शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Afghanistan Crisis: काबुलमध्ये सर्व भारतीय नागरिक सुखरुप, विमानतळावरुन कुठं नेण्यातं आलं? तालिबाननं सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 13:36 IST

Afghanistan Crisis: तालिबानकडून तातडीनं याबाबत खुलासा करण्यात आला असून सर्व भारतीय सुखरुप असल्याची माहिती तालिबानच्या प्रवक्त्यानं दिली आहे.

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील काबुल विमानतळावरुन जवळपास १५० भारतीय नागरिकांचं तालिबान्यांनी अपहरण केल्याचं वृत्त अफगाणिस्तानातील माध्यमांमध्ये प्रसारित केलं जात होतं. पण तालिबानकडून तातडीनं याबाबत खुलासा करण्यात आला असून सर्व भारतीय सुखरुप असल्याची माहिती तालिबानच्या प्रवक्त्यानं दिली आहे. त्यामुळे मोठा दिलासा भारताला मिळाला आहे. 

अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर शेकडो भारतीय नागरिक मायदेशी परतण्यासाठी वाट पाहात होते. पण त्यांना तालिबान्यांनी विमानतळाबाहेर नेल्याची माहिती समोर आली. त्यानंतर या नागरिकांचं अपहरण करण्यात आल्याचं वृत्त अफगाण माध्यमांमध्ये प्रासरित केलं जात होतं. यावर तालिबानचा प्रवक्ता अहमदुल्ला वसेक यानं अधिकृतरित्या समोर येत भारतीय नागरिकांचं अपहरण करण्यात आलेलं नाही आणि सर्व नागरिक सुखरूप असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

काबुलमधील सर्व भारतीय नागरिक सुखरुप असून त्यांच्या सुरक्षेसाठीच त्यांना विमानतळाजवळील एका गॅरेजमध्ये हलविण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. याच ठिकाणी त्यांची सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत असून त्यांच्या मायदेशात परतण्यासाठीची पुढची प्रक्रिया सुरू आहे, असं वृत्त आता अफगाण माध्यमांमध्ये प्रसारित केलं जात आहे. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान