शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

काय? - ‘चार पायांवर’ चालणारी माणसं?; समाजानं झिडकारल्यानं राहिले अलिप्त! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 07:35 IST

तुर्कीत घडलेल्या एका घटनेमुळे शास्त्रज्ञांना आणि संपूर्ण जगालाच एका मोठ्या कोड्यात टाकलं आहे.

‘चार पायांवरून’ दोन पायांवर चालण्याचा माणसाचा प्रवास अतिशय मोठा आहे. याच प्रवासात जगातील सर्वांत तीक्ष्ण मेंदूचा प्राणी ही बिरुदावली मिळवण्यातही माणसाची हजारो वर्षं गेली. उत्क्रांतीच्या काळातून मोठी मजल दरमजल करत आपण क्रांती केली. पण समजा, आपण पुन्हा उलट्या गतीनं प्रवास करत ‘रिव्हर्स इव्हॉल्यूशन’नं मागे मागे जात परत अप्रगत झालो, चार पायांवर चालायला लागलो, गुहेत राहायला, कच्चं मांस खायला लगलो तर?.. असं होऊ शकतं?..

तुर्कीत घडलेल्या एका घटनेमुळे शास्त्रज्ञांना आणि संपूर्ण जगालाच एका मोठ्या कोड्यात टाकलं आहे. तुर्कीच्या दक्षिण भागात राहणाऱ्या एका कुटुंबात अतिशय आश्चर्यजनक अशी घटना घडली आहे. रेसिट आणि हॅटिस उलास या दाम्पत्याला एकूण १९ मुलं होती, पण त्यातली  चार मुलं आणि एक मुलगी दोन पायांवर चालू शकत नव्हते. आजही ते चक्क ‘चार पायांवर’ चालतात! ते माणसांसारखे बोलतात, विचार करतात, त्यांच्या इतर सगळ्या कृती माणसांसारख्या आहेत, पण चालतात मात्र चार पायांच्या प्राण्यांप्रमाणे!

पूर्ण प्रगत झालेला माणूस चार पायांवरून दोन पायांवर चालायला लागला, तेव्हापासून एकाही कुटुंबात आजवर कधीच ‘उलटी प्रगती’ दिसली नाही. म्हणजे कोणत्याच कुटुंबातला एकही सदस्य पुन्हा चार पायांवर चालताना आढळला नाही. मग हे कसं काय झालं? या कुटुंबातली माणसं आजही चार पायांवर का चालतात? - या घटनेनं संशोधकही हादरले आहेत. आजचा प्रगत माणूस परत पाषाणयुगात आणि त्याही आधीच्या परिस्थितीत गेला तर काय, तो तसा पुन्हा जाऊ शकतो का, या प्रश्नांच्या उत्तरासाठी संशोधक आता सरसावले आहेत. 

अर्थात ही घटना आजची नाही. याच कुटुंबातल्या सदस्यांवर २००६मध्ये एक डॉक्युमेंटरीही प्रकाशित झाली होती. त्यात या परिवारातील चार पायांवर चालणाऱ्या सदस्यांची लाइफस्टाइल दाखवली गेली होती. त्यावेळीही मोठी खळबळ उडाली होती. ‘द फॅमिली दॅट वॉक्स ऑन ऑल फोर’ असं या डॉक्युमेंटरीचं नाव होतं. लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्सचे प्रोफेसर हम्फ्रे यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त करताना म्हटलं आहे, मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, की आधुनिक माणूस पुन्हा कधी जनावरांच्या, प्राण्यांच्या स्थितीत जाईल आणि चार पायांवर चालायला लागेल! या कुटुंबातील सदस्यांना कुठल्या त्रासांना सामोरं जावं लागत असेल, याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. 

यासंदर्भाच्या एका अहवालात म्हटलं आहे, या परिवारातील सदस्यांचं बाकी वागणं माणसासारखं वाटत असलं तरी मानसिक पातळीवरही ते दिव्यांग आहेत. अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो. आपल्या शरीराचा तोल ते व्यवस्थित सांभाळू शकत नाहीत.  प्रो. हम्फ्रे यांच्या म्हणण्यानुसार मानवी उत्क्रांतीच्या संक्रमणकालीन टप्प्याची झलक या सदस्यांमुळे मिळते. त्यांची चतुष्पाद चाल चिंपांझींसारखी असली तरी, ती सरळ चालण्याआधीची मध्यस्थ अवस्था दर्शवते. 

चार पायांवर चालत असल्यामुळे उलास परिवाराला आणि त्यातील सदस्यांना खूप काळ जगापासून दूर राहावं लागलं. जेव्हा जेव्हा हे सदस्य लोकांसमोर आले तेव्हा तेव्हा त्यांना लोकांच्या टोमण्यांनाही कायम सामोरं जावं लागलं. त्यामुळे बाह्य जगापासून ते लांबच राहिले. २००५पर्यंत तर त्यांच्याबाबत कोणाला माहीतही नव्हतं. या परिवाराला एक अतिशय दुर्लभ असा आजार असल्याचंही मानलं जातं. त्यामुळेच त्यांना दोन पायांवर चालता येत नाही आणि चालताना हातांचाही आधार घ्यावा लागतो. 

तुर्कीच्या एका प्राध्यापकाचा अप्रकाशित शोधनिबंध एका ब्रिटिश संशोधकाच्या हाती लागल्यानंतर त्याचा त्यावर विश्वासच बसेना. या परिवारातील सदस्यांना ‘यूनर टॅन सिंड्रोम’ हा दुर्धर आजार झाला असल्याचा दावा या शोधनिबंधात करण्यात आला होता. हा आजार झालेल्या लोकांना चालताना पायांबरोबर हातांचाही आधार घ्यावा लागतो, असं त्यात म्हटलं आहे. उलास कुटुंबातील या सदस्यांच्या चार पायांवर चालण्याच्या कृतीमुळे मानवी उत्क्रांतीच्या सिद्धांतालाच आव्हान दिलं गेल्याचं मानलं जात आहे. यासंदर्भात अजूनही संशोधन सुरू आहे. 

समाजानं झिडकारल्यानं राहिले अलिप्त! लोकांपासून, समाजापासून कायम दूर राहावं लागल्यामुळे उलास कुटुंबातील या सदस्यांना शाळेतही जाता आलं नाही. लोकांबरोबरच्या त्यांच्या आठवणी अतिशय दु:खद आहेत. कोणीच त्यांना जवळ न केल्यामुळे समाजापासून ते अलिप्तच राहिले. चार पायांवर चालणाऱ्या या बहीण-भावांचं वय आता २५ ते ४१ वर्षे इतके आहे. समाजात न मिसळल्यामुळे, शाळेत न गेल्याने इतर कोणतीच भाषा त्यांना येत नसली, तरी कुर्दिश भाषा त्यांना समजते, त्या बळावर त्यांचं धकून जातं!

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीInternationalआंतरराष्ट्रीय