शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 10:45 IST

भारताच्या हल्ल्यानंतर जगभरात पाकिस्तान बदनाम झाला आहे. महत्वाचे म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या कथित अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला करून, आता पाकिस्तानात काहीही आपल्या अवाक्याबाहेर नाही, हे भारताने दाखवून दिले आहे. भारताने अशा पद्धतीने झोडपून काढल्यानंतर, आता पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची प्रतिक्रिया आली आहे.

भारताकडे वाकड्या नंजरेनं बघितलं की काय हाल होतात, हे पाकिस्ताननं पुन्हा एकदा बघितलं आहे. भारताच्या हल्ल्यानंतर जगभरात पाकिस्तान बदनाम झाला आहे. महत्वाचे म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या कथित अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला करून, आता पाकिस्तानात काहीही आपल्या अवाक्याबाहेर नाही, हे भारताने दाखवून दिले आहे. भारताने अशा पद्धतीने झोडपून काढल्यानंतर, आता पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची प्रतिक्रिया आली आहे. 'शत्रूचा कोणताही डाव पाकिस्तानी सशस्त्र दलांचा संकल्प कमकुवत करू शकत नाही,' असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी म्हटले आहे.

जनरल मुनीर यांनी सोमवारी रावळपिंडीतील कम्बाइंड मिलिटरी हॉस्पिटलला भेट दिली. यादरम्यान त्यांनी हे विधान केले आहे. भारतासोबत झालेल्या लष्करी चकमकीत जखमी झालेल्या सैनिक आणि नागरिकांच्या प्रकृतीची पाहणी करण्यासाठी ते तेथे पोहोचले होते. गेल्या २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत, भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरला सुरूवात  केली होती. या कारवाईअंतर्गत, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील (पीओके) दहशतवादी तळांवर हवाई हल्ले चढवून ते भूईसपाट करण्यात आले.

ऑपरेशन बुनयान उल मरसूसवरही मुनीर यांचं भाष्य -पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुनीर सोमवारी भारतीय हल्ल्यांत जखमी झालेल्या सैनिकांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी ते म्हणाले, संपूर्ण देश आपल्या सशस्त्र दलांसोबत एकजुटीने उभा आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या ऑपरेशन बुनयान उल मरसूसवरही भाष्य केले आणि तो हक्काच्या लढाईचा एक भाग असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सोमवारी पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीमध्येही देशाच्या सशस्त्र दलांचे कौतुक करणारा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानी सैन्याची मोठी बदनामी झाली आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारत