शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

साडेअकरा कोटींच्या रस्ते कामांची देयके अर्धवट का निघाली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:21 IST

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण रस्त्यांची लांबी मोठी असली तरीही त्यांच्या दुरुस्तीसाठी अपुरा निधी मिळतो. हा प्रकार वारंवार घडतो. यामुळे जिल्हा ...

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण रस्त्यांची लांबी मोठी असली तरीही त्यांच्या दुरुस्तीसाठी अपुरा निधी मिळतो. हा प्रकार वारंवार घडतो. यामुळे जिल्हा परिषद सदस्यांना यासाठी मंत्रालय स्तरावर जाऊन फिल्डिंग लावावी लागते. त्यासाठीही बोलणी झाली तरच निधी येतो, हे उघड सत्य आहे. मात्र, ही परंपरा चालत आली असे म्हणत मतदारसंघातील कामांसाठी निधी आणण्यास प्रयत्न केला जातो. त्या प्रयत्नांमुळेच २०१९-२० मध्ये रस्ते व पूल दुरुस्तीच्या ६९ कामांसाठी ७.७५ कोटी मंजूर झाले होते. मात्र, अंतिम कामे ७.७१ कोटींचीच झाली. त्याची देयकेही सादर झाली, तर किरकोळ दुरुस्तीची ३.८५ कोटींची ७४ कामे मंजूर झाली. ही कामे पूर्ण करून ३.८० कोटींची देयकेही सादर झाली आहेत.

या सर्व कामांचा निधी मिळण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ग्रामविकास विभागाकडे २६ मार्चलाच प्रस्ताव दिला होता. यापैकी ठराविक कामांची यादी टाकून ४.१४ काेटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. ज्या कामांचा निधी आला त्यातील काहींनी जिल्हा परिषद बांधकाम विभागातील एका अभियंत्यामार्फत थेट मंत्रालयात सेटिंग लावल्याचा आरोप होत आहे. मात्र, सदर अभियंत्यांनी सर्वच निधीची मागणी केली असताना केवळ ४.१४ कोटीच आले आहेत. याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. जसा निधी उपलब्ध होईल, तसा अदा केला जाईल, असे शासन स्तरावरून सांगितले जात असल्याचे सांगून त्यांनी कानावर हात ठेवले.

याबाबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे म्हणाले, कामे केल्यानंतरही निधी रखडण्याचा या योजनेबाबतचा यापूर्वीचा अनुभव नाही. कोरोनाच्या काळातही अनेक कंत्राटदारांनी कामे केली. मागच्या पावसाळ्यात मोठे नुकसान झाले. इतर अनेक रस्त्यांची कामे करावी लागणार आहेत. नवीन कामे करायची तर आधीचा निधीच नसेल तर कंत्राटदार धजावत नाहीत. यात अर्धवट निधी येण्यामागे जी कारणे सदस्यांच्या चर्चेतून समोर येत आहेत, तो प्रकार गंभीर आहे. याबाबतची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहोत. त्यांच्याकडे तक्रार पाठविली आहे.

याबाबत शिवसेनेचे गटनेते अंकुश आहेर म्हणाले, जिल्हा परिषदेला वेळेत कामे न करण्याची लागण झाली आहे. येनकेनप्रकारेण अडवणूक करून कामे मार्च एंडपर्यंत लांबविली जातात. त्यानंतर निधी परत जाण्याच्या भीतीने कामांची घिसाडघाई होते. यात दर्जाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती दाखवून अधिकारी पुन्हा कात्रित पकडतात. दुरुस्तीच्या निधीचेही तसेच आहे. यात उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनीष आखरे म्हणाले, काही सदस्यांची यावरून ओरड आहे. कुणीही लेखी तक्रार केली नाही. तसे झाल्यास याबाबत नक्कीच चौकशी केली जाईल, तसेही या प्रकाराबाबत माहिती घेऊन काही गैरप्रकार असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.