समृद्ध गाव स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या गावांचा होणार सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST2021-02-07T04:27:55+5:302021-02-07T04:27:55+5:30
लॉकडाऊनमध्येही स्पर्धेत सहभागी असलेल्या गावांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. अनेक गावांनी प्रशिक्षणाचे तीन टप्पे पूर्ण केले आहेत. समृद्ध गाव ...

समृद्ध गाव स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या गावांचा होणार सन्मान
लॉकडाऊनमध्येही स्पर्धेत सहभागी असलेल्या गावांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. अनेक गावांनी प्रशिक्षणाचे तीन टप्पे पूर्ण केले आहेत. समृद्ध गाव स्पर्धेच्या मूल्यांकन पद्धतीप्रमाणे ठराविक काम करणाऱ्या गावांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार जिल्ह्याच्या पातळीवर करण्यात येणार आहे. या सत्काराला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अभिनेता आमिर खान व किरण राव उपस्थित राहणार आहेत.
हा सत्कार मार्च महिन्यांमध्ये जिल्हास्तरावर होणार आहे. सत्काराला पात्र होण्यासाठी समृद्ध गाव योजनेत सहभागी होणाऱ्या गावांना २५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत जल बचतीच्या साधनांचा वापर, जलस्त्रोत विहीर बोरवेल सर्वेक्षण, विहिरीच्या पातळीचे मोजमाप, पीक लागवड अहवाल, स्वच्छ पेयजल, स्वयंसहाय्यता बचतगटाचे सभासदत्व अस्तित्वात असलेल्या रचनांचे सर्वेक्षण, पर्जन्यमापक बसविणे, पावसाच्या नोंदी ठेवण्यासाठी रजिस्टर तयार करणे, वृक्ष व जंगलाची वाढ संरक्षित करून क्षेत्र निश्चित करणे यासाठी १२० गुण राहणार आहेत. १२० गुणांपैकी ७० च्या वर गुण मिळविणारी गावे सत्काराला पात्र ठरणार आहेत पाणी फाउंडेशन ॲपवर भरलेल्या माहितीच्या आधारे हे गुण मोजले जाणार आहेत. तालुक्यातील जरोडा, वारंगा मसई, बोल्डावाडी, नवखा, शिवनी खुर्द, सालेगाव, रामवाडी, कवडा, सिंदगी,चींचोर्डी मसोड, भुरक्याचिवाडी, नांदापूर या १३ गावांनी समृद्ध गाव स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे.
सध्या ही गावे विहीर व बोरवेल गणना, हंगामनिहाय पीक माहिती आदी कामे करीत असल्याचे पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक भागवत कोटकर यांनी सांगितले.