शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पाक व्याप्त काश्मीरच्या ७३ टक्के नागरिकांना हवे आहे स्वातंत्र्य!, सर्व्हेमधून उमटला आवाज, पाक सरकारने वृत्तपत्राला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 01:26 IST

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सर्वाधिक खप असलेल्या उर्दू दै. मुजादलवर या वृत्तपत्रावर तेथील सरकारने बंदी आणली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोटहून प्रकाशित होणा-या या दैनिकाने तेथील लोकांशी संवाद साधून एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये पाकिस्तानात राहण्यासंबंधी तुमचे काय मत आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

इस्लामाबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सर्वाधिक खप असलेल्या उर्दू दै. मुजादलवर या वृत्तपत्रावर तेथील सरकारने बंदी आणली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोटहून प्रकाशित होणा-या या दैनिकाने तेथील लोकांशी संवाद साधून एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये पाकिस्तानात राहण्यासंबंधी तुमचे काय मत आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात ७३ टक्के लोकांनी आम्हाला पाकिस्तानात राहण्याची इच्छा नसून, स्वातंत्र्याची मागणी केली होती. या सर्व्हेमुळे पाकिस्तानात खळबळ माजली आणि सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता वृत्तपत्राला टाळे ठोकले.एका भारतीय इंग्रजी वृत्तवाहिनीने त्या दैनिकाचे संपादक हॅरिस कादिर यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली, तेव्हा ते म्हणाले की, आम्ही सर्व्हेमध्ये लोकांना दोन प्रश्न विचारले होते. पाकव्याप्त काश्मीरला १९४८ मध्ये मिळालेला दर्जा बदलण्यात यावा, असे वाटते का, असा पहिला प्रश्न होता. त्याच्या उत्तरात अनेकांनी सकारात्मक म्हणजेच ‘होय’ असे सांगितले. दुस-या प्रश्नाला उत्तर देताना ७३ टक्के लोकांनी पाकव्याप्त काश्मीर हा भाग पाकिस्तानपासून स्वतंत्र व्हायला हवा, असे मत व्यक्त केले.हा सर्व्हे प्रकाशित झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने सर्वात आधी आपणास नोटीस पाठवून धमकावले, असे हॅजरस कादिर म्हणाले. त्यानंतर त्यांनी वृत्तपत्राच्या कार्यालयालाच कुलुपच ठोकले, अशीही माहिती त्यांनी दिली. या सर्व्हेमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील सुमारे १0 हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. हा सर्व्हे घाईघाईने केलेला नसून, तो पाच वर्षे सुरू होता, अशी माहितीही कादिर यांनी दिली. पाकिस्तानपासून आम्हाला स्वातंत्र्य मिळावे, अशी मागणी यापूर्वीही अनेकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये झाली आहे. (वृत्तसंस्था)लोकांचा रोषया सर्व्हेमुळे खळबळ माजली असून, त्याचा धसका घेतलेल्या पाक सरकारने वृत्तपत्रावर कारवाईचा बडगा उगारला आहे. सरकारच्या निर्णयावर लोकांनी रोष व्यक्त केला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरPakistanपाकिस्तानIndiaभारत