शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

कर्ज घेऊन UPSC ची तयारी, शिक्षणासाठी शेकडो किमी पायपीट; संघर्षातून बनले IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 12:33 IST

वीरच्या वडिलांनी मुलाला यूपीएससीची तयारी करायची आहे त्यासाठी व्याजावर पैसे घेतले. त्यांची सर्व कमाई घरच्या गरजा पूर्ण करण्यास जात होती.

कुटुंबाची परिस्थिती हालाखीची, परंतु काहीतरी करून दाखवण्याची जिद्द उराशी होती. शिक्षणासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागली. एकवेळ अशी आली की शिक्षणासाठी कर्ज घ्यावं लागलं. ही कहाणी आहे वीर नावाच्या युवकाची. ज्याने संघर्षातून वाट काढून यशाकडे झेप घेतली आहे. "मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनो मे जान होती है, पंख से कुछ नही होता, हौसलो से उडान होती है" ही हिंदीतील म्हणं या युवकाच्या आयुष्यात चपखल बसते. 

उत्तर प्रदेशातील छोट्या गावात दलपतपूर येथे राहणाऱ्या वीर प्रताप सिंह राघवनं यशाचं शिखर गाठलं. अनेक अडचणी, समस्यांचा डोंगर पार करत त्याने यूपीएससीच्या परीक्षेत यश संपादन केले. वीरची यूपीएससीची कहाणी अनेक स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या युवकांना प्रेरणादायी आहे. UPSC परीक्षेत वीर प्रताप सिंहनं ९२ वा क्रमांक पटकावला. सुरुवातीला आर्य समाज स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर ६ वी ते १० वीपर्यंत शिकारपूरच्या सरस्वती विद्या मंदिरात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शाळेत जाण्यासाठी घरापासून ५ किलोमीटर अंतर होतं. त्यावेळी गावात पूल नव्हता, त्यामुळे नदी ओलांडून त्यांना शाळेत जावं लागत होते. 

वीरच्या वडिलांनी मुलाला यूपीएससीची तयारी करायची आहे त्यासाठी व्याजावर पैसे घेतले. त्यांची सर्व कमाई घरच्या गरजा पूर्ण करण्यास जात होती. मात्र तरीही मुलावर वडिलांनी पूर्ण विश्वास ठेवला आणि त्याला परीक्षेसाठी आर्थिक मदत केली. वीरचे वडील गावात शेती करतात. अलीगड येथे महाविद्यालयात वीर यांनी मॅकेनिकल इंजिनिअर शिक्षण पूर्ण केले. इंजिनिअर फिल्ड असूनही त्यांनी UPSC तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात वीर यांना अपयश आलं. मात्र जिद्द न हरता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षेला बसले त्यातही यश मिळालं नाही. २ प्रयत्नानंतर त्यांनी आणखी मेहनत घेतली आणि परीक्षेत यशस्वी झाले. दरम्यान, वीर प्रताप सिंह यांच्या मोठ्या भावाचंही आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न होतं. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी सीआरपीएफमध्ये नोकरी स्वीकारली. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी