शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

शेततळे खोदताना लागले दहा फुटांवरच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:32 IST

कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथे पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात गतवर्षी झालेल्या कामांचा यंदा फायदा दिसू लागला आहे. या गावात अगदी उन्हाळी हंगामही काही शेतकऱ्यांना घेता आला असून यंदा तर शेततळ्याचे खोदकाम करताना चक्क दहा फुटांवरच पाणी लागले आहे.

रमेश कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथे पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात गतवर्षी झालेल्या कामांचा यंदा फायदा दिसू लागला आहे. या गावात अगदी उन्हाळी हंगामही काही शेतकऱ्यांना घेता आला असून यंदा तर शेततळ्याचे खोदकाम करताना चक्क दहा फुटांवरच पाणी लागले आहे.कळमनुरी तालुक्यातील जरोडा हे माळरानाच्या कुशीत वसलेले गाव. जेमतेम दीडशे उंबरे अन् ८00 लोकसंख्या. उन्हाळ्यात मात्र कायम टंचाईच्या झळा सोसायचे. टँकर लागले नाही मात्र भटकंती सुरू असायची. कयाधू नदीवरून पूरक योजनेने पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र पाणी मिळत नव्हते. त्यामुळे गावाला पाणीदार होण्याची आस होती. त्यात पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात सहभागी होत जलसंधारणासाठी गाव पेटून उठले. येथे गतवर्षीपासून पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे होत आहेत. गावकऱ्यांच्या श्रमदानातून व मशिनच्या साह्याने ही कामे केली जात आहेत.जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावल्यानंतरही जरोड्या यावर्षीही पाणी फाउंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धेसाठीची कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत जरोडा शिवारात शेततळ्याचे काम ९ मे रोजी सुरू केले होते. जेमतेम १० फुटापर्यंत खोदकाम गेले असताना चारही बाजूने झरे फुटले व पाणी एकत्र जमा होऊ लागले. एकीकडे चारशे-पाचशे फूट बोअर घेतल्यानंतरही पाणी लागत नसताना शेततळ्याच्या खोदकामाच्या वेळी मात्र केवळ १० फुटावर पाणी लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचबरोबर गतवर्षीपासून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामामुळेच पाणीपातळी वाढली असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे. १० फुटांवर लागलेले पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केल्याचे दिसून आले. गाव अजूनही पूर्णपणे स्वयंपूर्ण झाले नसले तरीही नजीकच्या काळात या कामांमुळे नक्कीच पाणीदार म्हणून ओळख मिळवेल, असा विश्वास ग्रामस्थांना वाटतो आहे.ग्रामस्थांनी सलग समतलचर १६ हेक्टर, खोल समतल चर ४0 हेक्टर, बंडिंग ३२, शेततळे १३, मातीनाला बांध १0, सिमेंट नाला बांध ५ व १ केटी वेअर घेतला आहे. यात २२ कोटी लिटर पाणी साठते. स्पर्धेच्या काळात ११ कोटी क्षमतेची कामे झाली. तर पावसासह विविध स्त्रोतांतून १७२ कोटी लिटर पाणी मिळते. तर पिकांसह एकूण गरज १९६ कोटी लिटरची आहे. २३ कोटी लिटरची तूट भरून काढण्यास गाव पुन्हा कामाला लागले आहे.पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात ग्रामस्थांनी मोठी मेहनत घेतली. सर्वांना पाण्याचे महत्त्व कळाले. त्यामुळे श्रमदान व यांत्रिकीकरणातून मोठी कामे झाल्याचा फायदा दिसत आहे.- कृष्णराव भिसे, माजी सरपंच, जरोडामी पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण घेवून आल्यानंतर ग्रामस्थांना त्याचे महत्त्व सांगितले. ग्रामस्थांनी मनावर घेतले. त्याचा फायदा दिसल्याने यंदा जो-तो स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे.- चांदू भिसे, माजी सरपंच, जरोडा

टॅग्स :Waterपाणी