शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद BJP कडे ठेवले, २० वर्षांनंतर गृह खाते सोडले
2
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
3
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
4
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
5
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
6
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
7
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
8
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
9
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
10
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
11
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
12
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
13
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
14
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
15
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
16
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
17
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
18
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
19
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
20
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
Daily Top 2Weekly Top 5

FIH Women's Hockey World Cup : 2876 दिवसांनंतरही भारताच्या विजयाची पाटी कोरीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 20:05 IST

आठ वर्षांनंतर पुनरागमन करणा-या भारतीय महिला संघाला हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात  यजमान इंग्लंडने 1-1 असे बरोबरीत रोखले.

लंडन - आठ वर्षांनंतर पुनरागमन करणा-या भारतीय महिला संघाला हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात B गटात यजमान इंग्लंडने 1-1 असे बरोबरीत रोखले. सामन्याच्या 53व्या मिनिटाला इंग्लंडच्या लिली ओस्लीने बरोबरीचा गोल केला आणि 2876 दिवसांनंतरही विश्वचषक स्पर्धेतील भारताची विजयाची पाटी कोरीच राहिली. भारताकडून नेहा गोयलने एकमेव गोल नोंदवला. भारतीय महिलांनी 5 सप्टेंबर 2010 मध्ये जपानवर 2-0 असा विजय मिळवला होता आणि त्यानंतर या स्पर्धेत त्यांना शनिवारी विजय मिळवण्याची संधी होती. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन खेळ करताना भारतीय खेळाडूंनी  पंधरा मिनिटांच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या प्रत्येक खेळाडूला मार्किंगचा डाव खेळला. भारतीय आक्रमणपटूंनी प्रतिस्पर्धीच्या क्षेत्रावर सातत्याने चढाई केली. त्यामुळे इंग्लंडला बचावावर अधिक भर द्यावा लागला. 8व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरवर इंग्लंडला गोल करण्यात अपयश आले. दोन्ही संघांनी काऊंटर अटॅकचा सुरेख खेळ केला. पण, कोणालाही गोल करता आला नाही. दुस-या सत्रात भारतीयांचा खेळ मंदावलेला जाणवला, परंतु त्यांनी इंग्लंडच्या बचावफळीला व्यग्र ठेवले. इंग्लंडचा सामन्यातील तिसरा कॉर्नरचा प्रयत्न भारताची गोलरक्षक सविताने सुरेख पद्धतीने रोखला. 22 व्या मिनिटाला इंग्लंडला पुन्हा कॉर्नर मिळाला. यावेळी त्यांनी थेट आक्रमण न करता रणनिती बदलली. गोलपोस्ट जवळ उभ्या असलेल्या खेळाडूकडे तो चेंडू सोपवण्यात आला, परंतु सविताने त्वरित झेप घेत अप्रतिमरित्या तो अडवला. सविताच्या या कामगिरीने मनोबल उंचावलेल्या भारतीय खेळाडूंनी अचानक आक्रमण सुरू केले. 25 व्या मिनिटाला त्यांना कॉर्नर मिळाला. निक्की प्रधानने टोलावलेला चेंडू इंग्लंडच्या हॅना मार्टिनच्या पायावर लागल्याने त्यावर थेट गोल करण्याची संधी भारताने गमावली. मात्र, नवज्योत कौरने चेंडूवर त्वरित ताबा मिळवताना इंग्लंडच्या खेळाडूंना चकवून चेंडू नेहा गोयलकडे सुपूर्द केला. नेहाने कोणतीच चूक न करता चेंडू सहज गोलजाळीत धाडला. त्या जोरावर भारताने मध्यंतराला 1-0 अशी आघाडी घेतली.पहिल्या दोन सत्रात भारताने तांत्रिकदृष्ट्या सक्षम खेळ केला. मध्यंतरानंतर भारताने त्याच जोशात खेळ पुढे नेला. भारतीय खेळाडूंनी सातत्याने इंग्लंडच्या D क्षेत्रावर आक्रमण केले. इंग्लंडनेही पलटवार केला, परंतु सविताने त्यांना यश मिळू दिले नाही. तिस-या सत्रातही भारताने 1-0 अशी आघाडी कायम राखण्यात यश मिळवले. अखेरच्या सत्रात इंग्लंडचे खेळाडू दबावाखाली दिसले. त्यात मिळालेल्या कॉर्नरवर गोल करण्यात अपयश येत असल्याने त्यांच्यावरील दडपण वाढले. 53व्या मिनिटाला सविताने चोख बचाव करूनही दीपिकाच्या एका चुकीने इंग्लंडला गोल करण्याची संधी मिळाली. त्यावर लिली ओस्लीने बरोबरीचा गोल केला. त्यानंतर इंग्लंडकडून वेळ काढू खेळ झाला आणि भारताला बरोबरीवरच समाधान मानावे लागले. 

टॅग्स :HockeyहॉकीSportsक्रीडा