शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी ठाकरे बंधू मोर्चास्थळी निघाले; आदित्य-अमित ठाकरेही सोबत आले
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
4
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
5
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
6
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
7
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
8
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
9
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
10
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
11
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
12
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
13
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
14
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
15
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
16
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
17
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
18
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
19
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
20
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?

येलदरी जोत्याखाली;सिद्धेश्वर २१ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:53 IST

यंदा दुष्काळी परिस्थिती असताना विविध जलसाठेही झपाट्याने रिकामे होत चालले आहेत. येलदरी आताच जोत्याखाली गेले असून सिद्धेश्वर धरणात अवघा १७ दलघमी जिवंत साठा आहे. तर २२ लघुप्रकल्पांतील जलसाठा २५ टक्क्यांच्या आत आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा दुष्काळी परिस्थिती असताना विविध जलसाठेही झपाट्याने रिकामे होत चालले आहेत. येलदरी आताच जोत्याखाली गेले असून सिद्धेश्वर धरणात अवघा १७ दलघमी जिवंत साठा आहे. तर २२ लघुप्रकल्पांतील जलसाठा २५ टक्क्यांच्या आत आला आहे.हिंगोली जिल्हा यंदा दुष्काळाच्या झळा सोसत आहे. या जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये शासनाकडून अधिकृत दुष्काळ घोषित झाला. हिंगोली, सेनगाव व कळमनुरी तालुक्याचा यात समावेश आहे. वसमत व औंढा तालुक्यातही त्याची तीव्रता तेवढीच असताना वसमत तालुक्यातील केवळ दोन मंडळांमध्ये दुष्काळ घोषित झाला. मात्र त्यांच्या मदतीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. याच दोन तालुक्यांना लागून असलेल्या येलदरी व सिद्धेश्वर धरणातील जलसाठाही अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. येलदरी धरणाचे पाणी सोडल्याने हे धरण आताच जोत्याखाली गेले आहे. मृतसाठ्यात १0६ दलघमी पाणी आहे. तर सिद्धेश्वर धरणात २१.९0 टक्के पाणी असले तरीही जिवंतसाठा केवळ १७.७३ दलघमीच आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता चांगलीच जाणवणार असल्याचे दिसत आहे. आणखी तीन ते चार महिने याच पाण्यावर काढावे लागणार आहेत.हिंगोली तालुक्यातील हिरडी, हातगाव, सेनगाव तालुक्यातील पिंपरी, बाभूळगाव, औंढा तालुक्यातील सेंदूरसना, पूर्णा तालुक्यातील मरसूळ हे तलाव मात्र जोत्याखाली गेले आहेत.एक कोल्हापुरी बंधारा आटलाचारपैकी हिंगोली तालुक्यातील खेर्डा कोल्हापुरी बंधारा आटला आहे. तर सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा, जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा १00 टक्के भरलेले आहेत. परभणी तालुक्यातील राहाटी बंधारा ५६ टक्के भरलेला आहे.मोठ्या दोन धरणांचे हे चित्र असताना २६ लघुप्रकल्पांतील जलसाठाही आटत चालला आहे. सहा प्रकल्प तर जोत्याखाली गेले आहेत. १६ प्रकल्पांतील जलसाठा २५ टक्क्यांच्या आत गेला आहे. तर ४ प्रकल्पच ५0 टक्क्यांपर्यंत भरलेले आहेत. हिंगोली तालुक्यातील पारोळा-१६ टक्के, वडद-१२ टक्के, चोरजवळा-१७ टक्के, सवड-६ टक्के, पेडगाव-१२ टक्के, सेनगाव तालुक्यातील सवना-१७ टक्के, पिंपरी-९ टक्के, घोडदरी- ८ टक्के, औंढा तालुक्यातील वाळकी-१८ टक्के, सुरेगाव-१७ टक्के, औंढा-५0 टक्के, पुरजळ १२ टक्के, वंजारवाडी-१४ टक्के, पिंपळदरी-३९ टक्के, काकडदाबा-१८ टक्के, केळी १३ टक्के, कळमनुरी तालुक्यात बोथी-२९ टक्के, कळमनुरी-१८ टक्के, दांडेगाव-२५ टक्के, देवधरी-२१ टक्के, वसमत तालुक्यातील राजदरी ४३ टक्के असा जलसाठा आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई