शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

गणवेश वाटप योजनेची कामे संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:19 IST

दरवर्षी शासनाकडून शाळा उघडताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन केले जाते. मात्र शाळा उघडून अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होत नाहीत. विशेष म्हणजे आता पूर्वी प्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीकडे गणवेशाची जबाबदारी दिली आहे. मात्र मोफत गणवेश वाटपाची कामे जिल्ह्यात संथगतिने सुरू असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दरवर्षी शासनाकडून शाळा उघडताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन केले जाते. मात्र शाळा उघडून अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होत नाहीत. विशेष म्हणजे आता पूर्वी प्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीकडे गणवेशाची जबाबदारी दिली आहे. मात्र मोफत गणवेश वाटपाची कामे जिल्ह्यात संथगतिने सुरू असल्याचे दिसून येत आहे.शालेय गणवेशासाठी शासनाकडून ४ कोटी २२ लाख ६७ हजार रूपयांचा निधी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला आहे. परंतु सदर रक्कम अद्याप शाळास्तरावर वर्ग करण्यात आली नाही, शिवाय तसा अहवालही शिक्षणाधिकाºयाकडे सादर केलेला नाही. १५ जुलै पर्यंत संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांनी शाळेतील विद्यार्थी संख्या व वर्ग केलेल्या रक्कमेचा तपशिल मागविला आहे. आता ‘समग्र शिक्षा अभियानात हा लाभ दिला जाणार असल्यामुळे आता तरी गणवेश वेळेवर मिळतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी ४०० रूपये देण्याची तरतूद होती. आता यामध्ये बदल करून गणवेशाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. समग्र शिक्षा अभियानअंतर्गत आता दोन गणवेशांसाठी ६०० रूपये लाभाची रक्कम दिली जाणार आहे. डीबीटीनुसार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आहेत. एकही लाभार्थी गणवेशापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यकार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी दिल्या होत्या. परंतु सदर गणवेश वाटपाची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालकांच्या तशा तक्रारीही आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांना लवकर गणवेश तरी वाटप होतील.२०१७-१८ शैक्षणिक वर्षात गतवर्षी दिवाळी जवळ आली तरीही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नव्हते. शिवाय शिक्षण खात्याकडे गणवेश योजनेचा अहवालही वेळेत सादर करण्यात आला नाही. शाळा उघडताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे शिक्षण विभागाला सूचना असतात. परंतु दरवर्षी हे नियोजन बारगळते. समग्र शिक्षा अभियानअंतर्गत २०१८-१९ मोफत गणवेश वाटप योजनेतील पात्र विद्यार्थ्याची तालुकानिहाय संख्या हिंगोली १५ हजार २५३, सेनगाव १४ हजार ३१६, वसमत १४ हजार ४६७, कळमनुरी १४ हजार ६०७ तसेच औंढा नागनाथ ११ हजार ८०२ एकूण ७० हजार ४४५ अशी आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकSchoolशाळा