शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

Air India चं विमान १२९ प्रवाशांना घेऊन काबुलवरून दिल्लीला पोहोचलं; प्रवासी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 22:00 IST

Afghanistan Crisis : १२९ प्रवाशांसह विमान काबुलहून पोहोचलं दिल्लीला. अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही देश सोडल्याची माहिती. 

ठळक मुद्दे १२९ प्रवाशांसह विमान काबुलहून पोहोचलं दिल्लीला. अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही देश सोडल्याची माहिती. 

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मायदेशी आणण्यासाठी पाठवण्यात आलेलं एअर इंडियाचं विमान (Air India) रविवारी रात्री सुरक्षित दिल्ली विमानतळावर पोहोचलं. अफगाणिस्तानमधील बहुतांश भागांवर पुन्हा एकदा तालिबाननं नियंत्रण मिळवलं आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही देश सोडला आहे. अशा परिस्थितीत एअर इंडियाचं विमानन AI244 हे प्रवाशांना घेऊन भारतात परतलं आहे.

उड्डाणं रद्द करण्याची कोणतीही योजना नसल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसंच सोमवारीदेखील विमान उड्डाण घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या केवळ एअर इंडिया ही एकमेव विमान कंपनी भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान सुरू आहे. विमानानं रविवारी दुपारी ४० प्रवाशांसह दिल्लीहून काबुलसाठी उड्डाण घेतलं होतं, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. दुपारी जवळपास १२.४५ मिनिटांनी AI243 हे विमान दिल्लीहून रवाना झालं. परंतु काबुल विमानतळाजवळ हवेत जवळपास एक तास चक्कर मारावी लागली, कारण उतरण्यासाठी एटीसीक़डून परवानगी मिळत नव्हती असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

दरम्यान, विमानाला उतरण्यास विलंब करण्यामागचं कारण काय होतं हे स्पष्ट नसल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर AI 244 हे विमान भारतीय वेळेनुसार जवळपास संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास काबुलवरून रवाना करण्यात आलं. सध्या कंपनी तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि आवश्यकतेनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

लोकांसोबत गद्दारी"जेव्हा मी त्या ठिकाणाहून पळालो आहे तेव्हा तुम्ही तिकडची परिस्थिती काय आहे हे समजू शकता. अशरफ गनी याची टीम गद्दार आहे. त्यांनी अफगाणिस्तानच्या लोकांसोबत गद्दारी केली आहे. लोक त्यांना माफ करणार नाहीत," अशी प्रतिक्रिया अफगाणिस्तानचे माजी खासदार जमील करझई यांनी दिल्लीला पोहोचल्यानंतर दिली. "अफगाणिस्तानच्या बहुतांश भागात शांतता आहे. जवळपास अनेक राजकीय लोकांनी काबुल सोडलं. २०० जण दिल्लीला आले आहेत. मला असं वाटतंय हे नवं तालिबान आहे. ते महिलांनादेखील काम करण्याची परवानगी देतील,"अशी प्रतिक्रिया अफगाण राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार रिझवानुल्ला अहमदझई यांनी दिल्लीला आल्यानंतर दिली. "जगानं अफगाणिस्तानला वेगळं सोडलं यावर विश्वास बसत नाही. त्या ठिकाणी आमचा मित्रपरिवार आहे, त्याचा खून होऊ शकतो. तालिबान आम्हालाही मारू शकते. आमच्या महिलांना आथा त्या ठिकाणी अधिक अधिकार मिळणार नाही," अशी प्रतिक्रिया भारतात आलेल्या एका महिलेनं दिली. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानIndiaभारतdelhiदिल्लीPresidentराष्ट्राध्यक्षWomenमहिला