शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

शेततळे खोदताना लागले दहा फुटांवरच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:32 IST

कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथे पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात गतवर्षी झालेल्या कामांचा यंदा फायदा दिसू लागला आहे. या गावात अगदी उन्हाळी हंगामही काही शेतकऱ्यांना घेता आला असून यंदा तर शेततळ्याचे खोदकाम करताना चक्क दहा फुटांवरच पाणी लागले आहे.

रमेश कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथे पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात गतवर्षी झालेल्या कामांचा यंदा फायदा दिसू लागला आहे. या गावात अगदी उन्हाळी हंगामही काही शेतकऱ्यांना घेता आला असून यंदा तर शेततळ्याचे खोदकाम करताना चक्क दहा फुटांवरच पाणी लागले आहे.कळमनुरी तालुक्यातील जरोडा हे माळरानाच्या कुशीत वसलेले गाव. जेमतेम दीडशे उंबरे अन् ८00 लोकसंख्या. उन्हाळ्यात मात्र कायम टंचाईच्या झळा सोसायचे. टँकर लागले नाही मात्र भटकंती सुरू असायची. कयाधू नदीवरून पूरक योजनेने पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र पाणी मिळत नव्हते. त्यामुळे गावाला पाणीदार होण्याची आस होती. त्यात पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात सहभागी होत जलसंधारणासाठी गाव पेटून उठले. येथे गतवर्षीपासून पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे होत आहेत. गावकऱ्यांच्या श्रमदानातून व मशिनच्या साह्याने ही कामे केली जात आहेत.जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावल्यानंतरही जरोड्या यावर्षीही पाणी फाउंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धेसाठीची कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत जरोडा शिवारात शेततळ्याचे काम ९ मे रोजी सुरू केले होते. जेमतेम १० फुटापर्यंत खोदकाम गेले असताना चारही बाजूने झरे फुटले व पाणी एकत्र जमा होऊ लागले. एकीकडे चारशे-पाचशे फूट बोअर घेतल्यानंतरही पाणी लागत नसताना शेततळ्याच्या खोदकामाच्या वेळी मात्र केवळ १० फुटावर पाणी लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचबरोबर गतवर्षीपासून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामामुळेच पाणीपातळी वाढली असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे. १० फुटांवर लागलेले पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केल्याचे दिसून आले. गाव अजूनही पूर्णपणे स्वयंपूर्ण झाले नसले तरीही नजीकच्या काळात या कामांमुळे नक्कीच पाणीदार म्हणून ओळख मिळवेल, असा विश्वास ग्रामस्थांना वाटतो आहे.ग्रामस्थांनी सलग समतलचर १६ हेक्टर, खोल समतल चर ४0 हेक्टर, बंडिंग ३२, शेततळे १३, मातीनाला बांध १0, सिमेंट नाला बांध ५ व १ केटी वेअर घेतला आहे. यात २२ कोटी लिटर पाणी साठते. स्पर्धेच्या काळात ११ कोटी क्षमतेची कामे झाली. तर पावसासह विविध स्त्रोतांतून १७२ कोटी लिटर पाणी मिळते. तर पिकांसह एकूण गरज १९६ कोटी लिटरची आहे. २३ कोटी लिटरची तूट भरून काढण्यास गाव पुन्हा कामाला लागले आहे.पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात ग्रामस्थांनी मोठी मेहनत घेतली. सर्वांना पाण्याचे महत्त्व कळाले. त्यामुळे श्रमदान व यांत्रिकीकरणातून मोठी कामे झाल्याचा फायदा दिसत आहे.- कृष्णराव भिसे, माजी सरपंच, जरोडामी पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण घेवून आल्यानंतर ग्रामस्थांना त्याचे महत्त्व सांगितले. ग्रामस्थांनी मनावर घेतले. त्याचा फायदा दिसल्याने यंदा जो-तो स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे.- चांदू भिसे, माजी सरपंच, जरोडा

टॅग्स :Waterपाणी