शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
5
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
6
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
7
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
8
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
9
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
10
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
11
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."
12
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
13
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
15
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
16
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
17
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
18
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
19
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
20
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!

जि.प. शाळांच्या सर्वच बांधकामांची जबाबदारी आता समग्र शिक्षाच्या अभियंत्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांना केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील निधीतून होणारी कामेच हाताळण्याची जबाबदारी यापूर्वी समग्र शिक्षातील ...

जिल्हा परिषदेच्या शाळांना केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील निधीतून होणारी कामेच हाताळण्याची जबाबदारी यापूर्वी समग्र शिक्षातील अभियंत्यांवर होती. प्रत्येक तालुक्याला एक अभियंता नेमून वर्गखोली, स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह बांधकाम व इतर दुरुस्तीची कामे या विभागाकडून केली जात होती, तर जिल्हा परिषदेला राज्य व केंद्र शासनाकडून इतर योजनांत मिळालेल्या निधीतील कामे मात्र जिल्हा परिषदेचाच बांधकाम विभाग करायचा; मात्र बांधकामाच्या नियमित कामांमध्ये शाळांच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. शिवाय मंत्रालय प्रशासकीय विभागाच्या ज्या योजना अंमलबजावणीसाठी जि. प.कडे हस्तांतरित केल्या असल्या तरीही त्याचे नियमन, वित्तीय व्यवस्थापन, निधी वितरण, कर्मचारी वृंद, त्या संदर्भातील तारांकित प्रश्न, सूचना त्याच विभागाने हाताळणे आवश्यक आहे, अशा स्पष्ट सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा इमारत बांधकाम व सुधारणा, देखभाल व दुरुस्तीची कामांच्या अनुषंगाने विधिमंडळविषयक कामकाजाबाबत सर्व जबाबदारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्यावर आहे, तसेच त्यांच्यावर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे नियंत्रण आहे. ग्रामविकास मंत्रालयीन प्रशासकीय विभागांतर्गत जिल्हा परिषद शाळांना भौतिक सुविधा पुरविणे, बांधकाम व दुरुस्तीसाठी निधी देण्याची कोणतीच योजना नाही. शिवाय जिल्हा परिषद बांधकाम विभागात अभियंत्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून, नवीन भरतीवरही निर्बंध आहेत. त्यामुळे बांधकामाबाबत एकसूत्रता शक्य होत नाही, त्यामुळे समग्र शिक्षाच्या अभियंत्यांनीच ही कामे करावीत, असे म्हटले आहे.

कोणती कामे करता येणार

यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या जिल्हा विकास योजना, वित्त आयोग, क्रीडा योजना, खनिकर्म, सीआरसी फंड, खासदार व आमदारांचा स्थानिक विकास निधी, सर्व योजनांतील जिल्हा परिषद शाळांची नवीन इमारत / देखभाल व दुरस्तीची कामे, विशेष दुरुस्ती, संरक्षक भिंत, खेळाचे मैदान, उराचा रस्ता, स्वयंपाकगृह अशा सर्व मंजूर बांधकामाचे पर्यवेक्षण, अंदाजपत्रके तयार करणे, तांत्रिक मान्यता देऊन बांधकाम करून घेण्याची जबाबदारी समग्र शिक्षांतर्गत कार्यरत कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता समग्र यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. १ जुलै रोजी हा आदेश काढण्यात आला.

जि. प.तून निसटतोय विभाग

जिल्हा परिषदेकडून अनेक योजना राज्याच्या कार्यालयांकडे वळविल्या आहेत. आणखी एक विभाग या कचाट्यातून मुक्त करण्याची पहिली पायरी या रूपाने ओलांडली आहे. उर्वरित बाबींमध्ये पदाधिकाऱ्यांना फारसे महत्त्व तसेही नसते. असे झाले तर आणखी एक विभाग हातचा जाण्याची भीती आहे.