शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

वन्य प्राण्यांनाही टँकरच्या पाण्याचा सहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:46 IST

सध्या तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर पोहोचला असल्याने पाण्याने जीव व्याकूळ होत चालला आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणवठ्यात पाणी सोडून वन्यप्राण्यांची भटकंती थांंबविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर पोहोचला असल्याने पाण्याने जीव व्याकूळ होत चालला आहे. त्यामुळे टँकरद्वारे पाणवठ्यात पाणी सोडून वन्यप्राण्यांची भटकंती थांंबविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होत आहेत.सध्या वन विभागातील वृक्षतोड तर कधी वनव्यामुळे झाडे भुईसपाट झालीे आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास संपुष्टात तर आलाच आहे, त्याहून गंभीर म्हणजे प्राण तापत्या उन्हात पाण्याच्या शोधात भटकंती करीत असताना अनेकदा मृत्यूमुखीही पडण्याची भीती आहे. त्यामुळे वन विभागाच्या वतीने ऐन उन्हाळ्यासाठी बनविलेल्या ३१ कृत्रिम पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडले जात आहे. जिल्ह्यात २५ हजार ४७५ हेक्टर वनक्षेत्र असून, त्यामध्ये विविध जातीचे १ हजार ३४९ प्रकारचे प्राण्यांचा अधिवास आहे. तर जंगलात नैसर्गिक १४४ पाणवठे आहेत. मात्र पावसाळ्याचे दोन ते तीन महिने सोडले तर इतर महिने मात्र प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती केल्याशिवाय पर्यायच नाही. उन्हाळ्यात तर भयंकर स्थिती होते. पाण्याच्या शोधात निघालेले प्राणी अनेकदा वाहनाला धडकत आहेत, तर कुठे विहिरीत पडत आहेत. ही भटकंती थांबावी म्हणून वन विभागाने याही वर्षी टँकरद्वारे पानवठ्यात पाणी टाकण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात बारमाही पाणी राहणारे ८ तलाव, ८ धरणे आहेत. वन तळे २ अणि पाणवठे व इतर ८ ठिकाणी वर्षभर पाणी राहते. तर हंगामी पाणीसाठ्याची संख्या जास्त आहे. हंगामी वनतळ्यांची संख्या १४० असून, माती नाला बांध ६३ आणि सिमेंट नाला बांध १७ असे एकूण ३१ पाणवठ्यांची संख्या आहे. आजघडिला सर्वच पाणवठे कोरडेठाक असल्यामुळे शासकीय टँकरद्वारे या पाणवठ्यात पाणी सोडण्यात येत आहे.जिल्ह्यातील सर्वच पाणवठ्यात पाणी सोडण्याठी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. पाणी सोडल्यानंतर त्याची छायाचित्रे दिलेल्या सॉफ्टवेअरवर अपलोड करण्याच्या सूचना वनविभागाडून दिल्या आहेत. वन्यप्राण्यांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न वनविभागाकडून होत आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट दरवर्षी कायम असल्याने वन्यप्राण्यांसाठीही वेगळे उपाय करावे लगात आहेत. तर उन्हामुळे झालेल्या पानगळीचाही फटका वन्यप्राण्यांना बसत आहे. मात्र वन विभागाकडून पाणवठ्यात पाणी सोडले जात असल्याने मानवी वस्त्याकडे वन्यप्राण्यांची धाव कमी होण्यास मदत झाली आहे.भेडकी ६, चितळ- हरीण ८१, निलगाय- रोही ६२७, वानर ९५, रानकुत्रा ३०, रानडुक्कर ३२३, रानमांजर ६, तडस ३, मोर १२७, काळविट २१, ससा व इतर ३० असे १ हजार ३४९ वन्य प्राण्यांची बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी गणना झाल्याची नोंंद वन विभागाकडे आहे. यात अजूनही वाढ असण्याची शक्यता आहे.काही दिवसांपुर्वी वन्य प्राणी पाण्यासाठी शहर किंवा गावाकडे, मानवी वस्तीकडे धाव घेत होते. मात्र पाणठ्यात सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे वन्य प्राण्यांची धाव थांबली आहे. तसेच प्राण्यांच्या अपघाताचेही प्रमाण घटले आहे.सध्या तापमान जास्त असल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी वनविभागातर्फे पाणवठ्यात नियमित टँकरद्वारे पाणी सोडले जात असल्याचे वनाधिकारी केशव वाबळे यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभागWaterपाणी