शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

Air India चं विमान १२९ प्रवाशांना घेऊन काबुलवरून दिल्लीला पोहोचलं; प्रवासी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 22:00 IST

Afghanistan Crisis : १२९ प्रवाशांसह विमान काबुलहून पोहोचलं दिल्लीला. अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही देश सोडल्याची माहिती. 

ठळक मुद्दे १२९ प्रवाशांसह विमान काबुलहून पोहोचलं दिल्लीला. अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही देश सोडल्याची माहिती. 

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मायदेशी आणण्यासाठी पाठवण्यात आलेलं एअर इंडियाचं विमान (Air India) रविवारी रात्री सुरक्षित दिल्ली विमानतळावर पोहोचलं. अफगाणिस्तानमधील बहुतांश भागांवर पुन्हा एकदा तालिबाननं नियंत्रण मिळवलं आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही देश सोडला आहे. अशा परिस्थितीत एअर इंडियाचं विमानन AI244 हे प्रवाशांना घेऊन भारतात परतलं आहे.

उड्डाणं रद्द करण्याची कोणतीही योजना नसल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसंच सोमवारीदेखील विमान उड्डाण घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या केवळ एअर इंडिया ही एकमेव विमान कंपनी भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान सुरू आहे. विमानानं रविवारी दुपारी ४० प्रवाशांसह दिल्लीहून काबुलसाठी उड्डाण घेतलं होतं, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. दुपारी जवळपास १२.४५ मिनिटांनी AI243 हे विमान दिल्लीहून रवाना झालं. परंतु काबुल विमानतळाजवळ हवेत जवळपास एक तास चक्कर मारावी लागली, कारण उतरण्यासाठी एटीसीक़डून परवानगी मिळत नव्हती असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

दरम्यान, विमानाला उतरण्यास विलंब करण्यामागचं कारण काय होतं हे स्पष्ट नसल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर AI 244 हे विमान भारतीय वेळेनुसार जवळपास संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास काबुलवरून रवाना करण्यात आलं. सध्या कंपनी तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि आवश्यकतेनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

लोकांसोबत गद्दारी"जेव्हा मी त्या ठिकाणाहून पळालो आहे तेव्हा तुम्ही तिकडची परिस्थिती काय आहे हे समजू शकता. अशरफ गनी याची टीम गद्दार आहे. त्यांनी अफगाणिस्तानच्या लोकांसोबत गद्दारी केली आहे. लोक त्यांना माफ करणार नाहीत," अशी प्रतिक्रिया अफगाणिस्तानचे माजी खासदार जमील करझई यांनी दिल्लीला पोहोचल्यानंतर दिली. "अफगाणिस्तानच्या बहुतांश भागात शांतता आहे. जवळपास अनेक राजकीय लोकांनी काबुल सोडलं. २०० जण दिल्लीला आले आहेत. मला असं वाटतंय हे नवं तालिबान आहे. ते महिलांनादेखील काम करण्याची परवानगी देतील,"अशी प्रतिक्रिया अफगाण राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार रिझवानुल्ला अहमदझई यांनी दिल्लीला आल्यानंतर दिली. "जगानं अफगाणिस्तानला वेगळं सोडलं यावर विश्वास बसत नाही. त्या ठिकाणी आमचा मित्रपरिवार आहे, त्याचा खून होऊ शकतो. तालिबान आम्हालाही मारू शकते. आमच्या महिलांना आथा त्या ठिकाणी अधिक अधिकार मिळणार नाही," अशी प्रतिक्रिया भारतात आलेल्या एका महिलेनं दिली. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानIndiaभारतdelhiदिल्लीPresidentराष्ट्राध्यक्षWomenमहिला