बसस्थानकात अस्वच्छता; लक्ष देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:31 IST2021-02-24T04:31:38+5:302021-02-24T04:31:38+5:30
गतिरोधक बसविण्याची मागणी डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रसफाटा येथे मागील काही महिन्यांपासून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली ...

बसस्थानकात अस्वच्छता; लक्ष देण्याची मागणी
गतिरोधक बसविण्याची मागणी
डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रसफाटा येथे मागील काही महिन्यांपासून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा राज्य रस्ता असल्यामुळे मोठी वाहनेही याच रस्त्यावरून जातात. गतिरोधक नसल्यामुळे लहान मुले तसेच वृद्धांना रस्ता ओलांडणे कठीण होऊन बसत आहे. या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन संबंधित विभागाने या ठिकाणी गतिरोधक बसवावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
‘जड वाहनांना प्रवेश बंदी करावी’
हिंगोली : जड वाहनांना ये-जा करण्यासाठी खटकाळी बायपास करून दिलेला असतानाही काही वाहने शहरातून जात आहेत. यामुळे बहुतांशवेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन जड वाहनांना शहरात प्रवेश बंदी करावी, अशी मागणी होत आहे.
वीजपुरवठा अनियमित; शेतकरी त्रस्त
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वरचेवर वाढत आहे. यामुळे विहिरींना पाणी असूनही पिकांना देणे शक्य होत नाही. त्यामुळे पिके कोमेजून जात आहेत. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन आखाडा बाळापूर व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालक त्रस्त
कळमनुरी : शहरासह परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. दुसरीकडे खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. वेळीच वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
वन विभागाचे दुुर्लक्ष
हिंगोली : मागील काही दिवसांपासून अन्न व पाण्याच्या शोधात वानरे शहरातील शिवाजीनगर, जवाहररोड, शास्त्रीनगर आदी भागात दाखल झाली आहेत. छतावरून उड्या मारत ही वानरे अंगणातील वस्तूंची नासाडी करीत आहेत. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सांगूनही अद्याप वानरांचा बंदोबस्त करण्यात आला नाही. वरिष्ठांनी याची दखल घेऊन वानरांना पकडून जंगलात नेऊन सोडावे, अशी मागणी होत आहे.