शहरं
Join us  
Trending Stories
1
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
2
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
3
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
4
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
5
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
6
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
7
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
8
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
9
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
10
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
11
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
12
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
13
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
14
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
15
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
16
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
17
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
18
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
19
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
20
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी

कभी रुकना नही, चलतेही रहना : हेलन मेरी इनोसंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:41 IST

खेळात करियर करणे सोपे नाही. सर्वच खेळाडू सुरुवातीपासून सेलीब्रिटी नसतात तर ते सराव आणि मेहनतीने यश मिळवत सेलीब्रिटी बनतात, असे प्रतिपादन अर्जून पुरस्कार विजेत्या गोलरक्षक हॉकीपटू हेलन मेरी इनोसंट यांनी शनिवारी येथे केले. एका महाविद्यालयातील कार्यक्रमानिमित्त त्या जळगावात आल्या असताना ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.

- ललित झांबरेजळगाव : खेळात करियर करणे सोपे नाही. सर्वच खेळाडू सुरुवातीपासून सेलीब्रिटी नसतात तर ते सराव आणि मेहनतीने यश मिळवत सेलीब्रिटी बनतात, असे प्रतिपादन अर्जून पुरस्कार विजेत्या गोलरक्षक हॉकीपटू हेलन मेरी इनोसंट यांनी शनिवारी येथे केले. एका महाविद्यालयातील कार्यक्रमानिमित्त त्या जळगावात आल्या असताना ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.त्या म्हणाल्या, खेळ आणि शिक्षण सोबत चालले पाहीजे तरच भवितव्य उज्ज्वल असते आणि कितीही अडचणी आल्या तरी खेळाडूला थांबून चालत नाही. कभी रुकना नही, चलतेही रहना असा मंत्र त्यांनी दिला.२००६ मध्ये आपण निवृत्ती पत्करल्यानंतर गेल्या १०-१२ वर्षात भारतीय हॉकीत विशेषत: महिला हॉकीत बरेच सकारात्मक बदल घडून आले आहेत. या काळात आपण क्रमवारीत १३वरून १० व्या स्थानापर्यंत प्रगती केली. अधिकाधिक स्पर्र्धात आपले संघ हल्ली खेळत असतात आणि हॉकीच्या प्रत्येक क्षेत्रात व्यावसायिक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने तंत्र आणि कौशल्यातसुद्धा सुधारणा झाली आहे.आता टेलिव्हीजन आणि इंटरनेटमुळे प्रत्येक स्पर्धा आणि प्रत्येक खेळाडूचा खेळ बारकाईने अभ्यासता येतो आणि त्यानुसार डावपेच आखून तयारी करता येते. या शिवाय हॉकी इंडियाच्या निर्मितीने भारतात महिला हॉकीला चांगले दिवस आले असल्याचे त्या म्हणाल्या.हॉकी इंडिया झाल्यामुळेच २०१२ पासून आतापर्यंत आपण साधारण दीडशे सामने खेळू शकलो हे त्यांनी नमूद केले.भारतीय हॉकीच्या सुवर्णयुगाचे (२००२ ते २००४) आपण भागीदार असल्याचा अभिमान असल्याचे सांगत त्या म्हणाल्या की, २००२ चे राष्टÑकुल सामने, २००३चे आफ्रो-अशियाई सामने आणि २००४चा अशिया कप या सुवर्णविजेत्या संघात आपण गोलरक्षक होतो मात्र या पैकीकोणता एक विजय अधिक महत्वाचा असे नाही तर प्रत्येकच विजय माझ्यासाठी महत्वाचा होता. भारतासाठी त्या-त्या दिवशी आपण सर्वाेत्तम योगदान देऊ शकलो याचा आनंद व अभिमान अजूनही आहे. एक स्पर्धा संपली की दुसरी आणि नवीन आव्हान असा विचार करून आपण खेळत आलो.प्रशिक्षकांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी संघाचा मुख्य प्रशिक्षक भारतीयच असावा आणि त्याच्यासोबत परदेशी प्रशिक्षक असावेत असे मत ठासून मांडले. भारतीय प्रशिक्षक असला तर त्याला खेळाडूंच्या सामाजिक, आर्थिकस्तराची जाणिव असते आणि खेळाडूंच्या राहणीमान व आहाराची सुद्धा कल्पना असते. ही माहिती खेळाडूंच्या प्रशिक्षणात फार महत्त्वाची ठरते. कौशल्य विकासाबाबत परदेशी प्रशिक्षकांची चांगली मदत होऊ शकते. अलिकडे सातत्याने होत असलेल्या सामन्यांमुळे प्रत्येक खेळाडूची जवळून माहिती मिळत असल्याने मॅन टू मॅन डावपेच आखून तयारी करून घेता येते असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Hockeyहॉकी