शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

बालाकोट एअरस्ट्राइकमध्ये मारले गेले ३०० दहशतवादी, पाकिस्तानच्या माजी अधिकाऱ्याने अखेर दिली कबुली

By बाळकृष्ण परब | Published: January 09, 2021 8:52 PM

Balakot Air Strike News : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर जोरदार हवाई हल्ला केला होता. मात्र या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले याबाबत सुरुवातीपासूनच वेगवेगळे आकडे समोर येत होत होते.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितला बालाकोटमध्ये मारल्या गेलेल्यांचा खरा आकडा भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ३०० लोक मारले गेले होतेपाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी एका टीव्ही शोमध्ये दिली कबुली

इस्लामाबाद - पुलवामा येथे पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर जोरदार हवाई हल्ला केला होता. मात्र या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले याबाबत सुरुवातीपासूनच वेगवेगळे आकडे समोर येत होत होते. त्यातच भारताच्या हल्ल्यात एकही नागरिक मारला गेला नसल्याचे सांगत पाकिस्तानने कांगावा केला होता. दरम्यान, या हल्ल्याला दोन वर्षे उलटत असतानाच पाकिस्तानच्या एका माजी अधिकाऱ्याने बालाकोटमध्ये मारल्या गेलेल्यांचा खरा आकडा सांगितले आहे.भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ३०० लोक मारले गेले होते, अशी कबुली पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने दिली आहे. पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी एका टीव्ही शोमध्ये २६ फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या एअरस्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेल्याचे मान्य केले.आगा हिलाली हे वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत नेहमीच भाग घेत असतात. तसेच पाकिस्तानी सैन्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र यावेळी त्यांनी भारतीय हवाई दलाच्या पराक्रमामुळे पाकिस्तान आणि पाकिस्तानी लष्करावर ओढवलेल्या नामुष्कीची कबुली दिली आहे.खैबर पख्तुनख्या प्रांतातील बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ आहे. भारतीय हवाई दलाने या तळाला लक्ष्य केले होते. मात्र त्यावेळी आपली फजिती लपवण्यासाठी पाकिस्तानने या तळावर कुणी उपस्थित नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर भारतातही अनेकांनी या एअरस्ट्राइकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकड्याबाबत शंका उपस्थित केली होती.आगा हिलाली पुढे म्हणाले की, भारताने आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे झेपावत युद्धसदृश कारवाई केली होती. यामध्ये किमान ३०० जण मारले गेल्याचे वृत्त होते. मात्र आमचे लक्ष्य वेगळे आहे. आम्ही त्यांच्या हायकमांडना लक्ष्य करतो. तेच आमचे अचूक लक्ष्य आहे. तेव्हा आम्ही सांगितले होते की, सर्जिकल स्ट्राइकमध्ये कुणाचाही मृत्यू झालेला नाही. आता आम्ही सांगितले की, ते जे काही करतील त्याला आम्हीसुद्धा त्याच स्तरावर उत्तर देऊ.

 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान