शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

Afghanistan Crisis: काबुलमध्ये सर्व भारतीय नागरिक सुखरुप, विमानतळावरुन कुठं नेण्यातं आलं? तालिबाननं सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 13:36 IST

Afghanistan Crisis: तालिबानकडून तातडीनं याबाबत खुलासा करण्यात आला असून सर्व भारतीय सुखरुप असल्याची माहिती तालिबानच्या प्रवक्त्यानं दिली आहे.

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील काबुल विमानतळावरुन जवळपास १५० भारतीय नागरिकांचं तालिबान्यांनी अपहरण केल्याचं वृत्त अफगाणिस्तानातील माध्यमांमध्ये प्रसारित केलं जात होतं. पण तालिबानकडून तातडीनं याबाबत खुलासा करण्यात आला असून सर्व भारतीय सुखरुप असल्याची माहिती तालिबानच्या प्रवक्त्यानं दिली आहे. त्यामुळे मोठा दिलासा भारताला मिळाला आहे. 

अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर शेकडो भारतीय नागरिक मायदेशी परतण्यासाठी वाट पाहात होते. पण त्यांना तालिबान्यांनी विमानतळाबाहेर नेल्याची माहिती समोर आली. त्यानंतर या नागरिकांचं अपहरण करण्यात आल्याचं वृत्त अफगाण माध्यमांमध्ये प्रासरित केलं जात होतं. यावर तालिबानचा प्रवक्ता अहमदुल्ला वसेक यानं अधिकृतरित्या समोर येत भारतीय नागरिकांचं अपहरण करण्यात आलेलं नाही आणि सर्व नागरिक सुखरूप असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

काबुलमधील सर्व भारतीय नागरिक सुखरुप असून त्यांच्या सुरक्षेसाठीच त्यांना विमानतळाजवळील एका गॅरेजमध्ये हलविण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. याच ठिकाणी त्यांची सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत असून त्यांच्या मायदेशात परतण्यासाठीची पुढची प्रक्रिया सुरू आहे, असं वृत्त आता अफगाण माध्यमांमध्ये प्रसारित केलं जात आहे. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान