कोरोना काळात नियमांचे उल्लंघन ; बेशिस्त चालकांना पावणेतीन कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST2021-06-21T04:20:43+5:302021-06-21T04:20:43+5:30

हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन चहूबाजूंनी प्रयत्न करीत असताना काही वाहनचालक मात्र बिनबोभाट रस्त्यावर वावरत होते. अशा बेशिस्त ...

Violation of rules during the Corona period; A fine of Rs 53 crore has been imposed on unruly drivers | कोरोना काळात नियमांचे उल्लंघन ; बेशिस्त चालकांना पावणेतीन कोटींचा दंड

कोरोना काळात नियमांचे उल्लंघन ; बेशिस्त चालकांना पावणेतीन कोटींचा दंड

हिंगोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन चहूबाजूंनी प्रयत्न करीत असताना काही वाहनचालक मात्र बिनबोभाट रस्त्यावर वावरत होते. अशा बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक शाखेने दीड वर्षात पावणेतीन कोटींचा दंड ठोठावला. यापैकी २०२० मध्ये ५ हजार २७६ वाहनचालकांकडून २१ लाख ५२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे.

जिल्ह्यात मागील दीड वर्षापासून थैमान घातलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मागील तीन महिन्यांपासून ठप्प पडलेली बाजारपेठ पुन्हा गजबजली आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर खरेदीसाठी पडत आहेत. गतवर्षीही पाच ते सहा महिने व्यवहार ठप्प होते. त्यानंतर बाजारपेठेतील निर्बंध शिथिल करण्यात आले होते. एकीकडे रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाने काही निर्बंध घातले होते. तर दुसरीकडे कोरोना काळात मोठ्या संख्येने वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत होते. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलीस प्रशासनाने बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. तरीही काही चलाख वाहनचालक पोलिसांना चकमा देत फिरत होते. ही बाब निदर्शनास आल्याने वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई सुरू केली होती. मागील दीड वर्षात नो पार्किंग, धोकादायक वाहन चालविणे, ट्रीपल शिट, विनापरवाना, मोबाइलवर बोलणे, अधिक वेगाने वाहन चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५० हजार ५२१ वाहनचालकांवर कारवाई करीत त्यांना २ कोटी ८७ लाख ९८ हजार ६०० रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. यात २०२१ मध्ये १३ हजार ३५६ वाहनचालकांवरील ६७ लाख १० हजार ४०० रुपये दंडाचा समावेश आहे.

वेगाने वाहन चालविणाऱ्यांना सर्वाधिक दंड

मागील दीड वर्षातील कोरोना काळात वेगाने वाहने चालविल्याप्रकरणी ९ हजार ६७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी वाहतूक शाखेने २०२० मध्ये ५१ लाख १९ हजारांचा तर २०२१ मध्ये ३९ लाख ६८ हजारांचा दंड लावला आहे.

दंड भरण्याकडे मात्र कानाडोळा

वाहतुकीचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येते, मात्र बहुतांश वाहनमालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. २०२० मध्ये वर्षभरात ३७ हजार १६५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यापैकी ५ हजार २७६ वाहनचालकांकडून २१ लाख ५२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. २०२१ मध्येही बहुतांश वाहनचालकांनी अद्याप दंड भरलेला नाही.

कोरोना काळातील दीड वर्षातील कारवाई

नो पार्किंग - २२७९९

धोकादायक वाहन चालविणे - ४८१३

ट्रीपल शिट - ३९३२

विनापरवाना - ८०५९

मोबाइलवर बोलणे -१६६२

अधिक वेग - ९०८७

फॅन्सी नंबर प्लेट - १६९

फोटो :

Web Title: Violation of rules during the Corona period; A fine of Rs 53 crore has been imposed on unruly drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.