शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

हिंदू कवीनं लिहिलं होतं पाकिस्तानचं पहिलं राष्ट्रगीत, पण फाळणीनंतर त्यांची झाली अशी अवस्था  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 13:38 IST

Jagannath Azad: धर्माच्या आधारावर ज्या पाकिस्तानची निर्मिती झाली त्याचं पहिलं राष्ट्रगीत (First National Anthem of Pakistan) एका हिंदू व्यक्तीनं लिहिलं होतं, ही बाब कदाचित आजच्या पिढीला माहित नसेल.

१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळताना देशाची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रं निर्माण झाली होती. मात्र धर्माच्या आधारावर ज्या पाकिस्तानची निर्मिती झाली त्याचं पहिलं राष्ट्रगीत एका हिंदू व्यक्तीनं लिहिलं होतं, ही बाब कदाचित आजच्या पिढीला माहित नसेल. पाकिस्तानचं पहिलं राष्ट्रगीत लिहिणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं जगन्नाथ आझाद. प्रख्यात कवी आणि शायर असलेले आझाद हे हेव्हा लाहोर येथे वास्तव्यास राहात होते. तेव्हा फाळणीची चर्चा चहुबाजूंना पसरली होती. तेव्हा मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र निर्मितीचं जिना यांचं स्वप्न पूर्ण होणार होतं. त्यावेळी देशासाठी एक स्वतंत्र राष्ट्रगीत असावं, असा विचार जिना यांच्या मनात होता.  

मुस्लिम समाजाचं नेतृत्व करणाऱ्या जिना यांनी आपली आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा चमकवण्यासाठी वेगळी रणनीती अमलात आणली होती. त्यांनी स्वत:ला धर्मनिरपेक्ष दर्शवण्यासाठी पाकिस्तानच्या राष्ट्रगीताची रचना करू शकेल, अशा एका हिंदू शायराचा शोध सुरू केला. मात्र जिना यांच्या या निर्णयामुळे मुस्लिम समाजामध्ये संतापाची भावना निर्माण झाली. काही वरिष्ठ मुस्लिमांनी नाराजी व्यक्त केली. एक हिंदू आमचं राष्ट्रगीत कसं काय लिहू शकतो, असा प्रश्न विचारला गेला. मात्र जिना यांनी  २४ तासांमध्ये हिंदू शायराचा शोध घेण्याचे आदेश दिले.

त्यानंतर हिंदू कवी जगन्नाथ आझाद यांचं नाव समोर आलं. त्यांचं उर्दू भाषेवर प्रभुत्व होतं. देशाची फाळणी झाली तरीही लाहोर येथेच राहण्याचा निर्धार त्यांनी केलेला होता. दुसरीकडे पाकिस्तान हा सेक्युलर देश असावा, असा जिना यांचा विचार होता. जिना आझाद यांना भेटले आणि त्यांनी पाच दिवसांच्या आत पाकिस्तानसाठी राष्ट्रगीत लिहिण्यास सांगितले. पाकिस्तान रेडिओने या गीताला संगीत दिले. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी ते प्रसारित झाले. हे गीत जिना यांना खूप आवडले. या गीताला सुमारे दीड वर्षे राष्ट्रगीताचा मान मिळाला. नंतर जिना यांच्या मृत्यूनंतर कट्टरतावादी मुस्लिम नेत्यांच्या दबावामुळे हे राष्ट्रगीत बदललं गेलं.  

दरम्यान, मी पाकिस्तानचं राष्ट्रगीत लिहिल्याने पाकिस्तानमध्ये राहणं माझ्यासाठी सुरक्षित असेल, असं जगन्नाथ आझाद यांना वाटत होतं. मात्र त्यांचं वास्तव्य असलेल्या रामनगरमध्ये कुणीच वाचलं नाही. शेवटी मित्रांच्या सांगण्यावरून जगन्नाथ आझाद यांना लाहोर सोडावं लागलं. पुढे दिल्लीत येऊन ते निर्वासितांच्या छावणीमध्ये काही काळ राहिले. तसेच माहिती प्रसारण मंत्रालयाच्या उर्दू नियतकालिकांमध्ये त्यांनी काम केलं.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय