शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

CoronaVirus: कोरोना काळात जगभरातील 15 लाख चिमुकले अनाथ, भारतातूनही समोर आला धक्कादायक आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 16:00 IST

तज्ज्ञांच्या मते, भारतात मार्च 2021 ते एप्रिल 2021दरम्यान अनाथालयांतील मुलांचे प्रमाण 8.5 पट वाढले आहे. या काळात येथील अनाथ मुलांची संख्या 5,091 वरून 43,139 वर पोहोचली आहे.

वॉशिंग्टन - कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे.  या महामारीने आतापर्यंत लाखो लोकांचा जीव घेतला आहे आणि लाखो मुलं या काळात अनाथही झाली आहेत. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत जगभरातील तब्बल 15 लाख बालकांनी आपले आई-वडील अथवा यांपैकी कुण्या एकाला गमावले आहे. द लँसेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नव्या अध्ययनात हे समोर आले आहे.

रिपोर्टनुसार, यांपैकी एक लाख 90 हजार बालकं एकट्या भारतातील आहेत. ज्यांनी कोरोना काळात आपले आई, वडील, आजी, आजोबा यांपैकी कुणाला ना कुणाला गमावले आहे. यात सांगण्यात आले आहे, की कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या 14 महिन्यांत 10 लाखहून अधिक बालकांनी आपले आई-वडील दोघेही अथवा यांपैकी कुण्या एकाला गमावले. तर इतरांनी त्यांच्यासोबत राहणाऱ्या आजी-आजोबांना गमावले आहे.

देशात ६७.६ टक्के लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधक ॲंटिबॉडीज आढळल्या

तज्ज्ञांच्या मते, भारतात मार्च 2021 ते एप्रिल 2021दरम्यान अनाथालयांतील मुलांचे प्रमाण 8.5 पट वाढले आहे. या काळात येथील अनाथ मुलांची संख्या 5,091 वरून 43,139 वर पोहोचली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की ज्या मुलांनी आई वडील अथवा आपले पालक गमावले आहेत, त्यांच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर खोलवर अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका आहे. त्यांनी, आजार, शारीरिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि किशोरवयीन गर्भधारणेच्या जोखमेबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.

यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन कोविड-19 रिस्पांस टीमचे मुख्य लेखक डॉ. सुसान हिलिस यांनी म्हटले आहे, की गेल्या 30 एप्रिल, 2021पर्यंत कोरोनामुळे जगभरात 30 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे 15 मुले अनाथ झाली आहेत, असे आमच्या संशोधनात समोर आले आहे.

CoronaVirus Live Updates : महाराष्ट्र आणि केरळमध्येच का वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या?; IMA अध्यक्षांनी सांगितलं नेमकं कारण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAmericaअमेरिकाIndiaभारत