शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
3
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
4
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
5
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
6
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
7
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
8
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
9
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
11
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
12
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
13
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
15
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
16
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
17
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
18
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
19
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
20
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 

युवा शेतकऱ्याने ‘सेल्फ मार्केटिंग’चा 'फंडा' वापरत टोमॅटो विक्रीतून मिळवले भरघोस उत्पन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:34 PM

यशकथा : मंदीच्या काळातही ४० रुपये प्रतिकिलो दर मिळविला आहे.

- रमेश कदम ( हिंगोली) सध्या बाजारात टोमॅटोचे दर कमालीचे घसरले असतानाही हिंगोली जिल्ह्यातील नवखा ता. कळमनुरी येथील माऊली देशमुख या युवा शेतकऱ्याने नैसर्गिक पद्धतीने गावराण टोमॅटो विक्रीतून १५ गुंठ्यात पन्नास हजारांचा नफा मिळविला आहे.

सध्या बाजारात टोमॅटोला पाच ते दहा रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले असताना माऊली देशमुख यांनी सेल्फ मार्केटिंगचा फंडा अजमावत मंदीच्या काळातही ४० रुपये प्रतिकिलो दर मिळविला आहे. नैसर्गिक टोमॅटोची चव आणि महत्त्व पटवून सांगत शेतमालाला शेतकऱ्यालाही दर ठरविता येतात याचा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.

माऊली नेहमी आपल्या छोटेखानी शेतीत वेगवेगळे प्रयोग करतात. फुलशेती व मार्केटिंगच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीमुळे त्याने मराठवाडा आणि विदर्भात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. यापूर्वी गावराण लसूण घरोघरी विकून त्यांनी बाजारभाव हा शेतकऱ्यांनी स्वत: ठरवायचा असतो, हे सिद्ध केले. आता देशमुख यांनी गावराण टोमॅटोचा नवा प्रयोग केला. केवळ १५ गुंठे जमिनीत त्यांनी चेरी टोमॅटोची लागवड केली. यासाठी अठराशे रुपयांचे बियाणे आणि इतर किरकोळ खर्च, असा एकूण चार हजारांचा खर्च आला आहे. कुठलेही रासायनिक खत किंवा कीटकनाशकाचा वापर केला नाही. जमिनीत शेण व गोमूत्रापासून तयार केलेल्या नैसर्गिक जीवामृताचा वापर केला. किडीपासून संरक्षणासाठी ताकाची फवारणी केली.

लागवडीनंतर काही दिवसातच रसरशीत, लालबुंद टोमॅटो निघण्यास सुरुवात झाली. रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर न केल्याने टोमॅटोची चव इतर टोमॅटोपेक्षा वेगळी लागते. रसदार आणि आंबट-गोड चव असलेले चेरी टोमॅटो हा तरुण हिंगोली, पुसद जिल्ह्यात पॉलिथीनच्या पिशवीमध्ये पाव किलोची पॅकिंग दहा रुपयांस विकून चाळीस रुपये प्रतिकिलोने विक्री करीत आहे. 

सद्य:स्थितीत बाजारपेठेत टोमॅटोचे भाव कमालीचे घसरले आहेत. दहा रुपयांत दीड ते दोन किलोपर्यंत दर घसरूनही ग्राहक पाहिजे तसा प्रतिसाद देत नाहीत. त्यामध्ये शेतकऱ्यांचा  उत्पादन खर्चही वसूल होत नाही, हे वास्तव चित्र असताना या नैसर्गिक टोमॅटोला मात्र ग्राहक प्रचंड पसंती दाखवत आहेत.  मॉर्निंग वाकला येणाऱ्या नागरिकांना माऊली नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या टोमॅटोचे महत्त्व सांगतो. तासाभरातच शंभरच्या वर पाकिटांची विक्री करून तो घरी परततो. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर, कळमनुरी परिसरातही घरोघरी जाऊन टोमॅटोची चव आणि नैसर्गिक उत्पादनाचे महत्त्व सांगून काही वेळातच टोमॅटो विक्री करतो.

नैसर्गिक पद्धतीचे उत्पादन आणि सेल्फ मार्केटिंगचे तंत्र या तरुण शेतकऱ्याने विकसित केले असून, त्याच्यासाठी ते लाभदायक ठरत आहे. दहा रुपये किलो टोमॅटो मिळत असतानाही माऊलीकडून मात्र, दहा रुपयांचे पाव किलो टोमॅटो खरेदी करतात. यातच त्याच्या मार्केटिंगचे यश सामावले आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी