शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:15 IST

श्रीनाथ यांची यशोगाथा इतरांपेक्षा वेगळी आहे. ना त्यांनी महागडी पुस्तके खरेदी केली, ना एखाद्या कोचिंग क्लासला जात शिक्षण घेतले

नवी दिल्ली - जर तुमच्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर कुठलीही आव्हाने तुम्हाला रोखू शकत नाहीत. श्रीनाथ के या व्यक्तीची कहाणी अशीच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. गरिबी आणि संघर्षमय आयुष्य जगताना त्यांनी कधी हार मानली नाही. रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून करत असताना स्टेशनवर मिळणाऱ्या फ्री वाय-फायचा सदुपयोग करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि UPSC परीक्षा उत्तीर्ण होत IAS बनले.  

श्रीनाथ हे केरळच्या मुन्नार येथील रहिवासी आहेत. एखाद्याने परिस्थितीशी लढायचं ठरवले तर यशही त्याच्या पदरी पडतेच हे श्रीनाथ यांच्याकडे पाहून कळेल. कुटुंबात एकमेव कमावते सदस्य असलेले श्रीनाथ एर्नाकुलम येथे कुलीचे काम करत होते. दिवसाला ४००-५०० रुपये मजुरी मिळायची. डोक्यावर दुसऱ्याचं ओझं घेऊन चालायचे, त्यातून कशीबशी कमाई व्हायची. या संघर्षमय प्रवासात त्यांनी नागरी सेवा करत देशाची सेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगले होते. 

श्रीनाथ यांची यशोगाथा इतरांपेक्षा वेगळी आहे. ना त्यांनी महागडी पुस्तके खरेदी केली, ना एखाद्या कोचिंग क्लासला जात शिक्षण घेतले. रेल्वे स्टेशनवर मिळणाऱ्या फ्री वाय-फाय इंटरनेटचा आधार त्यांनी अभ्यासासाठी घेतला. त्यांच्याकडे इतके पैसेही नव्हते ते कोचिंग सेंटरला जाऊ शकतील परंतु कधीही हार न मानता त्यांनी आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण करायचेच हे ठरवून टाकले होते. २०१६ साली रेलटेल आणि गुगलने भारतातील अनेक रेल्वे स्टेशनवर मुफ्त वाय-फाय सेवा सुरू केली होती. श्रीनाथ त्यावेळी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर काम करत होते. फ्री वाय-फायमधून त्यांनी ऑडिओ बुक, व्हिडिओ डाऊनलोड केले. कुलीचं काम करत करत त्यांनी अभ्यासही सुरूच ठेवला. व्हिडिओच्या माध्यमातून ते ऑनलाईन लेक्चर पाहत होते. 

श्रीनाथ यांचा आयएएस बनण्याचा प्रवास इतका सहज सोपा नव्हता. त्यांनी बऱ्याचदा यूपीएससी परीक्षा दिली परंतु यश मिळाले नाही. अखेर श्रीनाथ यांच्या मेहनतीला फळ मिळाले. चौथ्या प्रयत्नात त्यांना चांगली रँक मिळत यूपीएससी परीक्षेत पास झाले. रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून काम करणारे श्रीनाथ के आपल्या अढळ दृढनिश्चय आणि चिकाटीने भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी झाले. आज ते अशा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत जे अथक प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने निराश होतात. कुठलीही आव्हाने तुमच्या यश थांबवू शकत नाही. फक्त काहीतरी करून दाखवण्याची जिद्द कायम ठेवली पाहिजे.  

टॅग्स :MumbaiमुंबईInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी