शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

जगभर : ‘ब्लड मनी’मुळे टळली भारतीयाची फाशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 08:33 IST

संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांत काही गंभीर गुन्ह्यांवर सजा माफही केली जाते. त्यातलाच एक नियम आहे ‘ब्लड मनी.’ विशेषत: एखाद्या गुन्ह्यात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ‘ब्लड मनी’च्या माध्यमातून त्या व्यक्तीची फाशी रद्द होऊ शकते. 

प्रत्येक देशात गुन्हेगारीसंदर्भात वेगवेगळे कायदे आहेत. काही ठिकाणी कायदे अतिशय कडक, तर काही ठिकाणी त्यातल्या त्यात मवाळ कायदे आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून अनेक देशांत फाशीची शिक्षा आता रद्द करण्यात आली आहे. तथापि, काही देशांत ही पद्धती अजूनही चालू आहे. त्या-त्या देशाची संस्कृती, परंपरा यांचाही अंमल बऱ्याचदा तिथल्या कायद्यांवर पडलेला दिसतो. संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांत काही गंभीर गुन्ह्यांवर सजा माफही केली जाते. त्यातलाच एक नियम आहे ‘ब्लड मनी.’ विशेषत: एखाद्या गुन्ह्यात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ‘ब्लड मनी’च्या माध्यमातून त्या व्यक्तीची फाशी रद्द होऊ शकते. 

संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘ब्लड मनी’च्या माध्यमातून नुकतेच एका भारतीय तरुणाला नवजीवन मिळाले आहे. केरळच्या या तरुणाचे नाव आहे बेक्स कृष्णन. खरे तर २०१२चा हा खटला. गेल्या अनेक वर्षांपासून बेक्स तुरुंगातच होता. निष्काळजीपणे वाहन चालवून एका सुदानी व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने यूएईच्या सर्वोच्च न्यायालयाने बेक्सला फाशीची शिक्षा सुनावली होती. बेक्सच्या कुटुंबाने तेव्हापासूनच ‘ब्लड मनी’च्या माध्यमातून त्याची फाशी माफ करण्याचा प्रयत्न चालवला होता.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘ब्लड मनी’ ही न्यायदानाची एक पद्धत मानली जाते. एखाद्याच्या मृत्यूची भरपाई कशानेही करता येत नाही. कारण ती व्यक्ती काही परत येणार नसते. त्यामुळे अपराध्याकडून भलीमोठी रक्कम घेतली जाते आणि ती पीडित परिवारातील व्यक्तींना दिली जाते. त्यालाच ‘ब्लड मनी’ म्हटले जाते; पण यात सर्वांत महत्त्वाचा नियम म्हणजे या तोडग्याला पीडित व्यक्तीच्या कुटुंबाची मान्यता असलीच पाहिजे. त्यांनी परवानगी दिली तरच हा पर्याय वापरला जाऊ शकतो.   

बेक्सचे कुटुंबीय तसे सर्वसामान्य; पण तरीही आपला मुलगा वाचावा, त्याला जीवनदान मिळावे यासाठी गेल्या दहा वर्षांपासून ते प्रयत्न करीत होते. पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या ते अक्षरश:  हातापाया पडत होते; पण बेक्सला माफी देण्यास हे कुटुंब तयार नव्हते. २०२१च्या सुरुवातीला तर ते पुन्हा सुदानला निघून गेले. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क अधिकच कठीण झाला. बेक्सला वाचविण्यात आपण अपयशी ठरू असे बेक्सच्या कुटुंबीयांनाही वाटायला लागले. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी  लुलू ग्रुपचे प्रसिद्ध उद्योजक अनिवासी भारतीय युसूफ अली यांची मदत मागितली. नेमके काय झाले होतेे हे समजून घेतल्यानंतर त्यांनी त्वरित सूत्रे हलवली, पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांना सुदानमध्ये शोधूनही काढले आणि त्यांच्याशी बातचीत सुरू केली. खरे तर दोन्ही कुटुंबांशी त्यांचा काहीही संबंध नव्हता.

तरीही दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांशी त्यांनी अनेकदा संवाद साधला. पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांना अनेक वेळा विनवण्या, विनंत्या केल्या; पण बेक्सला माफ करायला ते तयार नव्हते. तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. अखेर त्यांच्या उदंड मेहनतीला आणि प्रयत्नांना यश आले, ‘ब्लड मनी’साठी पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्यांनी राजी केले आणि गेल्या सुमारे दहा वर्षांपासून सुरू असलेला अतिशय किचकट असा तिढा सोडवला, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे युसूफ अली एवढ्यावरच थांबले नाहीत, ‘ब्लड मनी’साठी ज्या रकमेची तडजोड झाली, ते तब्बल पाच लाख दिऱ्हम म्हणजे सुमारे एक कोटी रुपये कोर्टातही जमा केले.

बेक्स आता तुरुंगातून सुटून केरळमधल्या आपल्या कुटुंबीयांना भेटू शकतो. आपली फाशी रद्द झाली हे ऐकल्यानंतर बेक्सलाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण इतक्या वर्षांनंतर तुरुंगातून सुटण्याची आणि आपली फाशी रद्द होण्याची शक्यता त्यानेही सोडून दिली होती. आपल्या मृत्यूची तो फक्त वाट पाहात होता. या घटनेनंतर तुरुंगात भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी बोलताना बेक्स अतिशय भावुक झाला होता. त्याला रडूच कोसळले. आपण जिवंत राहू, आपल्या कुटुंबीयांना परत भेटू, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, असे त्याने सांगितले. कोणाचे कोण, पण काहीही संबंध नसताना युसूफ अली यांनी त्याच्यासाठी जी अपार मेहनत घेतली, त्याबद्दल त्याला अतिशय गहिवरुन आले. कुटुंबीयांना भेटण्याआधी मी युसूफ अलींना भेटेन, त्यांच्या पायावर डोके ठेवेन आणि मगच घरी जाईन असे तो म्हणाला!

१७ भारतीय तरुणांना जीवनदान!‘ब्लड मनी’ दिला म्हणजे आरोपींची निर्दोष सुटका होते असे नाही, त्या व्यक्तीचा मृत्युदंड तेवढा वाचतो. न्यायालय त्या व्यक्तीला तुरुंगवासाची सजा देऊच शकते. काही वर्षांपूर्वी असाच एक प्रसंग यूएईमध्ये घडला होता. पाकिस्तानी नागरिक मिश्री खान याच्या मृत्यूप्रकरणी कोर्टाने पंजाब आणि हरयाणाच्या १७ भारतीय युवकांना दोषी मानून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती, पण एस.एस. ओबेरॉय या दानशूराने मध्यस्ती केली. आठ कोटी रुपये ‘ब्लड मनी’ देऊन या तरुणांना पुनर्जन्म दिला होता. कोर्टाने हा तोडगा स्वीकारताना अपराध्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली, पण त्यांनी आधीच तीन वर्षं तुरुंगात काढली असल्याने त्यांची सुटका करण्यात आली होती.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय