शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Tokyo Olympics: महिला हॉकी संघ अर्जेंटिनाला नमविणार? अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 07:18 IST

Indian Women's hockey team: ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी लाभली आहे. बुधवारी होणाऱ्या सामन्यात अर्जेंटिनाला नमवल्यास भारतीय महिला हॉकी संघ पहिल्यांदा ऑलिम्पिक पदक निश्चित करेल.

टोकियो : ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी लाभली आहे. बुधवारी होणाऱ्या सामन्यात अर्जेंटिनाला नमवल्यास भारतीय महिला हॉकी संघ पहिल्यांदा ऑलिम्पिक पदक निश्चित करेल. याआधी १९८० सालच्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांनी चौथे स्थान पटकावले होते. ही आतापर्यंत भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली.भारतीय महिलांनी सोमवारी धक्कादायक विजय मिळवताना तीन वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला १-० असे नमवत पहिल्यांदाच ऑलिम्पिक उपांत्य फेरी गाठली. मंगळवारी भारतीय पुरुष हॉकी संघाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. मात्र आता ते कांस्यपदकासाठी खेळतील. त्यामुळे आता सुवर्णपदकासाठी भारतीयांच्या सर्व आशा महिला हॉकी संघावर टिकल्या आहेत.ऑलिम्पिकमधील शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिलांनी जागतिक क्रमवारीत सातवे स्थान पटकावले आहे. आतापर्यंतची ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. गोलरक्षक सविताच्या नेतृत्वात भारताच्या बचावफळीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार खेळ केला.केवळ एका गोलने घेतलेली आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवत भारतीयांनी जबरदस्त संरक्षण केले. त्यामुळे आता भारताला पदक मिळवून देण्यासाठी या बचावफळीवर मोठी जबाबदारी असेल. 

आत्मविश्वास उंचावलाअर्जेंटिनाच्या महिला संघाने सिडनी २००० आणि लंडन २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. मात्र, अद्याप त्यांना सुवर्ण पटकावता आलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून पूर्ण ताकदीने खेळ होईल, यात शंका नाही. पहिले तीन सामने गमावल्यानंतर जबरदस्त मुसंडी मारली. 

भारताचा सुवर्ण स्वप्नभंग... भारतीय पुरुष हाॅकी संघाचे ऑलिम्पिकमध्ये ४१ वर्षानंतर सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न मंगळवारी बेल्जियमकडून उपांत्य सामन्यात ५-२ ने झालेल्या पराभवासह भंगले. कांस्यपदकाची अपेक्षा मात्र अद्याप कायम असून, भारताला जर्मनीविरुद्ध ५ ऑगस्ट रोजी सामना खेळावा लागणार आहे.सामन्यात एकवेळ भारत आघाडीवर होता; मात्र अखेरच्या ११ मिनिटांत तीन गोल गमावणे तसेच अलेक्झांडर हेंड्रिक्स (१९, ४९ आणि ५३ व्या मिनिटाला)याने नोंदविलेली हॅट्‌ट्रिक या दोन बाबी महागड्या ठरल्या. विश्वविजेत्या बेल्जियमकडून हेंड्रिक्सशिवाय फॅनी लयपर्टने दुसऱ्या आणि जॉनडोहमेनने ६० व्या मिनिटाला गोल केला. भारताकडून हरमनप्रीतसिंग याने सातव्या आणि मनदीपसिंगने आठव्या मिनिटाला गोल केला. बेल्जियम संघ रिओ ऑलिम्पिकचा रौप्य विजेता असून, आज दुसऱ्यांदा त्यांनी ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठली आहे. 

भारताने दिले १४ पेनल्टी कॉर्नर...आठ सुवर्णपदकांसह ११ ऑलिम्पिक पदके खात्यावर असणाऱ्या भारताने एकेकाळी हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील सध्याच्या संघाला त्या यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. उपांत्य फेरीमध्ये भारत कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते; मात्र पहिल्या हाफमध्ये सामना बरोबरीत राखण्यात यश आल्यानंतर भारतीय संघाला तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये एकही गोल करता आला नाही. पराभवासाठी भारतीय संघ स्वत: दोषी ठरला. हेंड्रिक्स आणि लयपर्ट हे पेनल्टी तज्ज्ञ असल्याने भारताच्या डीमध्ये शिरून पेनल्टी कॉर्नर मिळवणे ही प्रतिस्पर्धी संघाची रणनीती होती. त्यात ते यशस्वी झाले. बेल्जियमला एकापाठोपाठ १४ पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यात पाचपैकी चार गोल पेनल्टी कॉर्नरवर केले. भारताला पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्यापैकी केवळ एकावर गोल होऊ शकला.

 १९८० च्या ऑलिम्पिकमधील भारताने अखेरचे सुवर्णपदक स्पेनला ४-३ अशा फरकाने हरवून प्राप्त केले होते; पण त्यावेळी उपांत्य फेरीचा सामना नव्हता. त्याआधी १९७२ च्या म्युनिच ऑलिम्पिकमध्ये भारताने अखेरची उपांत्य फेरी गाठली होती. तेव्हा पाकिस्तानकडून भारताचा ०-२ ने पराभव झाला होता. 

टॅग्स :Hockeyहॉकीindia at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021