शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

साडेअकरा कोटींच्या रस्ते कामांची देयके अर्धवट का निघाली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:21 IST

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण रस्त्यांची लांबी मोठी असली तरीही त्यांच्या दुरुस्तीसाठी अपुरा निधी मिळतो. हा प्रकार वारंवार घडतो. यामुळे जिल्हा ...

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण रस्त्यांची लांबी मोठी असली तरीही त्यांच्या दुरुस्तीसाठी अपुरा निधी मिळतो. हा प्रकार वारंवार घडतो. यामुळे जिल्हा परिषद सदस्यांना यासाठी मंत्रालय स्तरावर जाऊन फिल्डिंग लावावी लागते. त्यासाठीही बोलणी झाली तरच निधी येतो, हे उघड सत्य आहे. मात्र, ही परंपरा चालत आली असे म्हणत मतदारसंघातील कामांसाठी निधी आणण्यास प्रयत्न केला जातो. त्या प्रयत्नांमुळेच २०१९-२० मध्ये रस्ते व पूल दुरुस्तीच्या ६९ कामांसाठी ७.७५ कोटी मंजूर झाले होते. मात्र, अंतिम कामे ७.७१ कोटींचीच झाली. त्याची देयकेही सादर झाली, तर किरकोळ दुरुस्तीची ३.८५ कोटींची ७४ कामे मंजूर झाली. ही कामे पूर्ण करून ३.८० कोटींची देयकेही सादर झाली आहेत.

या सर्व कामांचा निधी मिळण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ग्रामविकास विभागाकडे २६ मार्चलाच प्रस्ताव दिला होता. यापैकी ठराविक कामांची यादी टाकून ४.१४ काेटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. ज्या कामांचा निधी आला त्यातील काहींनी जिल्हा परिषद बांधकाम विभागातील एका अभियंत्यामार्फत थेट मंत्रालयात सेटिंग लावल्याचा आरोप होत आहे. मात्र, सदर अभियंत्यांनी सर्वच निधीची मागणी केली असताना केवळ ४.१४ कोटीच आले आहेत. याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. जसा निधी उपलब्ध होईल, तसा अदा केला जाईल, असे शासन स्तरावरून सांगितले जात असल्याचे सांगून त्यांनी कानावर हात ठेवले.

याबाबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे म्हणाले, कामे केल्यानंतरही निधी रखडण्याचा या योजनेबाबतचा यापूर्वीचा अनुभव नाही. कोरोनाच्या काळातही अनेक कंत्राटदारांनी कामे केली. मागच्या पावसाळ्यात मोठे नुकसान झाले. इतर अनेक रस्त्यांची कामे करावी लागणार आहेत. नवीन कामे करायची तर आधीचा निधीच नसेल तर कंत्राटदार धजावत नाहीत. यात अर्धवट निधी येण्यामागे जी कारणे सदस्यांच्या चर्चेतून समोर येत आहेत, तो प्रकार गंभीर आहे. याबाबतची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहोत. त्यांच्याकडे तक्रार पाठविली आहे.

याबाबत शिवसेनेचे गटनेते अंकुश आहेर म्हणाले, जिल्हा परिषदेला वेळेत कामे न करण्याची लागण झाली आहे. येनकेनप्रकारेण अडवणूक करून कामे मार्च एंडपर्यंत लांबविली जातात. त्यानंतर निधी परत जाण्याच्या भीतीने कामांची घिसाडघाई होते. यात दर्जाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती दाखवून अधिकारी पुन्हा कात्रित पकडतात. दुरुस्तीच्या निधीचेही तसेच आहे. यात उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनीष आखरे म्हणाले, काही सदस्यांची यावरून ओरड आहे. कुणीही लेखी तक्रार केली नाही. तसे झाल्यास याबाबत नक्कीच चौकशी केली जाईल, तसेही या प्रकाराबाबत माहिती घेऊन काही गैरप्रकार असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.