शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Lokmat infra Conclave:...त्यानंतर घरांच्या किमती कमी होतील; मुंबईत मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 10:36 IST

म्हाडावरील नागरिकांच्या विश्वासामुळे प्रत्येक सोडतीला चांगला प्रतिसाद मिळतो. एका घरासाठी दोनशे ते अडीचशे अर्ज असतात. ही एका अर्थाने अभिमानाची बाब असली तरी त्याचवेळी थोडी खेदाचीही बाब आहे की प्रत्येक घरामागे अडीचशे लोक ताटकळत असतात.

मुंबई : बीडीडी चाळी आणि मोतीलाल नगरच्या पुनर्वसनातून मुंबईत मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध होणार आहेत. घरांचा पुरवठा वाढला की किमती कमी होण्यास मदत होणार असल्याचे गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी सांगितले.

‘सगळ्यांना घर आणि सगळ्यांसाठी घर’ या विषयावर सादरीकरण केले. म्हैसकर म्हणाले, गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून ८० वर्षे जुने असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. एकूण ३५ हजार कोटींच्या या प्रकल्पातून २३ हजार घरे तयार केली जाणार आहेत. त्यात पुनर्वसनासाठीच्या १५ हजार घरांव्यतिरिक्त नवी आठ हजार घरे निर्माण होणार आहेत. तर, गोरेगावच्या मोतीलाल नगरच्या पुनर्विकास प्रकल्पात २५ हजार घरे स्थानिकांना मिळणार आहेत. ४२ एकरावरच्या या वसाहतीच्या पुनर्विकासानंतर २५ हजार लोकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. तर, साधारण बारा-साडेबारा हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी सांगितले.

म्हाडावरील नागरिकांच्या विश्वासामुळे प्रत्येक सोडतीला चांगला प्रतिसाद मिळतो. एका घरासाठी दोनशे ते अडीचशे अर्ज असतात. ही एका अर्थाने अभिमानाची बाब असली तरी त्याचवेळी थोडी खेदाचीही बाब आहे की प्रत्येक घरामागे अडीचशे लोक ताटकळत असतात. ही दरी भरून काढण्यासाठी म्हाडा व एसआरएच्या माध्यमातून काम होत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील वीस लाख मंजूर घरे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, असे म्हैसकर यांनी सांगितले.

पुरवठा वाढला की किंमती कमी होतात, हा साधा बाजारपेठीय नियम आहे. त्यामुळे घरांचा पुरवठा, उपलब्धता वाढली की किमती कमी होतील. गृहनिर्माण विभागाच्या विविध प्रयत्नांतून पुढील काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध होतील. - मिलिंद म्हैसकर प्रधान सचिव, गृहनिर्माण

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजन