शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

पाक व्याप्त काश्मीरच्या ७३ टक्के नागरिकांना हवे आहे स्वातंत्र्य!, सर्व्हेमधून उमटला आवाज, पाक सरकारने वृत्तपत्राला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 01:26 IST

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सर्वाधिक खप असलेल्या उर्दू दै. मुजादलवर या वृत्तपत्रावर तेथील सरकारने बंदी आणली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोटहून प्रकाशित होणा-या या दैनिकाने तेथील लोकांशी संवाद साधून एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये पाकिस्तानात राहण्यासंबंधी तुमचे काय मत आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

इस्लामाबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सर्वाधिक खप असलेल्या उर्दू दै. मुजादलवर या वृत्तपत्रावर तेथील सरकारने बंदी आणली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोटहून प्रकाशित होणा-या या दैनिकाने तेथील लोकांशी संवाद साधून एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये पाकिस्तानात राहण्यासंबंधी तुमचे काय मत आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात ७३ टक्के लोकांनी आम्हाला पाकिस्तानात राहण्याची इच्छा नसून, स्वातंत्र्याची मागणी केली होती. या सर्व्हेमुळे पाकिस्तानात खळबळ माजली आणि सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता वृत्तपत्राला टाळे ठोकले.एका भारतीय इंग्रजी वृत्तवाहिनीने त्या दैनिकाचे संपादक हॅरिस कादिर यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली, तेव्हा ते म्हणाले की, आम्ही सर्व्हेमध्ये लोकांना दोन प्रश्न विचारले होते. पाकव्याप्त काश्मीरला १९४८ मध्ये मिळालेला दर्जा बदलण्यात यावा, असे वाटते का, असा पहिला प्रश्न होता. त्याच्या उत्तरात अनेकांनी सकारात्मक म्हणजेच ‘होय’ असे सांगितले. दुस-या प्रश्नाला उत्तर देताना ७३ टक्के लोकांनी पाकव्याप्त काश्मीर हा भाग पाकिस्तानपासून स्वतंत्र व्हायला हवा, असे मत व्यक्त केले.हा सर्व्हे प्रकाशित झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने सर्वात आधी आपणास नोटीस पाठवून धमकावले, असे हॅजरस कादिर म्हणाले. त्यानंतर त्यांनी वृत्तपत्राच्या कार्यालयालाच कुलुपच ठोकले, अशीही माहिती त्यांनी दिली. या सर्व्हेमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील सुमारे १0 हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. हा सर्व्हे घाईघाईने केलेला नसून, तो पाच वर्षे सुरू होता, अशी माहितीही कादिर यांनी दिली. पाकिस्तानपासून आम्हाला स्वातंत्र्य मिळावे, अशी मागणी यापूर्वीही अनेकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये झाली आहे. (वृत्तसंस्था)लोकांचा रोषया सर्व्हेमुळे खळबळ माजली असून, त्याचा धसका घेतलेल्या पाक सरकारने वृत्तपत्रावर कारवाईचा बडगा उगारला आहे. सरकारच्या निर्णयावर लोकांनी रोष व्यक्त केला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरPakistanपाकिस्तानIndiaभारत