शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार, विरोधात अटक वॉरंट जारी; कोर्टाने १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 15:12 IST

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बांगलादेशमधील कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाचे मुख्य अभियोक्ता मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी ही माहिती दिली.

बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्याविरुद्ध मानवाधिकार उल्लंघनाशी संबंधित अनेक प्रकरणांची चौकशी सुरू आहे. विद्यार्थी आंदोलनात प्राण गमावलेल्या अनेक विद्यार्थ्यांची हत्या केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी आता शेख हसीना यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. 

उत्तर कोरियाने संविधानात बदल केले, दक्षिण कोरियाचे टेन्शन वाढले; वाचा नेमकं प्रकरण काय?

बांगलादेशात शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतालाही राजनैतिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शेख हसीना यांच्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांवरही परिणाम होऊ शकतो, असे मानले जात आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात २०१३ मध्ये प्रत्यार्पण करार झाला होता. यामुळे आता बांगलादेशमधील सरकारने शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करु शकते.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील प्रत्यार्पण करारानुसार, सीमावाद, दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना दोन्ही देशांच्या विनंतीनुसार परत पाठवले जाईल, असा त्यावेळी करार झाला होता. 

शेख हसीना यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हाही दाखल आहे.  

२०१६ च्या सुधारणेनुसार, प्रत्यार्पणासाठी पुराव्याची आवश्यकता देखील रद्द करण्यात आली आहे, जर कोणत्याही देशाच्या न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले असेल तर प्रत्यार्पण करावे लागेल. मात्र, कराराच्या कलम 6 नुसार गुन्हा राजकीय स्वरूपाचा असेल तर प्रत्यार्पणाला नकार दिला जाऊ शकतो. याशिवाय लष्करी गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्येही प्रत्यार्पणाला नकार दिला जाऊ शकतो.

या वर्षी जुलै महिन्यात बांगलादेशात आरक्षणाविरोधात देशभरात विद्यार्थी आंदोलन झाले होते. महिनाभर चाललेल्या या आंदोलनात चारशेहून अधिक जणांना जीव गमवावा लागला. यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन ढाक्याला गेले. ५ ऑगस्ट रोजी सुरक्षेच्या कारणास्तव शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरने भारतात आल्या. तेव्हापासून शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. यानंतर बांगलादेशात सत्तांत्तर झाले. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश