शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

म्हाडाच्या नवीन प्रकल्पांमध्ये मेडिकल फॅसेलिटी उभारणार; जितेंद्र आव्हाड यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 17:06 IST

'25 वर्षानंर बीडीडी चाळीच्या डेव्हलपमेंटची सुरुवात झाली, येत्या काळात बीबीडी नायगाव, बीबीडी एनएम जोशी आणि बीडीडी वरळी याचेही काम सुरू होईल.'

मुंबई:मुंबई:लोकमततर्फे आज 'लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह' 'महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप' या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडासंबंधीत महत्वाची माहिती दिली.

सामान्यांना हक्काचे घर मिळण्याची प्रक्रिया सोपी केलीयावेळी आव्हाड म्हणाले की, आम्ही इज ऑफ डूइंग बिझनेस संदर्भात मीटिंग घेतली आणि सामान्यांना मुंबईत त्यांचे हक्काचे घर कसे मिळवता येईल, यासाठी विविध निर्णय घेतले. आमचे सरकार येण्याच्या आधी दहा वर्षात म्हाडाने फक्त दोनशे एलओेलआय दिले. पण, आमचे सरकार आल्यानंतर फक्त दोन वर्षात आम्ही 200 एलओआय दिले आहेत. याशिवाय, आम्ही फाइलींची संख्या कमी केली, म्हणजेच सामान्य व्यक्तीला घर मिळवण्यात काही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली. याशिवाय, 25 वर्षानंर बीडीडी चाळीच्या डेव्हलपमेंटची सुरुवात झाली आहे.  मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात बीबीडी नायगाव, बीबीडी एनएम जोशी आणि बीडीडी वरळी याचेही काम सुरू होईल. 

म्हाडाद्वारे इमारती डेव्हलप होणारते पुढे म्हणाले की, मुंबईत विशेषतः दक्षिण मुंबईत कित्येक दशके जुन्या इमारती आहेत. यासाठी आम्ही कायदा केलाय, राष्ट्रपतींकडे याची फाईल आहे. त्या फाईलवर त्यांची सही होणे बाकी आहे. यासंदर्भात राष्ट्रपती भवनालाही पत्र लिहीले आहे. हा कायदा आल्यानंतर आम्हाला विविध मालमत्ता कायद्याने मिळवून म्हाडाद्वारे डेव्हलप करणार आहोत. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इमारतीमध्ये जवळपास पाच हजार स्केअर फुटची जागा मेडिकल फॅसेलिटीसाठी राखीव असेल, अशीही माहिती त्यांनी दिली.

शिवडी-उरण परिसरात वसाहत निर्माण होणारते पुढे म्हणाले की, सध्या मुंबईत कुठेच खासगी जागा उपलब्ध नाही. ज्या जागा आहेत, त्यातील बहुतांश जागा म्हाडाकडे आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी म्हाडाच्या वसाहती आहेत, त्या वन बिल्डींग डेव्हलपमेंट बंद करणार आहोत. संपूर्ण म्हाडाला एकदाच डेव्हलप करण्याची योजना आहे. एक-एक बिल्डींग डेव्हलप करणे अवघड आहे. मुंबई आता वाढू शकत नाही, तिकडे शिवडी-उरण परिसरात खूप जमिनी आहेत. येत्या काळात तिकडे वसाहती होणार आणि कनेक्टर रोड झाल्यानंतर शिवडीवरुन मुंबईला यायला फक्त 20 मिनिटे लागणार, ही महत्वाची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

आवास योजना सुरू करणारयावेळी आव्हाडांनी आवास योजना सुरू करणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या 25 वर्षापासून हाउसिंग डिपार्टमेंट मुख्यमंत्र्याकडे असायचे. मुख्यमंत्र्यांकडे इतक्या फाइल यायच्या की, हाउसिंगला वेळ मिळायचा नाही. पण, अनेक वर्षानंतर हाउसिंगला स्वतंत्र मंत्री मिळाला. मी आता लवकरच 'आवास योजना' सुरू करतोय. मुंबईतल्या झोपडपट्ट्याबाबत असलेल्या 523 योजना बंद पडल्यात, त्यांची सुरुवात करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेत आहोत. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे, लवकर यावर निर्णय होऊ शकतो, अशीही माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडLokmatलोकमतMumbaiमुंबई