शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार, विरोधात अटक वॉरंट जारी; कोर्टाने १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 15:12 IST

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बांगलादेशमधील कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाचे मुख्य अभियोक्ता मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी ही माहिती दिली.

बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्याविरुद्ध मानवाधिकार उल्लंघनाशी संबंधित अनेक प्रकरणांची चौकशी सुरू आहे. विद्यार्थी आंदोलनात प्राण गमावलेल्या अनेक विद्यार्थ्यांची हत्या केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी आता शेख हसीना यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. 

उत्तर कोरियाने संविधानात बदल केले, दक्षिण कोरियाचे टेन्शन वाढले; वाचा नेमकं प्रकरण काय?

बांगलादेशात शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतालाही राजनैतिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शेख हसीना यांच्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांवरही परिणाम होऊ शकतो, असे मानले जात आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात २०१३ मध्ये प्रत्यार्पण करार झाला होता. यामुळे आता बांगलादेशमधील सरकारने शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करु शकते.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील प्रत्यार्पण करारानुसार, सीमावाद, दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना दोन्ही देशांच्या विनंतीनुसार परत पाठवले जाईल, असा त्यावेळी करार झाला होता. 

शेख हसीना यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हाही दाखल आहे.  

२०१६ च्या सुधारणेनुसार, प्रत्यार्पणासाठी पुराव्याची आवश्यकता देखील रद्द करण्यात आली आहे, जर कोणत्याही देशाच्या न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले असेल तर प्रत्यार्पण करावे लागेल. मात्र, कराराच्या कलम 6 नुसार गुन्हा राजकीय स्वरूपाचा असेल तर प्रत्यार्पणाला नकार दिला जाऊ शकतो. याशिवाय लष्करी गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्येही प्रत्यार्पणाला नकार दिला जाऊ शकतो.

या वर्षी जुलै महिन्यात बांगलादेशात आरक्षणाविरोधात देशभरात विद्यार्थी आंदोलन झाले होते. महिनाभर चाललेल्या या आंदोलनात चारशेहून अधिक जणांना जीव गमवावा लागला. यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन ढाक्याला गेले. ५ ऑगस्ट रोजी सुरक्षेच्या कारणास्तव शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरने भारतात आल्या. तेव्हापासून शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. यानंतर बांगलादेशात सत्तांत्तर झाले. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश