शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

जलयुक्तची गती अजूनही धिमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:59 AM

जलयुक्त शिवार योजनेतील कामांना अजूनही म्हणावी तशी गती नाही. कृषी विभागाची ८१५ कामे झाल्याचे सांगितले जात असले तरीही त्यात दीडशे कामे तर ठिबक व तुषार संच वाटपाचीच आहेत.

ठळक मुद्देमार्च एण्ड जवळ येत असल्याने चिंता

हिंगोली : जलयुक्त शिवार योजनेतील कामांना अजूनही म्हणावी तशी गती नाही. कृषी विभागाची ८१५ कामे झाल्याचे सांगितले जात असले तरीही त्यात दीडशे कामे तर ठिबक व तुषार संच वाटपाचीच आहेत.हिंगोली जिल्ह्यात २0१८-१९ या आर्थिक वर्षात जवळपास ११५ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेची कामे होणार आहेत. यातील आराखड्यानुसार २४४८ कामे प्रस्तावित असून सर्वाधिक १४९५ कामे एकट्या कृषी विभागाची आहेत. यात खोल समतल चर१४ पैकी ६ पूर्ण ५ प्रगतीत आहेत. ढाळीचे बांध २२३ पैकी ३ पूर्ण तर ४१ प्रगतीत आहेत. शेततळ्यांचे ४0८ पैकी ३८८ पूर्ण व २0 प्रगतीत असल्याचे म्हटले असून हा लक्षणीय आकडा गाठला कसा? हा प्रश्नच आहे. सिमेंट नाला बंधाऱ्याची २६ पैकी १ पूर्ण तर ६ प्रगतीत आहेत. अतिशय वाईट कामगिरी या प्रकारात आहे. तुषार व ठिबकचे प्रत्येकी ७५ संच वितरित केले आहेत. नाला खोलीकरणाची ५७२ पैकी २४९ कामे पूर्ण तर ९२ प्रगतीत आहेत. हीच काय ती सर्वांत कामगिरी असल्याचे चित्र दिसत आहे. शासकीय नाला खोलीकरणाचीही २0 पैकी १३ कामे पूर्ण आहेत. सिमेट नाला बांधातील गाळ काढण्याची २८ कामे पलंबित आहेत. गॅबीयन बंधाऱ्यांच्या ४0 कामांनाही मुहुर्त नाही.वनविभागाने डीप सीसीटीची १४ पैकी ४ कामे पूर्ण केली तर १0 सुरू आहेत. वनतळ्यांची २0 पैकी ८ पूर्ण तर १२ सुरू आहेत. माती नाला बांधाची २२ पैकी १३ पूर्ण तर ९ सुरू आहेत.लघुसिंचन विभागाची सिमेंट नाला बंधाऱ्यांची २९ कामे ठप्प आहेत. नाला खोलीकरणाची ६९ पैकी ४८ पूर्ण झाली. भूजल सर्वेक्षणचे १३५ रिचार्ज शाफ्ट तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे १९५ रिचार्ज शाफ्टची कामे अजून सुरूच नाहीत. जलसंधार विभागाच्या ४0 सिमेंट नाला बांधाचेही काम सुरू नाही. केवळ ४२९ पैकी २११ नाला सरळीकरणाची कामे झाली.सिमेंट बांध दुर्लक्षितकिरकोळ कामे तेवढी आटोपली जात असल्याने यंदा जलयुक्त शिवार योजनेतील खर्चात वाढ होण्याची शक्यता दिसत नाही. वाळूचा प्रश्न पुढे करुन सर्वच विभागांनी सिमेंट नाला बांधाची कामे सुरूच केली नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सध्या खाजगी कामे एवढ्या जोरात सुरू असताना शासकीय कामांनाच वाळूचा अडसर येण्यामागचे गणित कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे देयकातूनही रॉयल्टी कपात करण्याची मुभा असताना ही परिस्थिती उद्भवल्याने यात अडवणुकीचा तर प्रकार नाही, याची चाचपणी करावी लागणार आहे.जलयुक्तच्या आराखड्यानुसार जवळपास ४८ कोटींची कामे आहेत. यात २.६४ कोटींची कामे पूर्ण झाली. तर प्रगतीतील कामांवर ७.२२ कोटींचा खर्च झाला. एकूण ९.८६ कोटींपर्यंतच खर्च जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीJalyukt Shivarजलयुक्त शिवारHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद