शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

हिंगोलीत नवीन १२०४ घरकुलांची कामे होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:27 IST

हिंगोली : येथील नगरपालिकेच्या वतीने नवीन १२०४ घरकुलांची कामे सुरू करण्यात येणार असून यापैकी ६०९ घरकुलांचे कार्यारंभ आदेशही देण्यात ...

हिंगोली : येथील नगरपालिकेच्या वतीने नवीन १२०४ घरकुलांची कामे सुरू करण्यात येणार असून यापैकी ६०९ घरकुलांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत.

हिंगोली नगरपालिकेने यापूर्वी १०९८ घरकुलांना मंजुरी दिली होती. प्रतिलाभार्थी २.५ लाखांचे अनुदान यात दिले जाते. यामध्ये राज्याचा एक लाख तर केंद्र शासनाचा दीड लाखांचा वाटा आहे. राज्य शासनाचा वाटा पूर्णपणे मिळाला आहे. मात्र केंद्र शासनाचे ३.६८ कोटीच मिळाले होते. तर १४.६६ कोटी रुपये अजूनही मिळालेले नाहीत. त्यामुळे यातील अनेक लाभार्थ्यांचे काम आता अंतिम टप्प्यात असूनही निधीअभावी ठप्प पडले आहे. मुळात निधी नसल्याने ८३० जणांनाच कार्यारंभ आदेश दिला होता. यापैकी ६०० कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित कामांसाठी निधीचा प्रश्न आहे.

आता नव्याने तीन डीपीआर मंजूर झाले आहेत. यात ४२१, १८८ व ५९७ घरकुलांचे हे तीन विकास आराखडे आहेत. या १२०४ घरकुलांचे कार्यारंभ आदेश देण्याचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत जवळपास ६०९ जणांना काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या घरकुलांसाठी राज्य शासनाने आपल्या वाट्याचे ११.५६ कोटी रुपये अदा केले आहेत. मात्र केंद्र शासनाच्या वाट्याचे १८ कोटी रुपये वेळेत न आल्यास या कामांनाही ब्रेक लागण्याची भीती आहे. सध्या ही कामे सुरू करण्यात येत असल्याचे शहरातील विविध भागात दिसून येत आहे. कार्यारंभ आदेश दिलेल्या लाभार्थ्यांना मार्क आऊट देण्यात येत आहेत. त्यानंतर लगेच काहीजण कामालाही सुरुवात करीत आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेत केेंद्राचाच अडसर

या योजनेचे नाव प्रधानमंत्री आवास योजना आहे. मात्र केंद्र शासनाकडूनच वेळेत निधी येत नाही. त्याचा परिणाम म्हणून लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ येत आहे. इतर अनेक आश्वासनाप्रमाणे हा विषय काही निवडणूक जुमला म्हणण्यासारखी नाही. मात्र राज्य शासनाने निधी दिला असल्याने गाेरगरिबांचे पक्क्या घराचे स्वप्न साकारणाऱ्या या उपक्रमाला केंद्राने ही वेळेत निधी देणे गरजेचे आहे. पंतप्रधानांच्या नावाने असलेल्या योजनेचे होणारे हे हाल लाभार्थ्यांच्या संतापात भर घालणारे ठरत आहेत.