शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

शेततळे खोदताना लागले दहा फुटांवरच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:32 IST

कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथे पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात गतवर्षी झालेल्या कामांचा यंदा फायदा दिसू लागला आहे. या गावात अगदी उन्हाळी हंगामही काही शेतकऱ्यांना घेता आला असून यंदा तर शेततळ्याचे खोदकाम करताना चक्क दहा फुटांवरच पाणी लागले आहे.

रमेश कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथे पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात गतवर्षी झालेल्या कामांचा यंदा फायदा दिसू लागला आहे. या गावात अगदी उन्हाळी हंगामही काही शेतकऱ्यांना घेता आला असून यंदा तर शेततळ्याचे खोदकाम करताना चक्क दहा फुटांवरच पाणी लागले आहे.कळमनुरी तालुक्यातील जरोडा हे माळरानाच्या कुशीत वसलेले गाव. जेमतेम दीडशे उंबरे अन् ८00 लोकसंख्या. उन्हाळ्यात मात्र कायम टंचाईच्या झळा सोसायचे. टँकर लागले नाही मात्र भटकंती सुरू असायची. कयाधू नदीवरून पूरक योजनेने पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र पाणी मिळत नव्हते. त्यामुळे गावाला पाणीदार होण्याची आस होती. त्यात पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात सहभागी होत जलसंधारणासाठी गाव पेटून उठले. येथे गतवर्षीपासून पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे होत आहेत. गावकऱ्यांच्या श्रमदानातून व मशिनच्या साह्याने ही कामे केली जात आहेत.जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावल्यानंतरही जरोड्या यावर्षीही पाणी फाउंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धेसाठीची कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत जरोडा शिवारात शेततळ्याचे काम ९ मे रोजी सुरू केले होते. जेमतेम १० फुटापर्यंत खोदकाम गेले असताना चारही बाजूने झरे फुटले व पाणी एकत्र जमा होऊ लागले. एकीकडे चारशे-पाचशे फूट बोअर घेतल्यानंतरही पाणी लागत नसताना शेततळ्याच्या खोदकामाच्या वेळी मात्र केवळ १० फुटावर पाणी लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचबरोबर गतवर्षीपासून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामामुळेच पाणीपातळी वाढली असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे. १० फुटांवर लागलेले पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केल्याचे दिसून आले. गाव अजूनही पूर्णपणे स्वयंपूर्ण झाले नसले तरीही नजीकच्या काळात या कामांमुळे नक्कीच पाणीदार म्हणून ओळख मिळवेल, असा विश्वास ग्रामस्थांना वाटतो आहे.ग्रामस्थांनी सलग समतलचर १६ हेक्टर, खोल समतल चर ४0 हेक्टर, बंडिंग ३२, शेततळे १३, मातीनाला बांध १0, सिमेंट नाला बांध ५ व १ केटी वेअर घेतला आहे. यात २२ कोटी लिटर पाणी साठते. स्पर्धेच्या काळात ११ कोटी क्षमतेची कामे झाली. तर पावसासह विविध स्त्रोतांतून १७२ कोटी लिटर पाणी मिळते. तर पिकांसह एकूण गरज १९६ कोटी लिटरची आहे. २३ कोटी लिटरची तूट भरून काढण्यास गाव पुन्हा कामाला लागले आहे.पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात ग्रामस्थांनी मोठी मेहनत घेतली. सर्वांना पाण्याचे महत्त्व कळाले. त्यामुळे श्रमदान व यांत्रिकीकरणातून मोठी कामे झाल्याचा फायदा दिसत आहे.- कृष्णराव भिसे, माजी सरपंच, जरोडामी पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण घेवून आल्यानंतर ग्रामस्थांना त्याचे महत्त्व सांगितले. ग्रामस्थांनी मनावर घेतले. त्याचा फायदा दिसल्याने यंदा जो-तो स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे.- चांदू भिसे, माजी सरपंच, जरोडा

टॅग्स :Waterपाणी