शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

रशिया-युक्रेन युद्धाच्या चक्रव्यूहात भारतीय तरुण अडकले; २६ जणांचा मृत्यू, ५० अजूनही अडकले, सुटकेसाठी प्रयत्न सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:43 IST

रशिया युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय तरुणांना सोडवण्यासाठी भारताचे राजनैतिक युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

Russia Ukrain War: दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात भीषण आणि प्रदीर्घ चाललेले रशिया-युक्रेन युद्ध आता भारतीय कुटुंबांसाठी चिंतेचा विषय बनले आहे. रशियन सैन्यात भरती झालेल्या २०२ भारतीयांपैकी तब्बल २६ जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे, अजूनही ५० भारतीय तरुण रशियाच्या युद्धभूमीवर मृत्यूशी झुंज देत असून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्रालय शर्थीचे प्रयत्न करत आहे.

आकडेवारी काय सांगते? 

परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२ भारतीय या युद्धामध्ये सहभागी झाले आहेत. त्यापैकी २६ जणांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच दोघांचे पार्थिव दिल्लीत आणले गेले होते. तर ७ भारतीय तरुण रशियन सीमेवरून बेपत्ता आहेत. सरकारच्या प्रयत्नांमुळे ११९ भारतीयांची सुटका झाली असून ते घरी परतले आहेत. मात्र ५० भारतीय अद्याप रशियन सैन्यात आहेत.

कसे अडकले भारतीय तरुण? 

२०२३ च्या सुरुवातीपासून दक्षिण आशियाई तरुणांना रशियन सैन्यात ओढण्याचे एक मोठे रॅकेट सक्रिय झाले. जास्त पगार, रशियन नागरिकत्व आणि सुखी जीवनाचे आमिष दाखवून तरुणांना फसवले गेले. अनेक तरुण विद्यार्थी किंवा पर्यटक व्हिसावर रशियाला गेले होते, मात्र तिथे पोहोचल्यावर त्यांना रशियन सैन्यात सामील होण्यासाठी सक्ती करण्यात आली.काही प्रकरणांमध्ये, रशियात किरकोळ गुन्ह्यात अडकलेल्या भारतीयांना तुरुंगवास भोगा किंवा आघाडीवर जाऊन युद्ध लढा असे दोनच पर्याय देण्यात आले. गुजरातच्या साहील हुसेन नावाच्या तरुणाने ७ वर्षांचा तुरुंगवास टाळण्यासाठी युद्ध निवडले, पण तीनच दिवसात त्याने युक्रेनसमोर शरणागती पत्करली.

नोव्हेंबर २०२४ मध्ये विद्यार्थी व्हिसावर गेलेल्या या तरुणाला सक्तीने सैन्यात घेतले गेले. सप्टेंबर २०२५ मध्ये डोनेस्तक येथील ड्रोन हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. ऑगस्ट २०२५ मध्ये विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या राकेशचा अवघ्या काही दिवसातच डॉनबासमध्ये मृत्यू झाला. रशियन लष्कराच्या सपोर्ट सर्व्हिसमध्ये काम करणाऱ्या केरळच्या एका तरुणाचाही या वर्षाच्या सुरुवातीला मृत्यू झाला.

केवळ रशियाच नाही, तर युक्रेनच्या इंटरनॅशनल लिजनमध्येही सुमारे १०० भारतीयांनी सहभाग घेतल्याचा अंदाज आहे. यामध्येही किमान दोन भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, मात्र अधिकृत आकडा अद्याप समोर आला नाही.

सरकारची भूमिका आणि प्रयत्न

परराष्ट्र मंत्रालयाने मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी १८ कुटुंबीयांचे डीएनएचे नमुने रशियन प्रशासनाकडे सोपवले आहेत. रशियन अधिकाऱ्यांशी उच्च स्तरावर चर्चा करून या तरुणांना करारातून मुक्त करण्यासाठी भारत सरकार दबाव निर्माण करत आहे. मृतदेह पाठवणे असो किंवा अडकलेल्यांना एअर तिकीट मिळवून देणे, यासाठी भारतीय दूतावास सक्रिय आहे.

दरम्यान, युक्रेन युद्धाला आता ३ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. रशियामध्ये मनुष्यबळाची मोठी टंचाई असल्याने ते आशियाई आणि आफ्रिकन तरुणांना भरती करत आहेत. शॅडी एजंट्स हे उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या बेरोजगार तरुणांना टार्गेट करत आहेत. मदत करण्याच्या नावाखाली अनेक एजंट्स तरुणांकडून लाखो रुपये घेतात आणि त्यांना रशियन सैन्याच्या स्पेशल मिलिटरी ऑपरेशनमध्ये ढकलून देतात.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धIndiaभारत