शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Lokmat Infra Conclave: शिवसेनेच्या मंत्र्यांसमोर थोरात म्हणाले, आम्हाला वजा केलं तर काहीच नाही; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 13:20 IST

Lokmat Infra Conclave: लोकमतच्या इन्फ्रा कॉन्क्लेव्हमध्ये बाळासाहेब थोरातांनी मांडलं इन्फ्रा व्हिजन

मुंबई: गेली दोन वर्षे सगळ्यांसाठीच आव्हानात्मक होती. कोरोना संकटात संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. लोकांचा जीव वाचवणं महत्त्वाचं होतं. पण त्यासोबतच राज्याचा विकास सुरू ठेवणंदेखील गरजेचं होतं. महाविकास आघाडी सरकारनं दोन्ही आघाड्यांवर उत्तम काम केलं, असं मत महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. ते 'लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह'मध्ये बोलत होते.

बाळासाहेब थोरात यांच्याआधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी राज्यात सुरू असलेली विकासकामं, रस्ते बांधणी, उद्योग याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर बोलताना थोरात यांनी महसूल विभागाचं महत्त्व सांगितलं. विविध विकासकामांमध्ये, उद्योगांमध्ये महसूल विभागाचं काम किती मोलाचं असतं ते थोरात यांनी थोडक्यात सांगितलं.

'तुम्ही पूल पाहिला. पण त्याखाली असलेली जमीन पाहिलीच नाही. तुम्ही विकास कामांसाठी आवश्यक असलेलं भूसंपादन पाहिलं नाही. तुम्ही सात बारा, प्रॉपर्टी कार्ड, स्टॅम्प ड्युटी, रेडी रेकनर पाहिला नाही. गौण खनिजाचा विषय लक्षात घेतला नाही. अरे आम्हाला वजा केलं तर काहीच नाही,' असं थोरात यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. कोणताही उद्योग, विकास प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्वात महत्त्वाची असते जमीन. कारण तिथूनच तर उद्योग आणि प्रकल्पांची सुरुवात होते, असं थोरात म्हणाले.

विकासाला चालना देण्यासाठी लवकरच एनएबद्दल मोठा निर्णय घेणार असल्याचं थोरात यांनी सांगितलं. २०१४ च्या आधी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना आम्ही एनएमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. कारण कोणताही उद्योग सुरू करताना सर्वाधिक त्रास एनएमुळे होतो. पण आता एनए सहजसोपा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आता जिथे एनए असेल, त्याची माहिती महसूल विभागच तुम्हाला देईल. त्यासाठी सनदेचा मसुदा फायनल करायचा आहे. यामुळे एनएची सनद मिळणं सोपं होईल, असं थोरात यांनी सांगितलं.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातEknath Shindeएकनाथ शिंदेSubhash Desaiसुभाष देसाई