शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

औंढा तालुक्यासाठी २ कोटी ६५ लाखांचा पाणीटंचाई आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:06 IST

तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया १२३ गावांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने त्यावर उपाययोजना म्हणून २ कोटी ६५ लाख रूपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ढोंबरे यांनी दिली. सदरचा आराखडा हा जानेवारी ते जूनपर्यंत दोन टप्प्यांमध्ये करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे तालुक्यातील १०१ ग्रा.पं.पैकी १२३ गावांत संभाव्य टंचाई

गजानन वाखरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया १२३ गावांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने त्यावर उपाययोजना म्हणून २ कोटी ६५ लाख रूपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ढोंबरे यांनी दिली. सदरचा आराखडा हा जानेवारी ते जूनपर्यंत दोन टप्प्यांमध्ये करण्यात आला आहे.औंढा नागनाथ तालुक्यात एकूण १०२ ग्रामपंचायती आहेत. जानेवारी ते मार्चपर्यंतचा टंचाई आराखड्यात १२३ गावांचा समावेश करण्यात आला असून तात्पुरत्या पूरक योजनेत नालेगाव व कुंडकर पिंप्री या दोन गावांचा समावेश केला आहे. यासाठी सात लाख रुपये खर्च नियोजित आहे.तसेच नळ योजना दुरूस्तीअंतर्गत हिवरखेडा, सावळी बु., जोडपिंप्री, पोटा खु., तपोवन, जवळा बाजार, पुरजळ, शिरला, काठोडा, सारंगवाडी, गवळेवाडी, सेंदुरसना, मार्डी, दरेगाव, संघनाईकतांडा, सोनवाडी, येडुत, फुलदाभा, सुकापूर, ब्राह्मणवाडा यासह पुरजळ येथील २० गाव प्रादेशिक पाणीपुरवठा नळयोजनेच्या दुरूस्तीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेची दुरूस्ती केल्यास परिसरातील २० गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.दरम्यान, विंधन विहिरींच्या विशेष दुरूस्तीसाठी आतापर्यंत एकाही ग्रामपंचायतीने मागणी केली नसल्याचे समजते. परंतु, नवीन विंधन विहिरींसाठी तब्बल ५५ ग्रा.पं.मधून ७५ नवीन विंधन विहिरी प्रस्तावित आहेत.यामध्ये उखळी, जलालपूर, उंडेगाव, लांडाळा, दौडगाव, हिवरखेडा, येळी, केळी, पार्डी, सावळी, सावळी बु., सावळी तांडा, जोडपिंप्री, कामठा, अनखळी व वाडी, पेरजाबाद, नारखेडा, पोटा खु, आजसोंडा, असोला ता. औंढा, वडद, काठोडा, काठोडा (त.), चोंढी, शहापूर, नागेशवाडी, शिरडशहापूर, असोला (त.), लाख, लोहरा (बु.), तामटी तांडा, पिंपळदरी- दरेवाडी, येडुत, येहळेगाव, सुरवाडी, फुलदाभा, धारखेडा, पांग्रा (त.), लाख, मेथा महाळसगाव, असोंदा, बोरजा, कुंडकर पिंप्री, तुर्कपिंप्री, अंजनवाडा, अंजनवाडा तांडा, कोंडशी, पाझरतांडा, जांभळी तांडा, दूरचुना, सिद्धेश्वर, वडचुना, नंदगाव, मु. सावंगी, माथा, गांगलवाडी, ब्राह्मणवाडा, गोळेगाव या गावांचा समावेश आहे.गतवर्षी औंढा नागनाथ तालुक्यात पर्जन्यवृष्टी बºयामुळे झाली होती. त्यामुळे पाणीटंचाई उपाययोजने संदर्भात प्रशासनाला जास्त कसरत करावी लागली नव्हती.परंतु, गतवर्षीचा तुलनेमध्ये यंदा तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे आता प्रशासनाला संभाव्य पाणीटंचाई जाणवत असलेल्या भागांमध्ये लक्ष केंद्रित करावे लागणार असून उपाययोजनेसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.२१ गावांनी केली टँकरची मागणीटँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी औंढा नागनाथ तालुक्यातील उखळी, चिंचोली, रामेश्वर, केळी तांडा, टाकळगव्हाण, राजांळा, सिरला, सिरला तांडा, टाकळखोपा, लक्ष्मण नाईक तांडा, संघनाईक तांडा, काळापाणी तांडा, लोहरा बु. व खुर्द, रेवणसिंग तांडा, पवार तांडा, राजापूर, तळणी, पिंपळदरी, देववाडी, सोनवाडी, येहळेगाव या २१ गावांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. तसेच गतवर्षी या गावांपैकी सिरला, टाकळखोपा व संघनाईकतांडा फक्त या तीनच गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. तर ५० विहिरी व बोअरचे पाणीटंचाईच्या निवारणार्थ अधिग्रहण करण्यात आले होते.