शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

बालाकोट एअरस्ट्राइकमध्ये मारले गेले ३०० दहशतवादी, पाकिस्तानच्या माजी अधिकाऱ्याने अखेर दिली कबुली

By बाळकृष्ण परब | Updated: January 9, 2021 20:55 IST

Balakot Air Strike News : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर जोरदार हवाई हल्ला केला होता. मात्र या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले याबाबत सुरुवातीपासूनच वेगवेगळे आकडे समोर येत होत होते.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितला बालाकोटमध्ये मारल्या गेलेल्यांचा खरा आकडा भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ३०० लोक मारले गेले होतेपाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी एका टीव्ही शोमध्ये दिली कबुली

इस्लामाबाद - पुलवामा येथे पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर जोरदार हवाई हल्ला केला होता. मात्र या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले याबाबत सुरुवातीपासूनच वेगवेगळे आकडे समोर येत होत होते. त्यातच भारताच्या हल्ल्यात एकही नागरिक मारला गेला नसल्याचे सांगत पाकिस्तानने कांगावा केला होता. दरम्यान, या हल्ल्याला दोन वर्षे उलटत असतानाच पाकिस्तानच्या एका माजी अधिकाऱ्याने बालाकोटमध्ये मारल्या गेलेल्यांचा खरा आकडा सांगितले आहे.भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ३०० लोक मारले गेले होते, अशी कबुली पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने दिली आहे. पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी एका टीव्ही शोमध्ये २६ फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या एअरस्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेल्याचे मान्य केले.आगा हिलाली हे वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत नेहमीच भाग घेत असतात. तसेच पाकिस्तानी सैन्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र यावेळी त्यांनी भारतीय हवाई दलाच्या पराक्रमामुळे पाकिस्तान आणि पाकिस्तानी लष्करावर ओढवलेल्या नामुष्कीची कबुली दिली आहे.खैबर पख्तुनख्या प्रांतातील बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ आहे. भारतीय हवाई दलाने या तळाला लक्ष्य केले होते. मात्र त्यावेळी आपली फजिती लपवण्यासाठी पाकिस्तानने या तळावर कुणी उपस्थित नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर भारतातही अनेकांनी या एअरस्ट्राइकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकड्याबाबत शंका उपस्थित केली होती.आगा हिलाली पुढे म्हणाले की, भारताने आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे झेपावत युद्धसदृश कारवाई केली होती. यामध्ये किमान ३०० जण मारले गेल्याचे वृत्त होते. मात्र आमचे लक्ष्य वेगळे आहे. आम्ही त्यांच्या हायकमांडना लक्ष्य करतो. तेच आमचे अचूक लक्ष्य आहे. तेव्हा आम्ही सांगितले होते की, सर्जिकल स्ट्राइकमध्ये कुणाचाही मृत्यू झालेला नाही. आता आम्ही सांगितले की, ते जे काही करतील त्याला आम्हीसुद्धा त्याच स्तरावर उत्तर देऊ.

 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान