शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वन्य प्राण्यांनाही टँकरच्या पाण्याचा सहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:46 IST

सध्या तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर पोहोचला असल्याने पाण्याने जीव व्याकूळ होत चालला आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणवठ्यात पाणी सोडून वन्यप्राण्यांची भटकंती थांंबविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर पोहोचला असल्याने पाण्याने जीव व्याकूळ होत चालला आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणवठ्यात पाणी सोडून वन्यप्राण्यांची भटकंती थांंबविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होत आहेत.सध्या वन विभागातील वृक्षतोड तर कधी वनव्यामुळे झाडे भुईसपाट झालीे आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास संपुष्टात तर आलाच आहे, त्याहून गंभीर म्हणजे प्राण तापत्या उन्हात पाण्याच्या शोधात भटकंती करीत असताना अनेकदा मृत्यूमुखीही पडण्याची भीती आहे. त्यामुळे वन विभागाच्या वतीने ऐन उन्हाळ्यासाठी बनविलेल्या ३१ कृत्रिम पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडले जात आहे. जिल्ह्यात २५ हजार ४७५ हेक्टर वनक्षेत्र असून, त्यामध्ये विविध जातीचे १ हजार ३४९ प्रकारचे प्राण्यांचा अधिवास आहे. तर जंगलात नैसर्गिक १४४ पाणवठे आहेत. मात्र पावसाळ्याचे दोन ते तीन महिने सोडले तर इतर महिने मात्र प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती केल्याशिवाय पर्यायच नाही. उन्हाळ्यात तर भयंकर स्थिती होते. पाण्याच्या शोधात निघालेले प्राणी अनेकदा वाहनाला धडकत आहेत, तर कुठे विहिरीत पडत आहेत. ही भटकंती थांबावी म्हणून वन विभागाने याही वर्षी टँकरद्वारे पानवठ्यात पाणी टाकण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात बारमाही पाणी राहणारे ८ तलाव, ८ धरणे आहेत. वन तळे २ अणि पाणवठे व इतर ८ ठिकाणी वर्षभर पाणी राहते. तर हंगामी पाणीसाठ्याची संख्या जास्त आहे. हंगामी वनतळ्यांची संख्या १४० असून, माती नाला बांध ६३ आणि सिमेंट नाला बांध १७ असे एकूण ३१ पाणवठ्यांची संख्या आहे. आजघडिला सर्वच पाणवठे कोरडेठाक असल्यामुळे शासकीय टँकरद्वारे या पाणवठ्यात पाणी सोडण्यात येत आहे.जिल्ह्यातील सर्वच पाणवठ्यात पाणी सोडण्याठी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. पाणी सोडल्यानंतर त्याची छायाचित्रे दिलेल्या सॉफ्टवेअरवर अपलोड करण्याच्या सूचना वनविभागाडून दिल्या आहेत. वन्यप्राण्यांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न वनविभागाकडून होत आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट दरवर्षी कायम असल्याने वन्यप्राण्यांसाठीही वेगळे उपाय करावे लगात आहेत. तर उन्हामुळे झालेल्या पानगळीचाही फटका वन्यप्राण्यांना बसत आहे. मात्र वन विभागाकडून पाणवठ्यात पाणी सोडले जात असल्याने मानवी वस्त्याकडे वन्यप्राण्यांची धाव कमी होण्यास मदत झाली आहे.भेडकी ६, चितळ- हरीण ८१, निलगाय- रोही ६२७, वानर ९५, रानकुत्रा ३०, रानडुक्कर ३२३, रानमांजर ६, तडस ३, मोर १२७, काळविट २१, ससा व इतर ३० असे १ हजार ३४९ वन्य प्राण्यांची बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी गणना झाल्याची नोंंद वन विभागाकडे आहे. यात अजूनही वाढ असण्याची शक्यता आहे.काही दिवसांपुर्वी वन्य प्राणी पाण्यासाठी शहर किंवा गावाकडे, मानवी वस्तीकडे धाव घेत होते. मात्र पाणठ्यात सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे वन्य प्राण्यांची धाव थांबली आहे. तसेच प्राण्यांच्या अपघाताचेही प्रमाण घटले आहे.सध्या तापमान जास्त असल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी वनविभागातर्फे पाणवठ्यात नियमित टँकरद्वारे पाणी सोडले जात असल्याचे वनाधिकारी केशव वाबळे यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभागWaterपाणी