शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

महिला हॉकी विश्वचषक : भारताचे लक्ष्य उपांत्य फेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 03:57 IST

विजयी पथावर परतलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात आज गुरुवारी ‘जायंट किलर’ आयर्लंडला नमवून ४४ वर्षांनंतर उपांत्य फेरी गाठण्याची आशा आहे.

लंडन : विजयी पथावर परतलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात आज गुरुवारी ‘जायंट किलर’ आयर्लंडला नमवून ४४ वर्षांनंतर उपांत्य फेरी गाठण्याची आशा आहे. भारताने काल इटलीवर ३-० ने विजय मिळविला होता. आयर्लंडवर विजय मिळाल्यास भारतीय संघ दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत दाखल होईल.१९७४ साली फ्रान्समध्ये झालेल्या विश्वचषकात भारताने उपांत्य फेरी गाठली; पण चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. अर्जेंटिनाच्या सेसारियो येथे झालेल्या मागच्या विश्वचषकात भारत आठव्या स्थानावर राहिला.आयर्लंडने मागच्या दोन सामन्यांत भारताचा पराभव केला असल्यामुळे मानसिकदृष्ट्या त्यांचे पारडे जड आहे. ब गटात भारत आणि अमेरिका यांचा समावेश असताना आयर्लंडने अव्वल स्थान पटकविले होते.आयर्लंडने येथे भारताला साखळीत नमविण्याआधी जोहान्सबर्ग येथेही मागच्या वर्षी हॉकी विश्व लीगच्या उपांत्य फेरीत २-१ ने नमविले होते. जागतिक क्रमवारीत १६ व्या स्थानावर असलेल्या या संघाने अमेरिकेला ३-१ ने आणि भारताला ०-१ ने नमवून आधीच ऐतिहासिक कामगिरी केली आहे.भारताने एकमेव विजय क्रॉसओव्हर सामन्यात इटलीवर नोंदविला. या विजयामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावला आहे. गोलकीपर सविताने आतापर्यंत शानदार कामगिरी केली असून, आक्रमक फळीनेदेखील सांघिक बळ सिद्ध केले आहे. दरम्यान, दुसºया उपांत्यपूर्व सामन्यात हॉलंडची गाठ इंग्लंडविरुद्ध पडणार आहे. (वृत्तसंस्था)इटलीविरुद्ध गोल नोंदविण्यात आम्ही यशस्वी ठरलो. ही लय पुढेही कायम राहील. आमचे लक्ष्य उपांत्य फेरी असल्याने आयर्लंडवर विजय नोंदविण्यासाठी सर्वशक्तीनिशी खेळणार आहोत.- राणी रामपाल, कर्णधार.

टॅग्स :Hockeyहॉकी