शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

१९७१ च्या युद्धाचे पाकने भान ठेवावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:55 AM

दहशतवादाला खतपाणी घालून काही साध्य होणार नाही, हे पाकिस्तानने ओळखावे आणि १९७१ च्या युद्धात काय झाले होते याचे भान ठेवावे, असा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दहशतवादाला खतपाणी घालून काही साध्य होणार नाही, हे पाकिस्तानने ओळखावे आणि १९७१ च्या युद्धात काय झाले होते याचे भान ठेवावे, असा इशारा सत्ताधारी ‘रालोआ’चे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार एम. व्यंकय्या नायडू यांनी रविवारी येथे दिला. १९७१च्या युद्धात पाकिस्तानचा सपशेल पराभवच झाला नव्हता तर त्याचे दोन तुकडे होऊन स्वतंत्र बांगलादेश उदयास आला होता.सन १९९९ मधील पाकिस्तानसोबतच्या कारगिल युद्धात प्राणाहुती दिलेल्या वीरजवानांच्या स्मृत्यर्थ आयोदित ‘कारगिल पराक्रम परेड’नंतर नायडू बोलते होते.नायडू म्हणाले की, आमच्या शेजारी देशाने मागच्या अनुभवावरून शिकावे. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असल्याने त्याने कोणाचेच भले होत नाही. पण दुर्दैवाने पाकिस्तानने शासन व्यवहाराच्या धोरणाचा भाग म्हणून दहशतवादाचा वापर करीत आहे. पाकिस्तान काश्मीरमध्ये केवळ लुडबूडच करत नाही तर तेथे दहशतवादास सक्रियतेने पाठिंबा देत आहे, असाही त्यांनी आरोप केला.नायडू असेही म्हणाले की, भारत हा शांतताप्रिय देश आहे. भारताने कधीही कोणावर आक्रमण केलेले नाही, ही त्याची खासियत आहे. आम्हाला युद्ध, संघर्ष नको आहे. आम्हाला शांतता हवी आहे व शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. पण शेजाऱ्यांनीही भ्रातृभाव दाखवावा, अशी आमची अपेक्षा आहे. येत्या महिनाभरात देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर बसणार असलेल्या नायडू यांनी मंत्री असल्याप्रमाणे एवढी थेट व तिखट भाषा वापरावी, हे लक्षणीय आहे.काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे व पाकव्याप्त काश्मिरमधील इंचभरही जमीन कोणी भारतापासून हिरावून घेऊ शकणार नाही, याची पाकिस्तानने पक्की खुणगाठ बांधावी.- एम. व्यंकय्या नायडू