शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

“४०-५० वर्षांत जगभरात भारतासारखे कोणीही वागले नाही”; कॅनडाचा तिळपापड, आता प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 14:08 IST

Canada Vs India: भारताच्या भूमिकेवरून कॅनडाने नाराजी व्यक्त केली आहे.

Canada Vs India: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर हत्येवरून गेल्या काही दिवसांपासून कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध तणावग्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी भारतानेकॅनडाला अल्टिमेटम देत ४१ अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्यास सांगितले होते. यासाठी १० ऑक्टोबरची तारीख देण्यात आली होती. मात्र, यावरून आता कॅनडाचा चांगलाच तिळपापड झाला असून, गेल्या ४० ते ५० जगातील कोणताही देश भारतासारखा वागला नाही, असे कॅनडाने म्हटले आहे. 

कॅनडाचे माजी राजनैतिक अधिकारी यांनी भारताच्या अल्टिमेटमबाबत प्रतिक्रिया देताना टीका केली आहे. गेल्या ४० किंवा ५० वर्षात अशी कोणतीही घटना घडल्याचे मला आठवत नाही. भारताकडून अशा प्रकारे अधिकाऱ्यांना माघारी पाठवणे सामान्य गोष्ट नाही, असे कॅनडाच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने म्हटले आहे. भारतातील कॅनडाच्या राजनैतिकांची संख्या कमी करण्याची निश्चित तारीख १० ऑक्टोबर होती. पण कॅनडाने भारतासोबत खाजगी चर्चेद्वारे हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ही चर्चा निष्फळ ठरली.

भारतातील कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, भारताने २० ऑक्टोबरनंतर २१ कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना सोडून इतर सर्वांचे विशेषाधिकार समाप्त करण्याबाबत माहिती दिली आहे. कॅनडाचे भारतात असलेल्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करता, आम्ही भारतातून ते सुरक्षित परततील ही बाब सुनिश्चित करत आहोत. 

दरम्यान, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत भारतावर गंभीर आरोप केले होते, परंतु कॅनडा पोलिसांनी मात्र निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताच्या सहभागाबाबतच्या निष्कर्षप्रत पोहोचलो नसल्याचे म्हटले आहे. आम्ही निज्जर हत्येबाबत गँगवॉरच्या दृष्टीनेही तपास करत आहोत. तूर्तास हत्येच्या कारणांबाबत स्पष्टपणे काहीही सांगू शकत नाही, असे म्हटले. त्यामुळे पोलिसांच्या या वक्तव्यानंतर मात्र दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

 

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारत