शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

“४०-५० वर्षांत जगभरात भारतासारखे कोणीही वागले नाही”; कॅनडाचा तिळपापड, आता प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 14:08 IST

Canada Vs India: भारताच्या भूमिकेवरून कॅनडाने नाराजी व्यक्त केली आहे.

Canada Vs India: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर हत्येवरून गेल्या काही दिवसांपासून कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध तणावग्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी भारतानेकॅनडाला अल्टिमेटम देत ४१ अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्यास सांगितले होते. यासाठी १० ऑक्टोबरची तारीख देण्यात आली होती. मात्र, यावरून आता कॅनडाचा चांगलाच तिळपापड झाला असून, गेल्या ४० ते ५० जगातील कोणताही देश भारतासारखा वागला नाही, असे कॅनडाने म्हटले आहे. 

कॅनडाचे माजी राजनैतिक अधिकारी यांनी भारताच्या अल्टिमेटमबाबत प्रतिक्रिया देताना टीका केली आहे. गेल्या ४० किंवा ५० वर्षात अशी कोणतीही घटना घडल्याचे मला आठवत नाही. भारताकडून अशा प्रकारे अधिकाऱ्यांना माघारी पाठवणे सामान्य गोष्ट नाही, असे कॅनडाच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने म्हटले आहे. भारतातील कॅनडाच्या राजनैतिकांची संख्या कमी करण्याची निश्चित तारीख १० ऑक्टोबर होती. पण कॅनडाने भारतासोबत खाजगी चर्चेद्वारे हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ही चर्चा निष्फळ ठरली.

भारतातील कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, भारताने २० ऑक्टोबरनंतर २१ कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना सोडून इतर सर्वांचे विशेषाधिकार समाप्त करण्याबाबत माहिती दिली आहे. कॅनडाचे भारतात असलेल्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करता, आम्ही भारतातून ते सुरक्षित परततील ही बाब सुनिश्चित करत आहोत. 

दरम्यान, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत भारतावर गंभीर आरोप केले होते, परंतु कॅनडा पोलिसांनी मात्र निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताच्या सहभागाबाबतच्या निष्कर्षप्रत पोहोचलो नसल्याचे म्हटले आहे. आम्ही निज्जर हत्येबाबत गँगवॉरच्या दृष्टीनेही तपास करत आहोत. तूर्तास हत्येच्या कारणांबाबत स्पष्टपणे काहीही सांगू शकत नाही, असे म्हटले. त्यामुळे पोलिसांच्या या वक्तव्यानंतर मात्र दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

 

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारत