शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 21:38 IST

थायलँड आणि कंबोडिया यांच्यात ८१७ किमी लांब जमिनी सीमा आहे. दोन्ही देशांत शतकाहून अधिक काळ सीमेवरील अनिश्चित रेषेवरून वाद सुरू आहे

बँकॉक - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर आता आशियात आणखी २ देशांत युद्धाची परिस्थिती तयार झाली आहे. या दोन्ही देशांनी आपापल्या सीमेवर मोठ्या संख्येने सैन्य तैनात केले आहे. थायलँड आणि कंबोडिया या दोन्ही देशात तणावाची स्थिती आहे. कंबोडियासोबत सीमावादाच्या पार्श्वभूमीवर थायलँडने सैनिकांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे पूर्व आशियात होणाऱ्या शांततेच्या प्रयत्नांना फटका बसण्याची शक्यता आहे. या दोन्ही देशांचेही चीनसोबत द्विपक्षीय संबंध आहेत. सध्या दक्षिण पूर्व आशियात मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम शांततेचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यात यश मिळाले नाही.

थायलँड आणि कंबोडियात तणाव का वाढला?

२८ मे रोजी अनिश्चित सीमा रेषेवर झालेल्या झटापटीत एक कंबोडियन सैनिक मारला गेला तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. अनेक दिवसांपासून दोन्ही देशांसोबत दक्षिण पूर्व आशियातील सरकार शांततेचा प्रयत्न करत आहेत. परंतु थायलँडचे उपपंतप्रधान फुमथम वेचायाचाईने यांनी म्हटलं की, कंबोडियाने गुरुवारी द्विपक्षीय चर्चेबाबत आमचा प्रस्ताव फेटाळून लावला. या प्रस्तावामुळे तणाव कमी होऊ शकला असता असं त्यांनी सांगितले.

तसेच कंबोडियाने सीमेवर सैन्य वाढवले आहे त्यातून सीमावाद आणखी वाढला आहे. त्यामुळे थाई सरकारनेही उपाययोजना लागू करत सैन्य मजूबत करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. कंबोडियन सैनिक आणि नागरिक वारंवार थायलँडमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. हा उकसवण्याचा आणि सैन्याचा वापर करण्यास भाग पाडण्याचा प्रकार आहे. कंबोडिया सीमेवरील सर्व थाई चौक्यांवर गस्त वाढवण्यात आली आहे असंही फुमथम यांनी म्हटलं.

दरम्यान, आमची भूमिका संघर्ष सुरू करण्याची नाही तर स्वत:चा बचाव करण्याची आहे. जागतिक कायद्याचे पालन केले जाईल. आमच्या  देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी धोरणे अत्यंत महत्त्वाची आहेत. सशस्त्र बल आक्रमणाविरोधात बचावासाठी तयार आहे असं विधान कंबोडियन पंतप्रधान हुन मानेट यांनी शनिवारी केलेल्या भाषणात केले.

थायलँड आणि कंबोडियात सीमावाद काय?

थायलँड आणि कंबोडिया यांच्यात ८१७ किमी लांब जमिनी सीमा आहे. दोन्ही देशांत शतकाहून अधिक काळ सीमेवरील अनिश्चित रेषेवरून वाद सुरू आहे. ही सीमा पहिल्यांदा १९०७ मध्ये फ्रान्सने नकाशावर रेखाटली होती, जेव्हा कंबोडियात त्यांची वसाहत होती. २००८ मध्येही दोन्ही देशात ११ शतकापासून असलेल्या एका हिंदू मंदिरावरून वाद झाला होता. ज्यामुळे अनेकदा संघर्ष झाला अनेक लोक मारले गेले. २०११ मध्येही एक आठवडा दोन्ही देशात गोळीबार सुरू होता. 

कंबोडिया जागतिक कोर्टाचे दरवाजे ठोठावणार

सीमेवरील ४ हिस्स्यांच्या वादाचा मुद्दा जागतिक कोर्टाकडे नेणार, त्याला थायलँडने सहकार्य करावे असं कंबोडियाने अलीकडे म्हटलं. तर थायलँड न्यायालयाच्या क्षेत्राला मान्यता देत नाही. सीमेबाबत जो वाद असेल तो द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून सोडवला जाईल असं फुमथम यांनी सांगितले. 

टॅग्स :ThailandथायलंडIndiaभारतPakistanपाकिस्तान