शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जगभर : ‘ब्लड मनी’मुळे टळली भारतीयाची फाशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 08:33 IST

संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांत काही गंभीर गुन्ह्यांवर सजा माफही केली जाते. त्यातलाच एक नियम आहे ‘ब्लड मनी.’ विशेषत: एखाद्या गुन्ह्यात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ‘ब्लड मनी’च्या माध्यमातून त्या व्यक्तीची फाशी रद्द होऊ शकते. 

प्रत्येक देशात गुन्हेगारीसंदर्भात वेगवेगळे कायदे आहेत. काही ठिकाणी कायदे अतिशय कडक, तर काही ठिकाणी त्यातल्या त्यात मवाळ कायदे आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून अनेक देशांत फाशीची शिक्षा आता रद्द करण्यात आली आहे. तथापि, काही देशांत ही पद्धती अजूनही चालू आहे. त्या-त्या देशाची संस्कृती, परंपरा यांचाही अंमल बऱ्याचदा तिथल्या कायद्यांवर पडलेला दिसतो. संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांत काही गंभीर गुन्ह्यांवर सजा माफही केली जाते. त्यातलाच एक नियम आहे ‘ब्लड मनी.’ विशेषत: एखाद्या गुन्ह्यात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ‘ब्लड मनी’च्या माध्यमातून त्या व्यक्तीची फाशी रद्द होऊ शकते. 

संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘ब्लड मनी’च्या माध्यमातून नुकतेच एका भारतीय तरुणाला नवजीवन मिळाले आहे. केरळच्या या तरुणाचे नाव आहे बेक्स कृष्णन. खरे तर २०१२चा हा खटला. गेल्या अनेक वर्षांपासून बेक्स तुरुंगातच होता. निष्काळजीपणे वाहन चालवून एका सुदानी व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने यूएईच्या सर्वोच्च न्यायालयाने बेक्सला फाशीची शिक्षा सुनावली होती. बेक्सच्या कुटुंबाने तेव्हापासूनच ‘ब्लड मनी’च्या माध्यमातून त्याची फाशी माफ करण्याचा प्रयत्न चालवला होता.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘ब्लड मनी’ ही न्यायदानाची एक पद्धत मानली जाते. एखाद्याच्या मृत्यूची भरपाई कशानेही करता येत नाही. कारण ती व्यक्ती काही परत येणार नसते. त्यामुळे अपराध्याकडून भलीमोठी रक्कम घेतली जाते आणि ती पीडित परिवारातील व्यक्तींना दिली जाते. त्यालाच ‘ब्लड मनी’ म्हटले जाते; पण यात सर्वांत महत्त्वाचा नियम म्हणजे या तोडग्याला पीडित व्यक्तीच्या कुटुंबाची मान्यता असलीच पाहिजे. त्यांनी परवानगी दिली तरच हा पर्याय वापरला जाऊ शकतो.   

बेक्सचे कुटुंबीय तसे सर्वसामान्य; पण तरीही आपला मुलगा वाचावा, त्याला जीवनदान मिळावे यासाठी गेल्या दहा वर्षांपासून ते प्रयत्न करीत होते. पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या ते अक्षरश:  हातापाया पडत होते; पण बेक्सला माफी देण्यास हे कुटुंब तयार नव्हते. २०२१च्या सुरुवातीला तर ते पुन्हा सुदानला निघून गेले. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क अधिकच कठीण झाला. बेक्सला वाचविण्यात आपण अपयशी ठरू असे बेक्सच्या कुटुंबीयांनाही वाटायला लागले. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी  लुलू ग्रुपचे प्रसिद्ध उद्योजक अनिवासी भारतीय युसूफ अली यांची मदत मागितली. नेमके काय झाले होतेे हे समजून घेतल्यानंतर त्यांनी त्वरित सूत्रे हलवली, पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांना सुदानमध्ये शोधूनही काढले आणि त्यांच्याशी बातचीत सुरू केली. खरे तर दोन्ही कुटुंबांशी त्यांचा काहीही संबंध नव्हता.

तरीही दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांशी त्यांनी अनेकदा संवाद साधला. पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांना अनेक वेळा विनवण्या, विनंत्या केल्या; पण बेक्सला माफ करायला ते तयार नव्हते. तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. अखेर त्यांच्या उदंड मेहनतीला आणि प्रयत्नांना यश आले, ‘ब्लड मनी’साठी पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्यांनी राजी केले आणि गेल्या सुमारे दहा वर्षांपासून सुरू असलेला अतिशय किचकट असा तिढा सोडवला, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे युसूफ अली एवढ्यावरच थांबले नाहीत, ‘ब्लड मनी’साठी ज्या रकमेची तडजोड झाली, ते तब्बल पाच लाख दिऱ्हम म्हणजे सुमारे एक कोटी रुपये कोर्टातही जमा केले.

बेक्स आता तुरुंगातून सुटून केरळमधल्या आपल्या कुटुंबीयांना भेटू शकतो. आपली फाशी रद्द झाली हे ऐकल्यानंतर बेक्सलाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण इतक्या वर्षांनंतर तुरुंगातून सुटण्याची आणि आपली फाशी रद्द होण्याची शक्यता त्यानेही सोडून दिली होती. आपल्या मृत्यूची तो फक्त वाट पाहात होता. या घटनेनंतर तुरुंगात भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी बोलताना बेक्स अतिशय भावुक झाला होता. त्याला रडूच कोसळले. आपण जिवंत राहू, आपल्या कुटुंबीयांना परत भेटू, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, असे त्याने सांगितले. कोणाचे कोण, पण काहीही संबंध नसताना युसूफ अली यांनी त्याच्यासाठी जी अपार मेहनत घेतली, त्याबद्दल त्याला अतिशय गहिवरुन आले. कुटुंबीयांना भेटण्याआधी मी युसूफ अलींना भेटेन, त्यांच्या पायावर डोके ठेवेन आणि मगच घरी जाईन असे तो म्हणाला!

१७ भारतीय तरुणांना जीवनदान!‘ब्लड मनी’ दिला म्हणजे आरोपींची निर्दोष सुटका होते असे नाही, त्या व्यक्तीचा मृत्युदंड तेवढा वाचतो. न्यायालय त्या व्यक्तीला तुरुंगवासाची सजा देऊच शकते. काही वर्षांपूर्वी असाच एक प्रसंग यूएईमध्ये घडला होता. पाकिस्तानी नागरिक मिश्री खान याच्या मृत्यूप्रकरणी कोर्टाने पंजाब आणि हरयाणाच्या १७ भारतीय युवकांना दोषी मानून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती, पण एस.एस. ओबेरॉय या दानशूराने मध्यस्ती केली. आठ कोटी रुपये ‘ब्लड मनी’ देऊन या तरुणांना पुनर्जन्म दिला होता. कोर्टाने हा तोडगा स्वीकारताना अपराध्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली, पण त्यांनी आधीच तीन वर्षं तुरुंगात काढली असल्याने त्यांची सुटका करण्यात आली होती.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय