शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

५३ गावांत पाणीनमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:02 IST

जिल्ह्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपासण्यात आलेल्या ३९१ पाणीनमुन्यांपैकी ६७ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. ५३ गावांतील हे पाणीनमुने आहेत. आता उन्हाळ्यात टंचाईच्या काळात याकडे लक्ष देण्याची गरज असून दूषित पाणीपुरवठ्यामुळे आजार बळावण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपासण्यात आलेल्या ३९१ पाणीनमुन्यांपैकी ६७ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. ५३ गावांतील हे पाणीनमुने आहेत. आता उन्हाळ्यात टंचाईच्या काळात याकडे लक्ष देण्याची गरज असून दूषित पाणीपुरवठ्यामुळे आजार बळावण्याची शक्यता आहे.हिंगोली जिल्ह्यात दर महिन्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून अणुजीव तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व लघुप्रयोगशाळेकडे पाणी नमुने पाठविण्यात येतात. यात बऱ्याचदा सर्व गावांतील पाणीनमुने घेतले जात नाहीत. त्यामुळे याबाबत सुधारणा होणे अपेक्षित आहे. या नमुन्यांची तपासणी झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचयातींना सदर स्त्रोताविषयी कळविले जाते. काही ग्रामपंचायती उपाय योजतात. मात्र काही ग्रामपंचायतींकडून त्यावर उपाययोजनाच होत नाहीत. आता उन्हाळा लागला असल्याने टंचाईत अशा स्त्रोतांचा वापर होण्याचा धोका असतो. त्यामुळे या काळात दक्षता घेणे गरजेचे आहे.औंढा तालुक्यातील जवळा बाजार, चिंचोली, पोटा बु., ढेगज, भोसी, जांभळी, अंजनवाडी अशा एकूण आठ गावांमध्ये पाणीनमुने दूषित आढळले आहेत. वसमत तालुक्यात पळसगाव, मुरुंबा, हरगाव, इंजनगाव प., चंदनगव्हाण, साखर कारखाना, बोराळा, भेंडेगाव, नहाद, कुडाळा, पुयनी बु., हिडगाव या बारा गावांत, हिंगोली तालुक्यात कोथळज, सावरखेडा, बासंबा, बळसोंड, सायाळा, नवखा, फाळेगाव, देवठाणा, अंबाळा, अंबाळा तांडा, आडगाव, लिंबाळा, माळहिवरा, खंडाळा, चिंचाळा, वेलतुरा, एकांबा कळमनुरीत येहळेगाव, येगाव, सालेगाव, नांदापूर, येहळेगाव, तेलंगवाडी, कांडली, आडा, बहुर, कुंभारवाडी, येडशी, वाई या १२ गावांत पाणीनमुने दूषित आढळले. तर सेनगाव तालुक्यात जयपूर, कहाकर, वेलतुरा, सिनगी नाका, कारेगाव, वटकळी, सावरखेडा, दाताडा खु., दाताडा बु., पानकनेरगाव या दाहा गावांमध्ये पाणीनमुने दूषित असल्याचे आढळून आले आहे.असे आहे चित्र : तालुकानिहाय स्थितीऔंढा तालुक्यात ६३ पैकी ९, वसमतला ८0 पैकी १२, हिंगोलीत ९0 पैकी २0, कळमनुरीत १0७ पैकी १३, सेनगावात ५१ पैकी १३ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. सर्वाधिक २५ टक्के पाणीनमुने सेनगाव तालुक्यात दूषित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या तालुक्याने जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे. तर हिंगोली तालुक्यात सर्वांत जास्त १७ गावांत पाणीनमुने दूषित आढळून आले आहेत. त्यामुळे या तालुक्यालाही तेवढीच खबरदारी घ्यावी लागणार आहे. मात्र दरवर्षीच केवळ कागदी घोडे नाचविले जातात, हा अनुभव आहे.पाणीटंचाई असो वा नसो; शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतींना नियमित सूचना दिल्या जातात. मात्र त्यांचे पालन होते की नाही, याची तपासणी कोणीच करत नाही.

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्य