीही स्वीकारलेलं नाही. तसेच अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे, असं विधान चीननं केलं आहे. 

बीजिंग- डोकलाम वादानंतर आता भारत आणि चीनमध्ये अरुणाचल प्रदेश हे पुढच्या मोठ्या वादाचं कारण ठरू शकतं. भारताचं अभिन्न अंग असलेल्या अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्ही कधीही स्वीकारलेलं नाही. तसेच अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे, असं विधान चीननं केलं आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री गेंग शुआंग यांनी अरुणाचल प्रदेशमधील घुसखोरीनंतर ही प्रतिक्रिया दिली आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये पीपल लिबरेशन आर्मीच्या सैन्यानं घुसखोरी केली होती. त्यावर चीन बोलायला तयार नाही. मीडिया रिपोर्टनुसार, चिनी सैनिक भारताच्या अरुणाचल प्रदेशमधल्या सियांग जिल्ह्यात 200 मीटरपर्यंत आत घुसले होते. या घटनेनंतर गेंग शुआंग म्हणाले, सीमेच्या वादावर आमची भूमिका नेहमी स्पष्ट असते. आम्ही कधीही अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व स्वीकारलेलं नाही. परंतु तुम्ही ज्याबाबत बोलत आहात, त्याची मला काही माहिती नाही. अरुणाचल प्रदेश दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीन करतो आहे. चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा 3 हजार 488 किमी लांब आहे. या रेषेबाबतचा वाद सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांनी आतापर्यंत विशेष प्रतिनिधींच्या माध्यमातून 19 फेऱ्यांतील चर्चा झाली आहे. चिनी सैनिकांनी शस्त्रास्त्रांसह गेल्या महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारतीय लष्करानं यांचा हा प्रयत्न हाणून पाडला होता.चीन आणि भारताच्या सीमेसंबंधी वाद सोडवण्यासाठी एक चांगल्या प्रकारची प्रणाली विकसित आहे. या प्रणालीअंतर्गत चीन आणि भारत सीमा वादाशी संबंधित प्रकरणं सोडवू शकतो. सीमेवर शांतता प्रस्थापित करणं हे चीन आणि भारत दोघांसाठीही गरजेचं आहे, असंही गेंग शुआंग म्हणाले आहेत. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत असतो. तसेच भारतीय अधिकाऱ्यांकडून या प्रदेशावरील अधिकाराबाबत करण्यात येणाऱ्या दाव्यांवर चीनकडून सातत्याने सातत्याने विरोध करण्यात येतो. दरम्यान, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन महिन्यांपूर्वी सिक्कीममधील भारत आणि चीन सीमेजवळील नथू ला भागाचा दौरा केला होता. त्यावेळी सीतारामन यांनी सीमेपलिकडे उभ्या असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांची भेटही घेतली होती.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीनIndiaभारत