शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

श्रीलंकेत विमानतळाजवळ आढळला 6 फुटी पाईप बॉम्ब; आतापर्यंत 290 ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 09:02 IST

एअरफोर्सचे प्रवक्ते गिहान सेनेविरत्ने यांनी सांगितले की आयईडी बॉम्ब स्थानिक स्तरावर बनविण्यात आले होते.

कोलंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये रविवारी सकाळी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये आतापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला असून जऴपास 500 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 24 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घेतलेल्या शोधमोहिमेमध्ये विमानतळाजवळ स्फोटकांनी भरलेला 6 फुटी पाईप बॉम्ब सापडल्याने खळबळ माजली आहे. 

एअरफोर्सचे प्रवक्ते गिहान सेनेविरत्ने यांनी सांगितले की आयईडी बॉम्ब स्थानिक स्तरावर बनविण्यात आले होते. हा बॉम्ब निकामी करण्यास हवाई दलाला यश आले आहे. यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. तसेच विमान कंपन्यांनी देखील कडक तपासणी सुरु केल्याने प्रवाशांना 4 तास आधीच विमानतळावर पोहोचण्यास सांगण्यात आले होते. 

श्रीलंकेला 10 दिवसांपूर्वीच हल्ल्य़ाची कल्पना होतीश्रीलंकेचे पोलिस प्रमुख पुजुत जयसुंदरा यांनी 11 एप्रिलला सतर्क करत सांगितले होते की एका विदेशी गुप्तचर संस्थेने सांगितले की नॅशनल थोहीथ जमात (एनटीजे) देशातील प्रमुख चर्च आणि कोलंबोतील भारतीय उच्चायोगावर आत्मघाती हल्ले करण्याची शक्यता आहे. मात्र, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे या साखळी बॉम्बस्फोटांवरून दिसून येत आहे. 

एनटीजे हे श्रीलंकेतील कट्टरतावादी मुस्लिम संघटना आहे. या संघटनेने गेल्या वर्षी बुद्धांच्या मूर्त्या तोडल्या होत्या.

कोलंबोतील या साखळी बॉम्बस्फोटात तीन भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी  दिली आहे. तसेच, कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे, असे सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे.  जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले आहे. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी (21 एप्रिल) स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.45 वाजण्याचा सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे. या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो लोक मृत्युमुखी, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटांमध्ये किती नुकसान झाले याबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाBombsस्फोटकेBlastस्फोट