शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

हिंगोलीचा मागासलेपणाचा शिक्का पुसणार का? सिंचन, शिक्षण, उद्योग, आरोग्य क्षेत्राला हवे बळ

By विजय पाटील | Updated: September 16, 2023 11:53 IST

हिंगोली जिल्ह्यात अनेक समस्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या समस्यांवर चर्चाच नव्हे, तर निर्णय होणे अपेक्षित आहे.

हिंगोली : जिल्ह्यात सिंचन, शिक्षण, उद्योग, आरोग्य क्षेत्रातील समस्यांवर उपायांबाबत केवळ चर्चा होते. केवळ रस्ते सोडले तर जिल्ह्यात आर्थिक बळकटीसाठी इतर काहीच येत नसल्याने मागासलेपणाचा बसलेला शिक्का कायम आहे. तो पुसून काढणार का? असा प्रश्न स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही कायम आहे.

हिंगोली जिल्ह्यात अनेक समस्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या समस्यांवर चर्चाच नव्हे, तर निर्णय होणे अपेक्षित आहे. या जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या फारशा सोयी नाहीत. इतर जिल्ह्यांना विद्यार्थी पुरविणारा जिल्हा म्हणून हिंगोलीची ओळख आहे. साधे पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे तर बाहेर जावे लागते. जिल्ह्यात तीन औद्योगिक वसाहती आहेत. मात्र बोटावर मोजण्याइतके उद्योग आहेत. इतर काही किरकोळ उद्योग म्हणजे जागा अडविण्याचा धंदा आहे. शिवाय तेथे सुविधाही नाहीत. आता नव्याने कोणाला उद्योग सुरू करायचा तर भूखंडही नाही. त्यामुळे रोजगारही उपलब्ध होत नाहीत. शेतीपूरक उद्योगही नसल्याने शेतकऱ्यांच्या मालालाही त्या तुलनेत भाव मिळत नाही. नियोजनच्या बैठकीवेळी हिंगोलीला मध्यवर्ती प्रशासकीय इमारत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी १०० ते १५० कोटी लागतील. त्याचीही चर्चा हवेतच विरली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाला हवा निधीहिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले. जागेसाठी घोडे अडले. जागा व हे महाविद्यालय उभारणीसाठी ४०० ते ५०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. मात्र जागेचा प्रस्तावच मागील अनेक दिवसांपासून धूळ खात आहे. तो सोडविण्यासह निधीचीही गरज आहे.

औंढा तीर्थक्षेत्रासाठी केवळ घोषणाहिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र हे आठवे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र येथे विकासासाठी केवळ घोषणाच होतात. जवळपास ६० ते ७० कोटींचा आराखडा शासन दरबारी पडून आहे. मात्र अजूनही त्यावर काहीच व्हायला तयार नाही. या बैठकीत तरी हा प्रश्न मार्गी लागेल का? हा प्रश्न आहे.

धरणे उशाला, कोरड शेतीलाहिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर इसापूर, सिद्धेश्वर व येलदरी अशी तीन धरणे आहेत. मात्र त्यांचा स्थानिकांना सिंचनासाठी म्हणावा तसा फायदा झाला नाही. १५ हजार हेक्टरचा सिंचन अनुशेष शिल्लक आहे. तो भरून काढण्यासाठीचे उपाय राज्यपालांकडे साकडे घालूनही झाले नाहीत. कयाधूवरील केवळ पाच कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे झाल्याने हा अनुशेष दूर होणार नाही.

शाळांसाठी निधीची गरजहिंगोली जिल्ह्यात निजामकालीन शाळांसाठी कसेतरी २५ कोटी मिळाले होते. मात्र दहा टक्के लोकवाटा जमा करण्यातच ते परत गेले. इतरही अनेक शाळा मोडकळीस आल्या. १०० ते १५० कोटींची यासाठी गरज आहे. मात्र शिक्षणाच्या या प्रश्नाकडे फारसे कुणी लक्ष द्यायला तयार नाही.

कुरुंदा पूरनियंत्रण कधी होणार?वसमत तालुक्यातील कुरुंदा हे गाव वारंवार पुराच्या तडाख्यात सापडत आहे. मोठा पाऊस झाला की या गावातील मंडळीला धास्ती पडते. या गावाला पुरापासून संरक्षणासाठी करायच्या उपाययोजनांना २५ कोटींची गरज आहे. शासनाने निधी देण्याचे जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात सगळे ठप्प आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकार