शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

CoronaVirus: कोरोना काळात जगभरातील 15 लाख चिमुकले अनाथ, भारतातूनही समोर आला धक्कादायक आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 16:00 IST

तज्ज्ञांच्या मते, भारतात मार्च 2021 ते एप्रिल 2021दरम्यान अनाथालयांतील मुलांचे प्रमाण 8.5 पट वाढले आहे. या काळात येथील अनाथ मुलांची संख्या 5,091 वरून 43,139 वर पोहोचली आहे.

वॉशिंग्टन - कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे.  या महामारीने आतापर्यंत लाखो लोकांचा जीव घेतला आहे आणि लाखो मुलं या काळात अनाथही झाली आहेत. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत जगभरातील तब्बल 15 लाख बालकांनी आपले आई-वडील अथवा यांपैकी कुण्या एकाला गमावले आहे. द लँसेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नव्या अध्ययनात हे समोर आले आहे.

रिपोर्टनुसार, यांपैकी एक लाख 90 हजार बालकं एकट्या भारतातील आहेत. ज्यांनी कोरोना काळात आपले आई, वडील, आजी, आजोबा यांपैकी कुणाला ना कुणाला गमावले आहे. यात सांगण्यात आले आहे, की कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या 14 महिन्यांत 10 लाखहून अधिक बालकांनी आपले आई-वडील दोघेही अथवा यांपैकी कुण्या एकाला गमावले. तर इतरांनी त्यांच्यासोबत राहणाऱ्या आजी-आजोबांना गमावले आहे.

देशात ६७.६ टक्के लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधक ॲंटिबॉडीज आढळल्या

तज्ज्ञांच्या मते, भारतात मार्च 2021 ते एप्रिल 2021दरम्यान अनाथालयांतील मुलांचे प्रमाण 8.5 पट वाढले आहे. या काळात येथील अनाथ मुलांची संख्या 5,091 वरून 43,139 वर पोहोचली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की ज्या मुलांनी आई वडील अथवा आपले पालक गमावले आहेत, त्यांच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर खोलवर अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका आहे. त्यांनी, आजार, शारीरिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि किशोरवयीन गर्भधारणेच्या जोखमेबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.

यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन कोविड-19 रिस्पांस टीमचे मुख्य लेखक डॉ. सुसान हिलिस यांनी म्हटले आहे, की गेल्या 30 एप्रिल, 2021पर्यंत कोरोनामुळे जगभरात 30 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे 15 मुले अनाथ झाली आहेत, असे आमच्या संशोधनात समोर आले आहे.

CoronaVirus Live Updates : महाराष्ट्र आणि केरळमध्येच का वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या?; IMA अध्यक्षांनी सांगितलं नेमकं कारण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAmericaअमेरिकाIndiaभारत