शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

शेततळे खोदताना लागले दहा फुटांवरच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:32 IST

कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथे पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात गतवर्षी झालेल्या कामांचा यंदा फायदा दिसू लागला आहे. या गावात अगदी उन्हाळी हंगामही काही शेतकऱ्यांना घेता आला असून यंदा तर शेततळ्याचे खोदकाम करताना चक्क दहा फुटांवरच पाणी लागले आहे.

रमेश कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथे पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात गतवर्षी झालेल्या कामांचा यंदा फायदा दिसू लागला आहे. या गावात अगदी उन्हाळी हंगामही काही शेतकऱ्यांना घेता आला असून यंदा तर शेततळ्याचे खोदकाम करताना चक्क दहा फुटांवरच पाणी लागले आहे.कळमनुरी तालुक्यातील जरोडा हे माळरानाच्या कुशीत वसलेले गाव. जेमतेम दीडशे उंबरे अन् ८00 लोकसंख्या. उन्हाळ्यात मात्र कायम टंचाईच्या झळा सोसायचे. टँकर लागले नाही मात्र भटकंती सुरू असायची. कयाधू नदीवरून पूरक योजनेने पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र पाणी मिळत नव्हते. त्यामुळे गावाला पाणीदार होण्याची आस होती. त्यात पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात सहभागी होत जलसंधारणासाठी गाव पेटून उठले. येथे गतवर्षीपासून पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे होत आहेत. गावकऱ्यांच्या श्रमदानातून व मशिनच्या साह्याने ही कामे केली जात आहेत.जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावल्यानंतरही जरोड्या यावर्षीही पाणी फाउंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धेसाठीची कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत जरोडा शिवारात शेततळ्याचे काम ९ मे रोजी सुरू केले होते. जेमतेम १० फुटापर्यंत खोदकाम गेले असताना चारही बाजूने झरे फुटले व पाणी एकत्र जमा होऊ लागले. एकीकडे चारशे-पाचशे फूट बोअर घेतल्यानंतरही पाणी लागत नसताना शेततळ्याच्या खोदकामाच्या वेळी मात्र केवळ १० फुटावर पाणी लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचबरोबर गतवर्षीपासून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामामुळेच पाणीपातळी वाढली असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे. १० फुटांवर लागलेले पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केल्याचे दिसून आले. गाव अजूनही पूर्णपणे स्वयंपूर्ण झाले नसले तरीही नजीकच्या काळात या कामांमुळे नक्कीच पाणीदार म्हणून ओळख मिळवेल, असा विश्वास ग्रामस्थांना वाटतो आहे.ग्रामस्थांनी सलग समतलचर १६ हेक्टर, खोल समतल चर ४0 हेक्टर, बंडिंग ३२, शेततळे १३, मातीनाला बांध १0, सिमेंट नाला बांध ५ व १ केटी वेअर घेतला आहे. यात २२ कोटी लिटर पाणी साठते. स्पर्धेच्या काळात ११ कोटी क्षमतेची कामे झाली. तर पावसासह विविध स्त्रोतांतून १७२ कोटी लिटर पाणी मिळते. तर पिकांसह एकूण गरज १९६ कोटी लिटरची आहे. २३ कोटी लिटरची तूट भरून काढण्यास गाव पुन्हा कामाला लागले आहे.पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात ग्रामस्थांनी मोठी मेहनत घेतली. सर्वांना पाण्याचे महत्त्व कळाले. त्यामुळे श्रमदान व यांत्रिकीकरणातून मोठी कामे झाल्याचा फायदा दिसत आहे.- कृष्णराव भिसे, माजी सरपंच, जरोडामी पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण घेवून आल्यानंतर ग्रामस्थांना त्याचे महत्त्व सांगितले. ग्रामस्थांनी मनावर घेतले. त्याचा फायदा दिसल्याने यंदा जो-तो स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे.- चांदू भिसे, माजी सरपंच, जरोडा

टॅग्स :Waterपाणी