शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

म्हाडाच्या नवीन प्रकल्पांमध्ये मेडिकल फॅसेलिटी उभारणार; जितेंद्र आव्हाड यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 17:06 IST

'25 वर्षानंर बीडीडी चाळीच्या डेव्हलपमेंटची सुरुवात झाली, येत्या काळात बीबीडी नायगाव, बीबीडी एनएम जोशी आणि बीडीडी वरळी याचेही काम सुरू होईल.'

मुंबई:मुंबई:लोकमततर्फे आज 'लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह' 'महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप' या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडासंबंधीत महत्वाची माहिती दिली.

सामान्यांना हक्काचे घर मिळण्याची प्रक्रिया सोपी केलीयावेळी आव्हाड म्हणाले की, आम्ही इज ऑफ डूइंग बिझनेस संदर्भात मीटिंग घेतली आणि सामान्यांना मुंबईत त्यांचे हक्काचे घर कसे मिळवता येईल, यासाठी विविध निर्णय घेतले. आमचे सरकार येण्याच्या आधी दहा वर्षात म्हाडाने फक्त दोनशे एलओेलआय दिले. पण, आमचे सरकार आल्यानंतर फक्त दोन वर्षात आम्ही 200 एलओआय दिले आहेत. याशिवाय, आम्ही फाइलींची संख्या कमी केली, म्हणजेच सामान्य व्यक्तीला घर मिळवण्यात काही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली. याशिवाय, 25 वर्षानंर बीडीडी चाळीच्या डेव्हलपमेंटची सुरुवात झाली आहे.  मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात बीबीडी नायगाव, बीबीडी एनएम जोशी आणि बीडीडी वरळी याचेही काम सुरू होईल. 

म्हाडाद्वारे इमारती डेव्हलप होणारते पुढे म्हणाले की, मुंबईत विशेषतः दक्षिण मुंबईत कित्येक दशके जुन्या इमारती आहेत. यासाठी आम्ही कायदा केलाय, राष्ट्रपतींकडे याची फाईल आहे. त्या फाईलवर त्यांची सही होणे बाकी आहे. यासंदर्भात राष्ट्रपती भवनालाही पत्र लिहीले आहे. हा कायदा आल्यानंतर आम्हाला विविध मालमत्ता कायद्याने मिळवून म्हाडाद्वारे डेव्हलप करणार आहोत. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इमारतीमध्ये जवळपास पाच हजार स्केअर फुटची जागा मेडिकल फॅसेलिटीसाठी राखीव असेल, अशीही माहिती त्यांनी दिली.

शिवडी-उरण परिसरात वसाहत निर्माण होणारते पुढे म्हणाले की, सध्या मुंबईत कुठेच खासगी जागा उपलब्ध नाही. ज्या जागा आहेत, त्यातील बहुतांश जागा म्हाडाकडे आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी म्हाडाच्या वसाहती आहेत, त्या वन बिल्डींग डेव्हलपमेंट बंद करणार आहोत. संपूर्ण म्हाडाला एकदाच डेव्हलप करण्याची योजना आहे. एक-एक बिल्डींग डेव्हलप करणे अवघड आहे. मुंबई आता वाढू शकत नाही, तिकडे शिवडी-उरण परिसरात खूप जमिनी आहेत. येत्या काळात तिकडे वसाहती होणार आणि कनेक्टर रोड झाल्यानंतर शिवडीवरुन मुंबईला यायला फक्त 20 मिनिटे लागणार, ही महत्वाची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

आवास योजना सुरू करणारयावेळी आव्हाडांनी आवास योजना सुरू करणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या 25 वर्षापासून हाउसिंग डिपार्टमेंट मुख्यमंत्र्याकडे असायचे. मुख्यमंत्र्यांकडे इतक्या फाइल यायच्या की, हाउसिंगला वेळ मिळायचा नाही. पण, अनेक वर्षानंतर हाउसिंगला स्वतंत्र मंत्री मिळाला. मी आता लवकरच 'आवास योजना' सुरू करतोय. मुंबईतल्या झोपडपट्ट्याबाबत असलेल्या 523 योजना बंद पडल्यात, त्यांची सुरुवात करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेत आहोत. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे, लवकर यावर निर्णय होऊ शकतो, अशीही माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडLokmatलोकमतMumbaiमुंबई