शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

संविधानविरोधी काम करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल : चंद्रशेखर आझाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 20:06 IST

भाजपा सरकार समाजा-समाजात तेढ निर्माण करून दंगल घडवित आहे.

हिंगोली : भाजपा सरकार समाजा-समाजात तेढ निर्माण करून दंगल घडवित आहे. परंतु, भीमआर्मी हे कदापि खपवून घेणार नाही. तसेच देशात संविधानाविरूद्ध कोणी काम करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा भीमआर्मीचे संस्थापक अ‍ॅड. चंद्रशेखर आझाद यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.  

हिंगोली मार्गे अमरावतीकडे जाताना भीमआर्मीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी येथे धावती भेट दिली. शहरात त्यांचे आगमन होताच त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आझाद म्हणाले, भीमआर्मी शोषित व पिडितांवर होणाऱ्या अन्याविरूद्ध लढा देत आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. भीमआर्मीच्या वाढत्या ताकदीमुळे भाजप सरकाने धसका घेतला आहे. यामुळेच पोलिसांच्या नजरकैदेत ठेवणे, सभेवर बंदी आणणे असे संविधान विरोधी कृत्य सरकार करत आहे. तसेच भीमाकोरेगाव दंगलीतील आरोपी आजही मोकाट फिरत असून सरकार मुग गिळून गप्प असल्याचा आरोप त्यांनी केला. 

भीमआर्मी सामाजिक संघटनआगामी निवडणूक संदर्भात आझाद यांनी स्पष्ट मत व्यक्त केले नाही. मात्र,  भीमआर्मी हे एक सामाजिक संघटन आहे असे ते म्हणाले. तसेच ‘जो बहुजनो की बात करेगा वही दिल्ली पे राज करेगा’ असे उत्तर त्यांनी एका प्रश्नांवर बोलतांना दिले. यावेळी भीमआर्मीचे दीपक भालेराव, राहूल पाईकराव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Chandrashekhar Azadचंद्रशेखर आझादBhim Armyभीम आर्मीGovernmentसरकारBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार