शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

Lokmat Infra Conclave: शिवसेनेच्या मंत्र्यांसमोर थोरात म्हणाले, आम्हाला वजा केलं तर काहीच नाही; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 13:20 IST

Lokmat Infra Conclave: लोकमतच्या इन्फ्रा कॉन्क्लेव्हमध्ये बाळासाहेब थोरातांनी मांडलं इन्फ्रा व्हिजन

मुंबई: गेली दोन वर्षे सगळ्यांसाठीच आव्हानात्मक होती. कोरोना संकटात संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. लोकांचा जीव वाचवणं महत्त्वाचं होतं. पण त्यासोबतच राज्याचा विकास सुरू ठेवणंदेखील गरजेचं होतं. महाविकास आघाडी सरकारनं दोन्ही आघाड्यांवर उत्तम काम केलं, असं मत महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. ते 'लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह'मध्ये बोलत होते.

बाळासाहेब थोरात यांच्याआधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी राज्यात सुरू असलेली विकासकामं, रस्ते बांधणी, उद्योग याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर बोलताना थोरात यांनी महसूल विभागाचं महत्त्व सांगितलं. विविध विकासकामांमध्ये, उद्योगांमध्ये महसूल विभागाचं काम किती मोलाचं असतं ते थोरात यांनी थोडक्यात सांगितलं.

'तुम्ही पूल पाहिला. पण त्याखाली असलेली जमीन पाहिलीच नाही. तुम्ही विकास कामांसाठी आवश्यक असलेलं भूसंपादन पाहिलं नाही. तुम्ही सात बारा, प्रॉपर्टी कार्ड, स्टॅम्प ड्युटी, रेडी रेकनर पाहिला नाही. गौण खनिजाचा विषय लक्षात घेतला नाही. अरे आम्हाला वजा केलं तर काहीच नाही,' असं थोरात यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. कोणताही उद्योग, विकास प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्वात महत्त्वाची असते जमीन. कारण तिथूनच तर उद्योग आणि प्रकल्पांची सुरुवात होते, असं थोरात म्हणाले.

विकासाला चालना देण्यासाठी लवकरच एनएबद्दल मोठा निर्णय घेणार असल्याचं थोरात यांनी सांगितलं. २०१४ च्या आधी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना आम्ही एनएमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. कारण कोणताही उद्योग सुरू करताना सर्वाधिक त्रास एनएमुळे होतो. पण आता एनए सहजसोपा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आता जिथे एनए असेल, त्याची माहिती महसूल विभागच तुम्हाला देईल. त्यासाठी सनदेचा मसुदा फायनल करायचा आहे. यामुळे एनएची सनद मिळणं सोपं होईल, असं थोरात यांनी सांगितलं.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातEknath Shindeएकनाथ शिंदेSubhash Desaiसुभाष देसाई