शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

भारताचे २७0 मच्छीमार, ५४ नागरिक पाकच्या ताब्यात; भारताकडे पाकिस्तानचे ९७ मच्छीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 23:06 IST

दोन्ही देशांनी परस्परांच्या नागरिकांची सुटका करण्याची स्वयंसेवी संस्थेची मागणी

राजकोट : भारताचे २७0 मच्छीमार आणि ५४ सामान्य नागरिक आपल्या ताब्यात असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आहे. दुसरीकडे भारताने आपल्या ताब्यात ९७ पाकिस्तानी मच्छीमार आणि २६५ सामान्य नागरिक असल्याचे म्हटले आहे.

दोन्ही देशांनी आपापल्या ताब्यातील परस्परांच्या नागरिकांची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर ताब्यातील या नागरिकांची यादी मुत्सद्यांमार्फत एकमेकांना हस्तांतरित करण्यात आली, असे ‘पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसी’ (पीआयपीएफपीडी) या संस्थेचे माजी सचिव जतीन देसाई यांनी सांगितले.

देसाई यांनी म्हटले की, भारत आणि पाकिस्तान यांनी २00८ मध्ये यासंबंधी एक करार केलेला आहे. त्यानुसार, दोन्ही देश दर सहा महिन्यांनी आपापल्या ताब्यातील परस्परांच्या नागरिकांची माहिती एकमेकांना देतात. १ जानेवारी आणि १ जुलै रोजी ताब्यातील नागरिकांची यादी परस्परांना हस्तांतरित केली जाते. देसाई यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या ताब्यातील बहुतांश मच्छीमार गुजरात आणि शेजारील केंद्रशासित प्रदेश दीवचे आहेत. दोन्ही देशांनी मच्छीमारांची तातडीने मुक्तता करायला हवी. मच्छीमार निरपराध आहेत. त्यांच्याकडून केवळ चुकीने सागरी सीमा ओलांडली गेली आहे.

‘पीआयपीएफपीडी’ ही स्वयंसेवी संस्था असून, भारत आणि पाकिस्तान यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण व्हावेत, यासाठी ती काम करते. या संस्थेच्या दोन्ही देशांत शाखा आहेत. देसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूर्वी भारत-पाकिस्तान संयुक्त न्यायालयीन समिती कार्यरत होती. दोन्ही देशांनी सर्व मच्छीमारांची सुटका करायला हवी, अशी शिफारस या समितीने आपल्या प्रत्येक अहवालात केली आहे. दुर्दैवाने आता ही समिती कार्यरतच नाही. सामान्य नागरिकांचीही विनाअट सुटका व्हायला हवी. परस्परांच्या महिला कैद्यांचीही दोन्ही देशांनी तातडीने सुटका करायला हवी. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महिला कैदी आणि इतर नागरिकांवर दोन्ही देशांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवू नयेत.पाकने समिती सदस्य निवडावेदेसाई यांनी म्हटले की, भारत-पाकिस्तान न्यायालयीन समितीवरील आपल्या चार सदस्यांची पाकिस्तानने तातडीने नेमणूक करून ही समिती कार्यरत करण्याच्या दिशेने पाऊल उचलावे. परस्परांच्या कैद्यांची सुटका करण्यासाठी समितीची बैठक शक्य तितक्या लवकर बोलवायला हवी. अलीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडले आहेत. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांच्या सुटकेचा मुद्दा गंभीर आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान