शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

"मी देशासोबत गद्दारी केली नाही, भारताची शत्रू नाही, मलाही जगण्याचा अधिकार पण पाकिस्तान..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 13:05 IST

भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू आता नसरुल्लाहसोबत पाकिस्तानात फिरत आहे.

भारतातूनपाकिस्तानात गेलेली अंजू आता नसरुल्लाहसोबत पाकिस्तानात फिरत आहे. अंजूने ब्लॉगर ताहिर खानशी संवाद साधला. मी माझ्या देशासोबत कोणतीही गद्दारी केलेली नाही. भारत माझी आई आहे आणि माझा जन्म तिथे झाला. पण पाकिस्तानचे लोकही खूप चांगले आहेत, इथे सकारात्मक वातावरण आहे. नसरुल्लासोबतही भारतात येईन असं अंजूने म्हटलं आहे.

अंजू आणि नसरुल्ला इस्लामाबाद, ब्लॉगरच्या रिसॉर्टमध्ये गेले होते. तेव्हा ब्लॉगर ताहिर खानशी त्यांनी संवाद साधला. ताहिर खान यांच्याशी बोलताना अंजू म्हणाली की मी देशाशी गद्दारी केली नाही, मुलांचाही विश्वासघात केला नाही. पाकिस्तान कसं वाटतं हे विचारलं तेव्हा अंजूने उत्तर दिले की "येथे सर्व काही सकारात्मक आहे. हे एक सुंदर ठिकाण आहे आणि नसरुल्लाह देखील माझ्याबद्दल पूर्णपणे सकारात्मक आहेत."

"भारतातील लोक म्हणतात की, मी येथे य़ेऊन पाकिस्तानची स्तुती करत आहे, परंतु दोन्ही देशातील लोकांमध्ये द्वेष नाही. पूर्वी भारत आणि पाकिस्तान एक होते, एकच जमीन होती. सीमा नंतर केल्या जातात. माझं भारतावर प्रेम आहे आणि मी भारतात जाणार आहे. माझ्यासाठी सकारात्मक विचार करा" असे आवाहनही तिने देशवासीयांना केले आहे. "मी भारताची शत्रू नाही, मी सुद्धा एक माणूस आहे. मलाही जगण्याचा अधिकार आहे."

"इथले लोक भारताला शत्रू मानत नाहीत हे मी इथे पाहिले आहे. माझेही माझ्या भूमीवर प्रेम आहे आणि भारत माझी आई आहे. माझा जन्म भारतात झाला. लोकांनी खूप द्वेष केला आहे. युद्ध लढले आणि आता येथे प्रेम जगले पाहिजे" असं अंजू म्हणते. ब्लॉगर ताहिर खानने अंजूशी बोलताना सांगितले की, त्याला भारतीय क्रिकेटर विराट कोहली आवडतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान