शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू कवीनं लिहिलं होतं पाकिस्तानचं पहिलं राष्ट्रगीत, पण फाळणीनंतर त्यांची झाली अशी अवस्था  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 13:38 IST

Jagannath Azad: धर्माच्या आधारावर ज्या पाकिस्तानची निर्मिती झाली त्याचं पहिलं राष्ट्रगीत (First National Anthem of Pakistan) एका हिंदू व्यक्तीनं लिहिलं होतं, ही बाब कदाचित आजच्या पिढीला माहित नसेल.

१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळताना देशाची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रं निर्माण झाली होती. मात्र धर्माच्या आधारावर ज्या पाकिस्तानची निर्मिती झाली त्याचं पहिलं राष्ट्रगीत एका हिंदू व्यक्तीनं लिहिलं होतं, ही बाब कदाचित आजच्या पिढीला माहित नसेल. पाकिस्तानचं पहिलं राष्ट्रगीत लिहिणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं जगन्नाथ आझाद. प्रख्यात कवी आणि शायर असलेले आझाद हे हेव्हा लाहोर येथे वास्तव्यास राहात होते. तेव्हा फाळणीची चर्चा चहुबाजूंना पसरली होती. तेव्हा मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र निर्मितीचं जिना यांचं स्वप्न पूर्ण होणार होतं. त्यावेळी देशासाठी एक स्वतंत्र राष्ट्रगीत असावं, असा विचार जिना यांच्या मनात होता.  

मुस्लिम समाजाचं नेतृत्व करणाऱ्या जिना यांनी आपली आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा चमकवण्यासाठी वेगळी रणनीती अमलात आणली होती. त्यांनी स्वत:ला धर्मनिरपेक्ष दर्शवण्यासाठी पाकिस्तानच्या राष्ट्रगीताची रचना करू शकेल, अशा एका हिंदू शायराचा शोध सुरू केला. मात्र जिना यांच्या या निर्णयामुळे मुस्लिम समाजामध्ये संतापाची भावना निर्माण झाली. काही वरिष्ठ मुस्लिमांनी नाराजी व्यक्त केली. एक हिंदू आमचं राष्ट्रगीत कसं काय लिहू शकतो, असा प्रश्न विचारला गेला. मात्र जिना यांनी  २४ तासांमध्ये हिंदू शायराचा शोध घेण्याचे आदेश दिले.

त्यानंतर हिंदू कवी जगन्नाथ आझाद यांचं नाव समोर आलं. त्यांचं उर्दू भाषेवर प्रभुत्व होतं. देशाची फाळणी झाली तरीही लाहोर येथेच राहण्याचा निर्धार त्यांनी केलेला होता. दुसरीकडे पाकिस्तान हा सेक्युलर देश असावा, असा जिना यांचा विचार होता. जिना आझाद यांना भेटले आणि त्यांनी पाच दिवसांच्या आत पाकिस्तानसाठी राष्ट्रगीत लिहिण्यास सांगितले. पाकिस्तान रेडिओने या गीताला संगीत दिले. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी ते प्रसारित झाले. हे गीत जिना यांना खूप आवडले. या गीताला सुमारे दीड वर्षे राष्ट्रगीताचा मान मिळाला. नंतर जिना यांच्या मृत्यूनंतर कट्टरतावादी मुस्लिम नेत्यांच्या दबावामुळे हे राष्ट्रगीत बदललं गेलं.  

दरम्यान, मी पाकिस्तानचं राष्ट्रगीत लिहिल्याने पाकिस्तानमध्ये राहणं माझ्यासाठी सुरक्षित असेल, असं जगन्नाथ आझाद यांना वाटत होतं. मात्र त्यांचं वास्तव्य असलेल्या रामनगरमध्ये कुणीच वाचलं नाही. शेवटी मित्रांच्या सांगण्यावरून जगन्नाथ आझाद यांना लाहोर सोडावं लागलं. पुढे दिल्लीत येऊन ते निर्वासितांच्या छावणीमध्ये काही काळ राहिले. तसेच माहिती प्रसारण मंत्रालयाच्या उर्दू नियतकालिकांमध्ये त्यांनी काम केलं.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय