शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 14:35 IST

युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या कामगारांच्या कमतरतेची पूर्तता करण्यासाठी रशियाने २०२५ च्या अखेरीस भारतातून १० लाख कामगारांना बोलावण्याची योजना आखली आहे.

रशियामधूनभारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. रशियामध्ये गेल्या काही दिवसांपासून कामगारांची कमतरता आहे. रशियाने २०२५ च्या अखेरीस भारतातून १० लाख कामगारांना बोलावण्याची योजना आखली आहे. युक्रेन युद्धामुळे रशियामध्ये कामगारांची कमतरता दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती

उरल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे प्रमुख आंद्रेई बेसेदिन यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, या संदर्भात भारतासोबत करार अंतिम झाला आहे. २०२५ पर्यंत १० लाख भारतीय कामगार रशियात, विशेषतः स्वेर्दलोव्हस्क प्रदेशात पोहोचतील. इतकेच नाही तर भारतीय कामगारांना मदत करण्यासाठी स्वेर्दलोव्हस्कची राजधानी येकातेरिनबर्गमध्ये एक नवीन भारतीय दूतावास देखील उघडणार आहे.

रशियाचा स्वेर्दलोव्हस्क प्रदेश हे उद्योगाचे एक प्रमुख केंद्र आहे. धातू आणि यंत्रसामग्रीशी संबंधित कारखान्यांमध्ये कामगारांची मोठी कमतरता आहे. बेसेदिन यांच्या मते, युक्रेन युद्धामुळे रशियन कारखान्यात काम करत नाहीत. अशा परिस्थितीत, भारतातील मेहनती आणि कुशल कामगार ही पोकळी भरून काढू शकतात. येकातेरिनबर्ग शहर ट्रान्स-सायबेरियन रेल्वेद्वारे युरोप आणि आशियाला जोडणारे एक प्रमुख लॉजिस्टिक्स हब बनत आहे. यासोबतच, हे शहर आर्क्टिक विकासातही मोठी भूमिका बजावेल. भारतीय कामगारांना येथे धातू आणि यंत्रसामग्री उद्योगात मोठी संधी मिळेल.

थंड आव्हान असेल...

येकातेरिनबर्गचे हवामान भारतीयांसाठी एक कठीण काम असू शकते. उन्हाळ्यात तेथील तापमान २४ अंशांपर्यंत राहते, पण हिवाळ्यात ते -१७ अंशांपर्यंत खाली जाते. ऑक्टोबर ते एप्रिल पर्यंत बर्फ पडलेला असतो. बहुतेक भारतीय कामगारांना मध्य पूर्वेतील उष्ण हवामानात काम करण्याची सवय असते, त्यामुळे रशियाची थंडी त्यांच्यासाठी एक नवीन आव्हान असेल. याशिवाय, जे शुद्ध शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करणे देखील कठीण होऊ शकते. रशियामध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे उबदार कपडे सहज उपलब्ध आहेत.

भारताव्यतिरिक्त, श्रीलंका, उत्तर कोरियातील लोकांनाही संधी

रशिया फक्त भारतावर अवलंबून नाही. बेसेदिन म्हणाले की, श्रीलंका आणि उत्तर कोरियामधूनही कामगार आणण्याची योजना आहे. उत्तर कोरियातील कामगार खूप मेहनती आहेत. पण भारतीय आणि श्रीलंकेतील कामगारांना रशियामध्ये जुळवून घेणे सोपे होणार नाही. रशियाला आधीच ताजिकिस्तान, उझबेकिस्तान सारख्या माजी सोव्हिएत देशांमधील कामगारांसोबत काम करण्याची सवय आहे, त्यांना रशियन भाषा आणि संस्कृती समजते. 

टॅग्स :russiaरशियाIndiaभारत