शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

येलदरी जोत्याखाली;सिद्धेश्वर २१ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:53 IST

यंदा दुष्काळी परिस्थिती असताना विविध जलसाठेही झपाट्याने रिकामे होत चालले आहेत. येलदरी आताच जोत्याखाली गेले असून सिद्धेश्वर धरणात अवघा १७ दलघमी जिवंत साठा आहे. तर २२ लघुप्रकल्पांतील जलसाठा २५ टक्क्यांच्या आत आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा दुष्काळी परिस्थिती असताना विविध जलसाठेही झपाट्याने रिकामे होत चालले आहेत. येलदरी आताच जोत्याखाली गेले असून सिद्धेश्वर धरणात अवघा १७ दलघमी जिवंत साठा आहे. तर २२ लघुप्रकल्पांतील जलसाठा २५ टक्क्यांच्या आत आला आहे.हिंगोली जिल्हा यंदा दुष्काळाच्या झळा सोसत आहे. या जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये शासनाकडून अधिकृत दुष्काळ घोषित झाला. हिंगोली, सेनगाव व कळमनुरी तालुक्याचा यात समावेश आहे. वसमत व औंढा तालुक्यातही त्याची तीव्रता तेवढीच असताना वसमत तालुक्यातील केवळ दोन मंडळांमध्ये दुष्काळ घोषित झाला. मात्र त्यांच्या मदतीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. याच दोन तालुक्यांना लागून असलेल्या येलदरी व सिद्धेश्वर धरणातील जलसाठाही अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. येलदरी धरणाचे पाणी सोडल्याने हे धरण आताच जोत्याखाली गेले आहे. मृतसाठ्यात १0६ दलघमी पाणी आहे. तर सिद्धेश्वर धरणात २१.९0 टक्के पाणी असले तरीही जिवंतसाठा केवळ १७.७३ दलघमीच आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता चांगलीच जाणवणार असल्याचे दिसत आहे. आणखी तीन ते चार महिने याच पाण्यावर काढावे लागणार आहेत.हिंगोली तालुक्यातील हिरडी, हातगाव, सेनगाव तालुक्यातील पिंपरी, बाभूळगाव, औंढा तालुक्यातील सेंदूरसना, पूर्णा तालुक्यातील मरसूळ हे तलाव मात्र जोत्याखाली गेले आहेत.एक कोल्हापुरी बंधारा आटलाचारपैकी हिंगोली तालुक्यातील खेर्डा कोल्हापुरी बंधारा आटला आहे. तर सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा, जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा १00 टक्के भरलेले आहेत. परभणी तालुक्यातील राहाटी बंधारा ५६ टक्के भरलेला आहे.मोठ्या दोन धरणांचे हे चित्र असताना २६ लघुप्रकल्पांतील जलसाठाही आटत चालला आहे. सहा प्रकल्प तर जोत्याखाली गेले आहेत. १६ प्रकल्पांतील जलसाठा २५ टक्क्यांच्या आत गेला आहे. तर ४ प्रकल्पच ५0 टक्क्यांपर्यंत भरलेले आहेत. हिंगोली तालुक्यातील पारोळा-१६ टक्के, वडद-१२ टक्के, चोरजवळा-१७ टक्के, सवड-६ टक्के, पेडगाव-१२ टक्के, सेनगाव तालुक्यातील सवना-१७ टक्के, पिंपरी-९ टक्के, घोडदरी- ८ टक्के, औंढा तालुक्यातील वाळकी-१८ टक्के, सुरेगाव-१७ टक्के, औंढा-५0 टक्के, पुरजळ १२ टक्के, वंजारवाडी-१४ टक्के, पिंपळदरी-३९ टक्के, काकडदाबा-१८ टक्के, केळी १३ टक्के, कळमनुरी तालुक्यात बोथी-२९ टक्के, कळमनुरी-१८ टक्के, दांडेगाव-२५ टक्के, देवधरी-२१ टक्के, वसमत तालुक्यातील राजदरी ४३ टक्के असा जलसाठा आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई