शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

विलासराव देशमुख अभय योजना; ३२ लाख थकबाकीदारांना पुन्हा वीजजोडणीची संधी,विलंब आकार व व्याजमाफी देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 15:20 IST

कायमस्वरूपी वीजपुरवठा बंद झालेल्या ग्राहकांना थकित रकमेत सवलत व त्यांना पुन्हा वीज जोडणी देणाऱ्या विलासराव देशमुख अभय योजनेची घोषणा काही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्र्यांनी केली आहे.

- यशवंत परांडकर

हिंगोली : थकबाकीपोटी ज्यांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा बंद केला आहे. राज्यात ३२ लाख ७९ हजार ८३८ लघुदाब वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला आहे. याशिवाय उच्चदाब २४०४ ग्राहकांचा त्यात समावेश आहे. या लघुदाब व उच्चदाब या दोन वीज ग्राहकांसाठी महावितरणची ‘विलासराव देशमुख अभय योजना’ संजीवनी ठरणार आहे.

कायमस्वरूपी वीजपुरवठा बंद झालेल्या ग्राहकांना थकित रकमेत सवलत व त्यांना पुन्हा वीज जोडणी देणाऱ्या विलासराव देशमुख अभय योजनेची घोषणा काही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्र्यांनी केली आहे. या योजनेमुळे राज्यातील ३२ लाख ७९ हजार ८३८ लघुदाब वीज ग्राहकांना पुन्हा वीजजोडणी मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे. या वीज ग्राहकांकडे ५ हजार ४२२ कोटी रुपये वीज थकबाकी आहे. याशिवाय राज्यामध्ये २ हजार ४०४ उच्चदाब वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला असून या ग्राहकांकडे एकूण १००१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वीजपुरवठा जर ३१ डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी कायमस्वरूपी खंडित झालेला असेल तर त्या सर्व ग्राहकांना स्वत:कडील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणने ‘विलासराव देशमुख अभय योजना’ सुरू केली आहे. ही योजना १ मार्च २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२ या सहा महिन्यांच्या कालावधीतच राबविण्यात येणार आहे.

या योजनेत सहभागी होणाऱ्या वीज ग्राहकांकडील विलंब आकारणी शुल्क आणि व्याजाची रक्कम पूर्णत: माफ केली जाणार आहे. ग्राहकांनी वीज थकबाकी रक्कम संपूर्ण भरणे त्यासाठी आवश्यक आहे. वीज ग्राहकास थकबाकी रक्कम भरण्याकरिता व्याजरहीत सहा मासिक हप्ते मिळू शकतील. जर मूळ वीज थकबाकी रक्कम एकरकमी भरली तर लघुदाब वीज ग्राहकांना त्या रकमेत दहा टक्के आणि उच्चदाब वीज ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळणार आहे. कोरोना काळात झालेलेल्या अनेक लॉकडाऊनमुळे राज्यातील घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक वीज ग्राहक थकबाकी भरू न शकल्याने त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला आहे.

ज्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर २०२१ पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे, त्या सर्व लघुदाब, उच्चदाब, वाणिज्य, औद्योगिक वीज ग्राहकांनी विलासराव देशमुख अभय योजनेत सहभागी होऊन स्वत:कडील थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत करून घ्यावा; पण या योजनेत सहभागी होण्यासाठी बेबाकी असणे तितकेच महत्त्वाचे आहे.- रजनी देशमुख, प्रभारी अधीक्षक अभियंता, हिंगोली

टॅग्स :electricityवीजHingoliहिंगोली